शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यापूर्वीच आठ जलाशये १० दलघमीच्या खाली

By admin | Updated: February 7, 2017 01:05 IST

हिवाळा संपत असून उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. उन्हाळा येताच जिल्ह्यात पाणीटंचाई डोकेवर काढणे आलेच.

जिल्ह्यात १४ जलाशये : उन्हाळ्यात भयावह स्थितीचे संकेतरूपेश खैरी चर्धाहिवाळा संपत असून उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. उन्हाळा येताच जिल्ह्यात पाणीटंचाई डोकेवर काढणे आलेच. गत उन्हाळ्याप्रमाणे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील जलाशयांना कोरड पडण्याची स्थिती आताच निर्माण झाली आहे. हिवाळ्याच्या शेवटातच आठ जलाशयातील साठा १० दलघमीपेक्षा कमी झाला आहे. यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्याची स्थिती भयावह होण्याचे संकेत आत्ताच मिळत आहे. यामुळे आतापासूनच पाण्याची बचत करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाण्याचा साठा करून ते सिंचनाकरिता आणि अन्य गरजा पूर्ण करण्याकरिता जिल्ह्यात एकूण १४ जलाशय आहेत. यातील सहा जलाशयात जलसाठा असला तरी पोथरा, पंचधरा, डोंगरगाव, मदन, मदन (उन्नई), लालनाला, कार व सुकळी या आठ जलाशयातील साठा आताच खालावल्याची स्थिती आहे. असे असले तरी यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात टंचाई जाणवणार नाही, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात केवळ धाम प्रकल्पात पिण्याच्या पाण्याचे आरक्षण असून इतर जलसाठ्यातील पाणी शेतीच्या सिंचनाकरिता आरक्षित असल्याची माहिती आहे. सिचनाकरिता पाणी सोडण्याची अंमित तारीख २८ फेब्रुवारी आहे. यामुळे शेतकऱ्यांची मागणी झाल्यास या काळापर्यंत पाणी पुरविणे शक्य आहे. मार्च महिन्यात पारा भडकण्यास सुरुवात होते. यामुळे या काळात पाण्याची पातळी खालविण्याची शक्यता अधिक असते. यंदा तर फेब्रुवारीच्या प्रारंभीपासूनच पारा चढत आहे. पहिल्याच आठवड्यात पारा ३५ अंशावर पोहोचल्याचे दिसून आले आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात यात आणखी वाढ होण्याचे संकेत आहे. पारा चढताच पाण्याची समस्या डोके काढणार यात शंका नाही. यामुळे वेळीच येणाऱ्या समस्येची दखल घेणे गरजेचे झाले आहे. पाण्याचा अपव्य टाळण्याची गरज उन्हाळा तोंडावर आला आहे. या दिवसात वर्धेत पाणीटंचाई डोके वर काढत असते. यावर आळा घालण्याकरिता आताच जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. जमिनीतून होणारा पाण्याचा उपसा कमी करून पाण्याचा होणारा अपव्यय रोखण्याकरिता आताच उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास यंदा काही काळ तरी पाणी टंचाईपासून मुक्ती मिळविणे शक्य आहे. पिण्याकरिता पाणी आरक्षितवर्धा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून नोंद असलेल्या धाम प्रकल्पात पिण्याकरिता पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. यात उपलब्ध जलसाठ्यातील २० मिमी पाणी नागरिकांची तहाण भागविण्याकरिता आरक्षित करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त येथे रेल्वेकरिता व उद्योगाकरिता पाणी आरक्षित असल्याची माहिती आहे. सध्या धाम प्रकल्पात ३१.४१ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. सिंचनाकरिता पाणी उपलब्ध सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. या हंगामाकरिता शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी कमी पडणार नसल्याची स्थिती आहे. सिंचनाकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. यात शेतकऱ्यांनी मागणी केल्यास त्यावर फेरविचार करून ही मुदत वाढविणे शक्य असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.