शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

स्वस्त धान्य दुकानातून साखरेचा पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:31 IST

ऐन सणांच्या दिवसांत रेशन दुकानांतील साखर बेपत्ता झाली आहे. गरीब नागरिकांना खुल्या बाजारातून महागडी साखर खरेदी करणे शक्य नाही. परिणामी, गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी सण साजरा करता येणार नाही.

ठळक मुद्देशिधापत्रिका धारक गरजू नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ऐन सणांच्या दिवसांत रेशन दुकानांतील साखर बेपत्ता झाली आहे. गरीब नागरिकांना खुल्या बाजारातून महागडी साखर खरेदी करणे शक्य नाही. परिणामी, गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी सण साजरा करता येणार नाही. शासन, प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानात साखर उपलब्ध करून देत ती गोरगरीबांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी शिधापत्रिका धारक नागरिकांकडून करण्यात आली आहे.मुख्य सणांच्या दिवसांत बिपीएल कार्ड धारकांची साखर बंद करण्यात आली आहे. केवळ अंत्योदय कार्ड धारकांना साखर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय चुकीचा तथा बीपीएल कार्डधारकांवर अन्याय करणारा आहे. यामुळे अनेक गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी हे सण साखरेअभावी साजरे करणे कठीण होणार आहे. यामुळे सर्वच कार्ड धारकांना साखर देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अनेक बीपीएल कार्ड धारकांच्या शिधापत्रिकांवर अद्याप बिपीएलचा शिक्का मारलेला नाही. यामुळे खरे गरजू बिपीएलच्या धान्यापासून वंचित राहत आहेत. त्यांच्या कार्डवर शिक्का मारण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करून गरजू लाभार्थ्यांना दारिद्र रेषेखालील यादीत सामावून घ्यावे. यामुळे विधवा, परित्यक्त्या महिला यांना निराधार योजनेचे लाभ घेणे सोईस्कर होऊ शकणार आहे. केसरी कार्ड धारकांना मागील तीन वर्षांपासून धान्य देणे बंद करण्यात आले आहे. त्या सर्व केसरी कार्ड धारकांना धान्य देण्यात यावे. नवीन कार्ड काढताना कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही वर्षभर कार्ड दिले जात नाही. यामुळे स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी, ऐपत नसताना त्यांना महागडे धान्य घेऊन गुजराण करावे लागत आहे.कित्येक नागरिकांना वयाची पन्नाशी गाठल्यानंतरही शिधापत्रिकाच उपलब्ध झाल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यांनाही नाव कमी करून आणण्याकरिता सांगितले जाते. अशा नागरिकांना दाखले दिले जात नाहीत. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्व नागरिकांकडून शपथपत्र घेऊन त्यांना शिधापत्रिका देण्यात याव्या. अर्ज करणाºया नागरिकांना अर्ज केल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांत स्वस्त धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.शिधापत्रिकांतील अनागोंदीमुळे गरजू नागरिकांना हक्काच्या स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाचेही या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.