शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींशी गैरवर्तनप्रकरणी मुख्याध्यापक निलंबित

By admin | Updated: February 7, 2016 00:21 IST

विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी तालुक्यातील सुलतानपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

हिंगणघाट पं.स.तील सुलतानपूर येथील घटनाहिंगणघाट : विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी तालुक्यातील सुलतानपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या शिक्षकाचे नाव चंद्रभान झाडे असे असल्याचे सांगण्यात आले आहे. तालुक्यातील सावली (वाघ) गटातील सुलतानपूरच्या गावकऱ्यांनी तेथील जि. प. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक चंद्रभान झाडे विरोधात हिंगणघाट पंचायत समिंतीमध्ये निवेदन दाखल केले. या निवेदनानुसार चंद्रभान झाडे यांचा विद्यार्थ्यांना त्रास असून त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच कारवाई न झाल्यास मंगळवारी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता.गावकर्ऱ्यांच्या निवेदनावरून हिंगणघाट पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ललितकुमार बारसागडे व केंद्र प्रमुख मेश्राम यांनी सुलतानपूर येथे भेट दिली. शाळेचे कुलूप काढून विद्यार्थी व पाकलवर्गाला शाळेत बसवून त्यांनी चौकशी केली असता धक्कादायक प्रकार त्यांच्यासमोर आला. विद्यार्थिनींनी आपल्या लेखी बयाणात चंद्रभान झाडे हा आमच्या सोबत गैरवर्तणूक करतो तसेच सतत स्पर्श करीत असल्याचे नमूद केले. विद्यार्थिनींचे आरोप ऐकून दोनही अधिकारी अवाक झाले. हा प्रकार गंभीर असल्याचे निदर्शनास येताच विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल पंचायत समितीत दाखल केला. यात त्यांनी चंद्रभान झाडे यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली. हा अहवाल गट विकास अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक शिक्षणाधिकारी तेलंग यांच्याकडे पाठविला.या अहवालावरुन चंद्रभान झाडे यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केल्याचे अहवालावरून दिसून येते. त्यांनी महाराष्ट्र जि. प. (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केल्याने स्पष्ट होत असल्याने जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम ३ अन्वये त्यांना तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना यांनी निर्गत केला. चौकशी अधिकारी बारसागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ विद्यार्थिनींनी सदर शिक्षकाच्या विरोधात बयाण दिल्याचे सांगितले. या सगळ्या पहिली ते चवथ्या वर्गात शिकणाऱ्या मुली आहेत. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.(तालुका प्रतिनिधी)