शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

अधीक्षक अभियंत्यांना बेशरमचे झाड भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:39 IST

सुरू असलेल्या भारनियमनाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. भारनियमनामुळे वेळीच पिकांना पाणी देता येत नसून शेतातील उभी पिके माना टाकत आहेत.

ठळक मुद्देशेतकरी संतप्त : २४ तास वीज पुरवठा करा, महावितरणची आंदोलकांविरूध्द पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरू असलेल्या भारनियमनाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. भारनियमनामुळे वेळीच पिकांना पाणी देता येत नसून शेतातील उभी पिके माना टाकत आहेत. शेतकºयांच्या कृषीपंपांना २४ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी संतप्त शेतकºयांनी महावितरणचे कार्यालय गाठून अधीक्षक अभियंतांच्या दालनात चक्क बेशरमाचे झाड ठेऊन महावितरणच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.तालुक्यातील गोजी येथील शेतकºयांनी भारनियमन तात्काळ बंद करून कृषीपंपांना २४ तास विद्युत पुरवठा देण्याची मागणी यावेळी रेटून धरली. यावेळी संपप्त शेतकºयांनी भारनियमन बंद करण्यासाठी अनेकवार निवेदन दिले. पण या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत शेतकºयांनी थेट महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांच्या टेबलवर बेशरमचे झाड ठेवले. इतकेच नव्हे तर आंदोलनकर्त्यांनी अधीक्षक अभियंत्यांच्या दालनातच ठिय्या दिला. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर कानाला फोन लावून अधीक्षक अभियंता देशपांडे यांनी दालनाबाहेर पळ काढला.आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून सिंचनावर भारनियमनाचा परिणाम होत असल्याने दिवसभर विद्युत पुरवठा करण्यात यावा, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेकरिता थ्री-फेज लाईन देण्यात यावी, गावठाणात थ्री-फेज फीडर बसविण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी मागण्यांवर चर्चा झाली. परंतु, चर्चेअंती संतप्त शेतकºयांचे समाधान न झाल्याने शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेतला. महावितरणच्या अधिकाºयांनी योग्य दखल न घेतल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविला.यावेळी जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. येत्या चार दिवसात मागण्यांवर विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देताना किशोर मुंगले, वसंता नालट, दिलीप सिंगम, आनंद वरभे, किसना हायगुणे, गजानन घोडमारे, राकेश जांभुळे, जसवंत जुमडे, अवतार ढगे, गजानन महाजन, चंद्रशेखर कावडे, दीपक झाडे, हरिभाऊ उघडे, आरिफ पठाण, रोशन कावडे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.मोर्चेकºयांकडून शिवीगाळ; महावितरणकडून तक्रार दाखलवर्धेच्या महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयावर विनापरवानगी मोर्चा नेत तेथील अधिकारी व कर्मचाºयांना शिवीगाळ करणाºया जमावाविरोधात महावितरण कडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. येत्या काळात असे प्रकार घडू नये म्हणून कार्यालयीन वेळेत पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी महावितरणकडून पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. कृषिपंपाच्या वेळेत बदल करून मिळावा या मागणीसाठी काही शेतकºयांनी बोरगाव नाका, येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा नेला. शेतीला दिवसाही वीजपुरवठ्याची मागणी मोर्चेकºयांकडून करण्यात आली. कृषी पंपाच्या वेळेत बदल करणे शक्य नसल्याने चिडलेल्या जमावाने महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाºयांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला. या प्रकरणी अखेर अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत येत्या काळात असे प्रकार घडू नये म्हणून कार्यालयीन वेळेत पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी केली.अधीक्षक अभियंत्यानी काढला पळसंतप्त शेतकºयांनी निवेदन दिल्यानंतर अधीक्षक अभियंता देशपांडे यांच्याशी आपल्या मागण्यांवर चर्चा केली. यावेळी आंदोलनकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अधीक्षक अभियंत्यांनी चर्चा अर्धवट सोडून फोन कानाला लावून दालनातून पळ काढला. त्यानंतर संतप्त शेतकºयांनी अभियंत्याच्या खुर्चीला निवेदन लावत टेबलावर बेशरमचे झाड ठेवून कार्यप्रणालीचा निषेध नोंदविला.