शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

त्रिसूत्रीच्या माध्यमातून यश संपादन करता येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:11 IST

नॅक मूल्यांकनाची पध्दती म्हणजे एक प्रकारे परीक्षाच होय तेव्हा नॅक मूल्यांकन रूपी परीक्षेत शहाणपण, चतुरता व कल्पकता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून यश संपादन करता येऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिध्दार्थविनायक काणे यांनी केले.

ठळक मुद्देसिध्दार्थविनायक काणे : दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : नॅक मूल्यांकनाची पध्दती म्हणजे एक प्रकारे परीक्षाच होय तेव्हा नॅक मूल्यांकन रूपी परीक्षेत शहाणपण, चतुरता व कल्पकता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून यश संपादन करता येऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिध्दार्थविनायक काणे यांनी केले.स्थानिक विद्याभारती महाविद्यालय सेलू येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.जी.भोयर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू डॉ.सिध्दार्थविनायक काणे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय एस.कानोडे, चर्चासत्राचे संयोजक डॉ.आशिष टिपले व प्रा.वैभव पिंपळे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.संजय एस कानोडे यांनी केले. चर्चासत्राची आवश्यकता विशद करतांनाच ग्रामीण भागातील महाविद्यालयांकरिता सदर चर्चासत्र उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तर उद्घाटनीय भाषणातून डॉ.सिध्दार्थविनायक काणे यांनी रा.तु.म.नागपूर विद्यापीठात विविध पदांंवर काम करतांनाचे अनुभव कथन करतांनाच नॅक मूल्यांकन प्रणाली व नॅक संस्थेवर प्रकाश टाकला. नॅक संस्थेव्दारे करण्यात येणारे मूल्यांकन विद्यापीठ व महाविद्यालयांसाठी अत्यंत महत्वपुर्ण प्रक्रिया आहे. त्यामुळे निश्चितच विद्यापीठांचा व महाविद्यालयांचा दर्जा सुधारणार आहे परंतु या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान काही महत्वाच्या गोष्टींचा विचार होणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण व शहरी भागातील महाविद्यालयांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मूल्यांकन होणे आवश्यक आहे असे मत डॉ.आर.जी.भोयर यांनी व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी पूणे विद्यापीठाचे डॉ. शिरीष चिंधाडे, डॉ. व्ही. आर. शिंगुस्कर पूणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.वसीम खान यांनी केले तर आभार डॉ.आशिष टिपले यांनी मानले. सदर चर्चासत्राकरिता विविध राज्यातून तसेच राज्यातील मुंबई, नागपूर, अमरावती, गोंडवाना, पुणे या सारख्या महत्वपुर्ण विद्यापीठासह इतरही विद्यापीठातील प्राचार्य, प्राध्यापक व आय.क्यू.ए.सी प्रमुखांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. यावेळी अनेक प्राध्यापकांनी आपले शोधनिवंध या चर्चासत्रात सादर केले. त्यावर मंथन करण्यात आले.