शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

त्रिसूत्रीच्या माध्यमातून यश संपादन करता येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:11 IST

नॅक मूल्यांकनाची पध्दती म्हणजे एक प्रकारे परीक्षाच होय तेव्हा नॅक मूल्यांकन रूपी परीक्षेत शहाणपण, चतुरता व कल्पकता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून यश संपादन करता येऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिध्दार्थविनायक काणे यांनी केले.

ठळक मुद्देसिध्दार्थविनायक काणे : दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : नॅक मूल्यांकनाची पध्दती म्हणजे एक प्रकारे परीक्षाच होय तेव्हा नॅक मूल्यांकन रूपी परीक्षेत शहाणपण, चतुरता व कल्पकता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून यश संपादन करता येऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिध्दार्थविनायक काणे यांनी केले.स्थानिक विद्याभारती महाविद्यालय सेलू येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.जी.भोयर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू डॉ.सिध्दार्थविनायक काणे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय एस.कानोडे, चर्चासत्राचे संयोजक डॉ.आशिष टिपले व प्रा.वैभव पिंपळे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.संजय एस कानोडे यांनी केले. चर्चासत्राची आवश्यकता विशद करतांनाच ग्रामीण भागातील महाविद्यालयांकरिता सदर चर्चासत्र उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तर उद्घाटनीय भाषणातून डॉ.सिध्दार्थविनायक काणे यांनी रा.तु.म.नागपूर विद्यापीठात विविध पदांंवर काम करतांनाचे अनुभव कथन करतांनाच नॅक मूल्यांकन प्रणाली व नॅक संस्थेवर प्रकाश टाकला. नॅक संस्थेव्दारे करण्यात येणारे मूल्यांकन विद्यापीठ व महाविद्यालयांसाठी अत्यंत महत्वपुर्ण प्रक्रिया आहे. त्यामुळे निश्चितच विद्यापीठांचा व महाविद्यालयांचा दर्जा सुधारणार आहे परंतु या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान काही महत्वाच्या गोष्टींचा विचार होणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण व शहरी भागातील महाविद्यालयांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मूल्यांकन होणे आवश्यक आहे असे मत डॉ.आर.जी.भोयर यांनी व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी पूणे विद्यापीठाचे डॉ. शिरीष चिंधाडे, डॉ. व्ही. आर. शिंगुस्कर पूणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.वसीम खान यांनी केले तर आभार डॉ.आशिष टिपले यांनी मानले. सदर चर्चासत्राकरिता विविध राज्यातून तसेच राज्यातील मुंबई, नागपूर, अमरावती, गोंडवाना, पुणे या सारख्या महत्वपुर्ण विद्यापीठासह इतरही विद्यापीठातील प्राचार्य, प्राध्यापक व आय.क्यू.ए.सी प्रमुखांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. यावेळी अनेक प्राध्यापकांनी आपले शोधनिवंध या चर्चासत्रात सादर केले. त्यावर मंथन करण्यात आले.