शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिल्हाधिकाऱ्यांकडून जलपुनर्भरण प्रकल्पाची पाहणी

By admin | Updated: July 22, 2016 01:53 IST

एखादे रचनात्मक कार्य फार काळ दृष्टीआड राहत नाही. त्याची दखल एखादा जाणकार वा प्रशासनातील उच्च अधिकारी घेतो तेव्हा कार्य करणाऱ्यांचा उत्साह वाढतो.

वैद्यकीय जनजागृती मंचात उत्साह : वैयक्तिक सहकार्याची दिली ग्वाही वर्धा : एखादे रचनात्मक कार्य फार काळ दृष्टीआड राहत नाही. त्याची दखल एखादा जाणकार वा प्रशासनातील उच्च अधिकारी घेतो तेव्हा कार्य करणाऱ्यांचा उत्साह वाढतो. असाच अनुभव हनुमान टेकडीवर अचानक जिल्हाधिकारी शैलेश नवाल व न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी भेट देत पाहणी केल्याने वैद्यकीय जनजागृती मंच व श्रमदान करणाऱ्या नागरिकांना आला. गत तीन महिन्यांपासून वैद्यकीय जनजागृती मंच व सहकारी हनुमान टेकडीवर श्रमदान करून ‘जल पुणर्भरण प्रकल्प’ राबवित आहेत. जवळपास ३५० वृक्षांचे रोपण केले असून टेकडी सभोवताल तारांचे कुंपण करण्यात आले आहे. या प्रकल्पात परवानगी घेतल्यानंतर लगेचच सर्व सदस्य कामाला लागले. यासाठी आर्थिक साह्यही लोकसहभागातून प्राप्त होत आहे. जिल्हाधिकारी नवाल यांनी संपूर्ण टेकडी, जल पुनर्भरण प्रकल्प तसेच वृक्षांचे निरीक्षण केले. यावर समाधान व्यक्त केले. सर्व सक्रीय सदस्यांचे कौतुकही केले. या कार्यास वैयक्तिक स्तरावर सर्वतोपरी मदत देण्याची तयारीही दर्शविली. वैद्यकीय जन जागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी जल प्राधिकरणच्या निरूपयोगी पाण्याचा वापर टेकडीवर वृक्ष संवर्धनाला करण्यासाठी प्रशासकीय मदतीबाबत विचारणा केली असता नवाल यांनी अनुकूलता दर्शविली. टेकडीवर जलसाठ्यासाठी तळे तयार करता यावे म्हणून वर्धेकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय जनजागृती मंचने केले. यावेळी वैद्यकीय जनजागृती मंचचे श्रमदान करणारे तथा एमएसएमआरचे सदस्य उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी) टेकडीवर जलसाठ्यासाठी केले जाताहेत प्रयत्न वैद्यकीय जनजागृती मंचाने भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन हनुमान टेकडीवर जल पुनर्भरण प्रकल्प राबविला. यात श्रमदानातून चर तयार करून वृक्षारोपणही केले. शिवाय तारांचे कुंपणही करण्यात आले. या प्रकल्पाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल व न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी भेट देत पाहणी केली. याप्रसंगी वृक्ष संवर्धनासाठी टेकडीवर जलसाठा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.