शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

सणाच्या दिवसांत स्वस्त धान्य दुकानातून साखर बेपत्ता

By admin | Updated: November 2, 2016 00:37 IST

दिवाळीनिमित्त प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थ तयार केले जातात. समाजातील दुर्बल घटकांचीही दिवाळी चांगली व्हावी

गरजवंतांची भटकंती : काळ्या बाजाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष वर्धा : दिवाळीनिमित्त प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थ तयार केले जातात. समाजातील दुर्बल घटकांचीही दिवाळी चांगली व्हावी म्हणून शासनाच्यावतीने स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत साखरेचा वेळीच पुरवठा करण्यात आला; पण प्राप्त झालेली साखर अनेक गरजवंतांना मिळाली नसल्याची ओरड होत असल्याने दिवाळीच्या दिवसांमध्ये शासकीय धान्यासह साखरेचा काळाबाजार करणारी टोळी सक्रीय असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील ८३८ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या गरजुंंना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सवलतीच्या दरात धान्यसाठा व साखर दिली जाते. गत १० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यासाठी १० हजार ९०१ क्विंटल साखर साठा प्राप्त झाला. दिवाळीच्या पूर्वी प्राप्त झालेला धान्य व साखर साठा स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचविण्यात आला; पण गरिबांच्या वाट्याची साखर अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी गरजुंना वाटप न करताच ती चढ्या भावात व्यापाऱ्यांना विकल्याची ओरड होत आहे. दिवाळीच्या पूर्वी मिळणारी साखरच दुर्बल घटकांना मिळाली नसल्याने त्यांना सणाच्या दिवसांत गोड पदार्थांपासून मुकावे लागले. यामुळे जिल्ह्यात होत असलेला साखरेचा काळा बाजार थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.(शहर प्रतिनिधी) जिल्ह्यात ९२ हजार लाभार्थीदारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रती महिना स्वस्त धान्य दुकानातून ५०० ग्रॅम साखर दिली जाते. स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात साखर प्राप्त करणाऱ्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील ४७ हजार ५७४ तर अंत्योदय योजनेच्या ४४,२४० लाभार्थ्यांचा समावेश आहे.जिल्ह्याला १,०२५ क्विंटल साखर प्राप्तयंदा जानेवारी महिन्यात जिल्ह्याला १०२५ क्विंटल साखर प्राप्त झाली असून ती स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत पोहोचविण्यात आली. फेब्रुवारीत १०२५ क्विंटल साखर उपलब्ध होती. त्यापैकी १०२४.८५ क्विंटल साखरेची उचल करून वाटप करण्यात आली. मार्च, एप्रिल व मे महिन्यात प्रती महिना १०२५ क्विंटल साखर प्राप्त झाली व ती वाटप करण्यात आली. जून महिन्यात १०२५ पैकी १०२४.९२ क्विंटल साखरेची उचल करून वाटप करण्यात आली. जुलै महिन्यात १०२५ पैकी १०२४ क्विंटल, आॅगस्ट महिन्यात १०२५ पैकी १०२४.३१ क्विंटल साखरेची उचल करून वाटप करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात १३५३ क्विंटल साखरचे वितरण करण्यात आले. आॅक्टोबर महिन्यात १३५१.७०४ क्विंटल साखर प्राप्त झाली असून त्याचा वाटप झाल्याचे सांगण्यात आले आहे.