शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

स्वस्त धान्य दुकानातून साखरेचा पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:31 IST

ऐन सणांच्या दिवसांत रेशन दुकानांतील साखर बेपत्ता झाली आहे. गरीब नागरिकांना खुल्या बाजारातून महागडी साखर खरेदी करणे शक्य नाही. परिणामी, गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी सण साजरा करता येणार नाही.

ठळक मुद्देशिधापत्रिका धारक गरजू नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ऐन सणांच्या दिवसांत रेशन दुकानांतील साखर बेपत्ता झाली आहे. गरीब नागरिकांना खुल्या बाजारातून महागडी साखर खरेदी करणे शक्य नाही. परिणामी, गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी सण साजरा करता येणार नाही. शासन, प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानात साखर उपलब्ध करून देत ती गोरगरीबांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी शिधापत्रिका धारक नागरिकांकडून करण्यात आली आहे.मुख्य सणांच्या दिवसांत बिपीएल कार्ड धारकांची साखर बंद करण्यात आली आहे. केवळ अंत्योदय कार्ड धारकांना साखर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय चुकीचा तथा बीपीएल कार्डधारकांवर अन्याय करणारा आहे. यामुळे अनेक गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी हे सण साखरेअभावी साजरे करणे कठीण होणार आहे. यामुळे सर्वच कार्ड धारकांना साखर देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अनेक बीपीएल कार्ड धारकांच्या शिधापत्रिकांवर अद्याप बिपीएलचा शिक्का मारलेला नाही. यामुळे खरे गरजू बिपीएलच्या धान्यापासून वंचित राहत आहेत. त्यांच्या कार्डवर शिक्का मारण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करून गरजू लाभार्थ्यांना दारिद्र रेषेखालील यादीत सामावून घ्यावे. यामुळे विधवा, परित्यक्त्या महिला यांना निराधार योजनेचे लाभ घेणे सोईस्कर होऊ शकणार आहे. केसरी कार्ड धारकांना मागील तीन वर्षांपासून धान्य देणे बंद करण्यात आले आहे. त्या सर्व केसरी कार्ड धारकांना धान्य देण्यात यावे. नवीन कार्ड काढताना कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही वर्षभर कार्ड दिले जात नाही. यामुळे स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी, ऐपत नसताना त्यांना महागडे धान्य घेऊन गुजराण करावे लागत आहे.कित्येक नागरिकांना वयाची पन्नाशी गाठल्यानंतरही शिधापत्रिकाच उपलब्ध झाल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यांनाही नाव कमी करून आणण्याकरिता सांगितले जाते. अशा नागरिकांना दाखले दिले जात नाहीत. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्व नागरिकांकडून शपथपत्र घेऊन त्यांना शिधापत्रिका देण्यात याव्या. अर्ज करणाºया नागरिकांना अर्ज केल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांत स्वस्त धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.शिधापत्रिकांतील अनागोंदीमुळे गरजू नागरिकांना हक्काच्या स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाचेही या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.