शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

उन्हाळ्यापूर्वीच आठ जलाशये १० दलघमीच्या खाली

By admin | Updated: February 7, 2017 01:05 IST

हिवाळा संपत असून उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. उन्हाळा येताच जिल्ह्यात पाणीटंचाई डोकेवर काढणे आलेच.

जिल्ह्यात १४ जलाशये : उन्हाळ्यात भयावह स्थितीचे संकेतरूपेश खैरी चर्धाहिवाळा संपत असून उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. उन्हाळा येताच जिल्ह्यात पाणीटंचाई डोकेवर काढणे आलेच. गत उन्हाळ्याप्रमाणे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील जलाशयांना कोरड पडण्याची स्थिती आताच निर्माण झाली आहे. हिवाळ्याच्या शेवटातच आठ जलाशयातील साठा १० दलघमीपेक्षा कमी झाला आहे. यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्याची स्थिती भयावह होण्याचे संकेत आत्ताच मिळत आहे. यामुळे आतापासूनच पाण्याची बचत करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाण्याचा साठा करून ते सिंचनाकरिता आणि अन्य गरजा पूर्ण करण्याकरिता जिल्ह्यात एकूण १४ जलाशय आहेत. यातील सहा जलाशयात जलसाठा असला तरी पोथरा, पंचधरा, डोंगरगाव, मदन, मदन (उन्नई), लालनाला, कार व सुकळी या आठ जलाशयातील साठा आताच खालावल्याची स्थिती आहे. असे असले तरी यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात टंचाई जाणवणार नाही, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात केवळ धाम प्रकल्पात पिण्याच्या पाण्याचे आरक्षण असून इतर जलसाठ्यातील पाणी शेतीच्या सिंचनाकरिता आरक्षित असल्याची माहिती आहे. सिचनाकरिता पाणी सोडण्याची अंमित तारीख २८ फेब्रुवारी आहे. यामुळे शेतकऱ्यांची मागणी झाल्यास या काळापर्यंत पाणी पुरविणे शक्य आहे. मार्च महिन्यात पारा भडकण्यास सुरुवात होते. यामुळे या काळात पाण्याची पातळी खालविण्याची शक्यता अधिक असते. यंदा तर फेब्रुवारीच्या प्रारंभीपासूनच पारा चढत आहे. पहिल्याच आठवड्यात पारा ३५ अंशावर पोहोचल्याचे दिसून आले आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात यात आणखी वाढ होण्याचे संकेत आहे. पारा चढताच पाण्याची समस्या डोके काढणार यात शंका नाही. यामुळे वेळीच येणाऱ्या समस्येची दखल घेणे गरजेचे झाले आहे. पाण्याचा अपव्य टाळण्याची गरज उन्हाळा तोंडावर आला आहे. या दिवसात वर्धेत पाणीटंचाई डोके वर काढत असते. यावर आळा घालण्याकरिता आताच जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. जमिनीतून होणारा पाण्याचा उपसा कमी करून पाण्याचा होणारा अपव्यय रोखण्याकरिता आताच उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास यंदा काही काळ तरी पाणी टंचाईपासून मुक्ती मिळविणे शक्य आहे. पिण्याकरिता पाणी आरक्षितवर्धा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून नोंद असलेल्या धाम प्रकल्पात पिण्याकरिता पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. यात उपलब्ध जलसाठ्यातील २० मिमी पाणी नागरिकांची तहाण भागविण्याकरिता आरक्षित करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त येथे रेल्वेकरिता व उद्योगाकरिता पाणी आरक्षित असल्याची माहिती आहे. सध्या धाम प्रकल्पात ३१.४१ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. सिंचनाकरिता पाणी उपलब्ध सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. या हंगामाकरिता शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी कमी पडणार नसल्याची स्थिती आहे. सिंचनाकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. यात शेतकऱ्यांनी मागणी केल्यास त्यावर फेरविचार करून ही मुदत वाढविणे शक्य असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.