शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अधीक्षक अभियंत्यांना बेशरमचे झाड भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:39 IST

सुरू असलेल्या भारनियमनाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. भारनियमनामुळे वेळीच पिकांना पाणी देता येत नसून शेतातील उभी पिके माना टाकत आहेत.

ठळक मुद्देशेतकरी संतप्त : २४ तास वीज पुरवठा करा, महावितरणची आंदोलकांविरूध्द पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरू असलेल्या भारनियमनाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. भारनियमनामुळे वेळीच पिकांना पाणी देता येत नसून शेतातील उभी पिके माना टाकत आहेत. शेतकºयांच्या कृषीपंपांना २४ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी संतप्त शेतकºयांनी महावितरणचे कार्यालय गाठून अधीक्षक अभियंतांच्या दालनात चक्क बेशरमाचे झाड ठेऊन महावितरणच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.तालुक्यातील गोजी येथील शेतकºयांनी भारनियमन तात्काळ बंद करून कृषीपंपांना २४ तास विद्युत पुरवठा देण्याची मागणी यावेळी रेटून धरली. यावेळी संपप्त शेतकºयांनी भारनियमन बंद करण्यासाठी अनेकवार निवेदन दिले. पण या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत शेतकºयांनी थेट महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांच्या टेबलवर बेशरमचे झाड ठेवले. इतकेच नव्हे तर आंदोलनकर्त्यांनी अधीक्षक अभियंत्यांच्या दालनातच ठिय्या दिला. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर कानाला फोन लावून अधीक्षक अभियंता देशपांडे यांनी दालनाबाहेर पळ काढला.आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून सिंचनावर भारनियमनाचा परिणाम होत असल्याने दिवसभर विद्युत पुरवठा करण्यात यावा, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेकरिता थ्री-फेज लाईन देण्यात यावी, गावठाणात थ्री-फेज फीडर बसविण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी मागण्यांवर चर्चा झाली. परंतु, चर्चेअंती संतप्त शेतकºयांचे समाधान न झाल्याने शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेतला. महावितरणच्या अधिकाºयांनी योग्य दखल न घेतल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविला.यावेळी जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. येत्या चार दिवसात मागण्यांवर विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देताना किशोर मुंगले, वसंता नालट, दिलीप सिंगम, आनंद वरभे, किसना हायगुणे, गजानन घोडमारे, राकेश जांभुळे, जसवंत जुमडे, अवतार ढगे, गजानन महाजन, चंद्रशेखर कावडे, दीपक झाडे, हरिभाऊ उघडे, आरिफ पठाण, रोशन कावडे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.मोर्चेकºयांकडून शिवीगाळ; महावितरणकडून तक्रार दाखलवर्धेच्या महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयावर विनापरवानगी मोर्चा नेत तेथील अधिकारी व कर्मचाºयांना शिवीगाळ करणाºया जमावाविरोधात महावितरण कडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. येत्या काळात असे प्रकार घडू नये म्हणून कार्यालयीन वेळेत पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी महावितरणकडून पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. कृषिपंपाच्या वेळेत बदल करून मिळावा या मागणीसाठी काही शेतकºयांनी बोरगाव नाका, येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा नेला. शेतीला दिवसाही वीजपुरवठ्याची मागणी मोर्चेकºयांकडून करण्यात आली. कृषी पंपाच्या वेळेत बदल करणे शक्य नसल्याने चिडलेल्या जमावाने महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाºयांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला. या प्रकरणी अखेर अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत येत्या काळात असे प्रकार घडू नये म्हणून कार्यालयीन वेळेत पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी केली.अधीक्षक अभियंत्यानी काढला पळसंतप्त शेतकºयांनी निवेदन दिल्यानंतर अधीक्षक अभियंता देशपांडे यांच्याशी आपल्या मागण्यांवर चर्चा केली. यावेळी आंदोलनकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अधीक्षक अभियंत्यांनी चर्चा अर्धवट सोडून फोन कानाला लावून दालनातून पळ काढला. त्यानंतर संतप्त शेतकºयांनी अभियंत्याच्या खुर्चीला निवेदन लावत टेबलावर बेशरमचे झाड ठेवून कार्यप्रणालीचा निषेध नोंदविला.