शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

स्वस्त धान्य दुकानातून साखरेचा पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:31 IST

ऐन सणांच्या दिवसांत रेशन दुकानांतील साखर बेपत्ता झाली आहे. गरीब नागरिकांना खुल्या बाजारातून महागडी साखर खरेदी करणे शक्य नाही. परिणामी, गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी सण साजरा करता येणार नाही.

ठळक मुद्देशिधापत्रिका धारक गरजू नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ऐन सणांच्या दिवसांत रेशन दुकानांतील साखर बेपत्ता झाली आहे. गरीब नागरिकांना खुल्या बाजारातून महागडी साखर खरेदी करणे शक्य नाही. परिणामी, गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी सण साजरा करता येणार नाही. शासन, प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानात साखर उपलब्ध करून देत ती गोरगरीबांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी शिधापत्रिका धारक नागरिकांकडून करण्यात आली आहे.मुख्य सणांच्या दिवसांत बिपीएल कार्ड धारकांची साखर बंद करण्यात आली आहे. केवळ अंत्योदय कार्ड धारकांना साखर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय चुकीचा तथा बीपीएल कार्डधारकांवर अन्याय करणारा आहे. यामुळे अनेक गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी हे सण साखरेअभावी साजरे करणे कठीण होणार आहे. यामुळे सर्वच कार्ड धारकांना साखर देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अनेक बीपीएल कार्ड धारकांच्या शिधापत्रिकांवर अद्याप बिपीएलचा शिक्का मारलेला नाही. यामुळे खरे गरजू बिपीएलच्या धान्यापासून वंचित राहत आहेत. त्यांच्या कार्डवर शिक्का मारण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करून गरजू लाभार्थ्यांना दारिद्र रेषेखालील यादीत सामावून घ्यावे. यामुळे विधवा, परित्यक्त्या महिला यांना निराधार योजनेचे लाभ घेणे सोईस्कर होऊ शकणार आहे. केसरी कार्ड धारकांना मागील तीन वर्षांपासून धान्य देणे बंद करण्यात आले आहे. त्या सर्व केसरी कार्ड धारकांना धान्य देण्यात यावे. नवीन कार्ड काढताना कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही वर्षभर कार्ड दिले जात नाही. यामुळे स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी, ऐपत नसताना त्यांना महागडे धान्य घेऊन गुजराण करावे लागत आहे.कित्येक नागरिकांना वयाची पन्नाशी गाठल्यानंतरही शिधापत्रिकाच उपलब्ध झाल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यांनाही नाव कमी करून आणण्याकरिता सांगितले जाते. अशा नागरिकांना दाखले दिले जात नाहीत. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्व नागरिकांकडून शपथपत्र घेऊन त्यांना शिधापत्रिका देण्यात याव्या. अर्ज करणाºया नागरिकांना अर्ज केल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांत स्वस्त धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.शिधापत्रिकांतील अनागोंदीमुळे गरजू नागरिकांना हक्काच्या स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाचेही या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.