शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

ग्रामीण भागात उन्हाळवाहिला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : पऱ्हाटीची उलंगवाडी झाली असली तरी काही प्रमाणात शेतात कापूस आहेच. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे पऱ्हाटी उत्पादकांना जबर फटका बसला. येत्या वर्षांत या बोंडअळीचा प्रभाव कायम राहू नये याकरिता असलेली पऱ्हाटी जाळून त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रकार शेतकऱ्यांकडून उन्हाळवाहीदरम्यान करण्यात येत आहे. येत्या कडक उन्हात मातीत असलेल्या अळ्या ...

ठळक मुद्देबोंडअळीवर नियंत्रणाकरिता शेतकरी सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : पऱ्हाटीची उलंगवाडी झाली असली तरी काही प्रमाणात शेतात कापूस आहेच. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे पऱ्हाटी उत्पादकांना जबर फटका बसला. येत्या वर्षांत या बोंडअळीचा प्रभाव कायम राहू नये याकरिता असलेली पऱ्हाटी जाळून त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रकार शेतकऱ्यांकडून उन्हाळवाहीदरम्यान करण्यात येत आहे. येत्या कडक उन्हात मातीत असलेल्या अळ्या इतर किडे मरतील असा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहे.विदर्भातील पांढरे सोने अशी कापसाची ओळख आहे. पण गत काही वर्षांपासून कापूस शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसते. याला सरकार, शासन यांच्या धोरणा बरोबर बळीराजाचा सरकार वरील विश्वास कारणीभूत ठरला. नविन बियाणे, खते व किटकनाशके यातून अनेक नुकसानादायी घटना यंदाच्या वर्षांत घडल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी पऱ्हाटी काढण्याच्य कामाला प्रारंभ झाला आहे. तर बऱ्याच शेतात अजूनही कापूस असून शेतकºयांची मजुरीकरिता भटकंती सुरू आहे. शेतकरी हा अनुभवी आहे.यंदाच्या हंगामात बोंड अळीपासून धोक्याची कल्पना लक्षात आली. उलंगवाडी होताच पºहाटी काढणे, ढिग लाऊन ते जाळणे सुरू केली आहे. नांगरणी दिवसाला केल्यास ऊन्हाची दाहकता आणि पक्षांमुळे अळ्यांच्या कोषचा नायनाट होईल, असा दुहेरी फायदा लक्षात घेऊन शेतकरी कामाला जुंपला आहे. हमदापूर, वघाळा आदी शिवारात पराटी जमा करणे, पेटवणे आणि नांगरणीची कामे आणि यात पक्षी अळ्या खातांना दिसत आहे.