शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सुकन्या योजना संभ्रमात

By admin | Updated: July 8, 2015 02:24 IST

स्त्री जन्माच्या स्वागताकरिता शासनाच्यावतीने सुकन्या योजना सुरू केली. या योजनेच्या अंमलबजावणीत सुसुत्रता नसल्याने संभ्रम निर्माण होत आहे.

जिल्ह्यात ६७४ मुलींची नोंद : पुराव्याअभावी पालकांत गोंधळपराग मगर वर्धास्त्री जन्माच्या स्वागताकरिता शासनाच्यावतीने सुकन्या योजना सुरू केली. या योजनेच्या अंमलबजावणीत सुसुत्रता नसल्याने संभ्रम निर्माण होत आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता नोंदणी करणाऱ्या पालकांकडे कुठलाही पुरावा नसल्याने मिळणारा लाभ कुठे व कसा मिळेल या संदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे. शासनाच्या महिला व बालविकास विभागाद्वारे १ जानेवारी २०१४ रोजी योजनेची मुहूर्तमेढ रोवली. या तारखेनंतर जन्मलेल्या अर्थिक दुर्बल घटकातील मुलींना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ग्रामीण भागातून ५५० तर शहरी भागातून १२४ मुलींची सुकन्या म्हणून नोंदही कारण्यात आली आहे. योजनेत नोंद करणाऱ्या मुलीला तिच्या वयाच्या १८ व्या वर्षी एक लाख रुपये मिळणार आहेत. १ जानेवारी २०१४ नंतर जन्मलेल्या मुलींच्या नावे जन्मत:च एक वर्षाच्या आत २१ हजार २०० रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे ‘जन्मत: मुलगी लाखाची धनी’ असा प्रचार योजनेमार्फत झाला. एकात्मिक विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांना अशा मुली शोधत त्यांच्या पालकांकरवी योजनेचा अर्ज भरून घ्यावयाचा आहे; परंतु अर्ज भरताना ही रक्कम कशी मिळेल, त्यासाठी नंतर काय करावे याची कुठलीही माहिती पालकांना देण्यात येत नाही. समाजोपयोगी असलेल्या या योजनेबाबत शासनाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाही विशेष माहिती नसल्याने ती कुचकामी ठरत आहे. योजनेत एकात्मिक बाल विकास प्रकल्पात नागरी आणि ग्रामीण असे दोन विभाग आहेत. यातील शहरी भागाची माहिती एकात्मिक विकास प्रकल्प (नागरी) तर ग्रामीण भागाची माहिती जि.प. अंतर्गत पाठविली जाते. यामुळे गोंधळ उडत आहे.जिल्ह्यातील एकही प्रकरण आयुर्विमा महामंडळात नाही ?मुलगी जन्मत: या योजनेत एक वर्षाच्या आत तिच्या नावे २१ हजार २०० रुपये आयुर्विमा महामंडळात जमा केले जाणार होते. जि. प. वर्धा येथील महिला व बालकल्याण विभागाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीवरून ५५० नावे नागपूर विभागाकडे पाठविण्यात आली. यातील एकाही प्रकरणात ही रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे जमा होणारे २१ हजार २०० रुपये गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधितांकडून केवळ माहिती नागपूर विभागाला पाठविल्याचे सांगण्यात येते. यामुळे योजनेच्या संकल्पनेवरच प्रश्न निर्माण होत आहे. केवळ आधार कार्डाचाच पुरावा अर्ज भरताना शासकीय निकषाप्रमाणे आई वडिलांचा रहिवासी दाखला, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र आणि दुसरे अपत्य असल्यास कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र आदीची पूर्तता करणे आवश्यक आहे. यात मिळणाऱ्या रकमेबाबत अधिकारी केवळ आधार कार्डाचा पुरावा देत आहेत. आधारद्वारे संपूर्ण माहिती शासनाकडे राहणार असल्याचे सांगण्यात येते. आधारचा घोळ बघता आणि पैसे जमा होण्याची कुठलीही ठोस व्यवस्था नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.