शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

त्रिसूत्रीच्या माध्यमातून यश संपादन करता येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:11 IST

नॅक मूल्यांकनाची पध्दती म्हणजे एक प्रकारे परीक्षाच होय तेव्हा नॅक मूल्यांकन रूपी परीक्षेत शहाणपण, चतुरता व कल्पकता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून यश संपादन करता येऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिध्दार्थविनायक काणे यांनी केले.

ठळक मुद्देसिध्दार्थविनायक काणे : दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : नॅक मूल्यांकनाची पध्दती म्हणजे एक प्रकारे परीक्षाच होय तेव्हा नॅक मूल्यांकन रूपी परीक्षेत शहाणपण, चतुरता व कल्पकता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून यश संपादन करता येऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिध्दार्थविनायक काणे यांनी केले.स्थानिक विद्याभारती महाविद्यालय सेलू येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.जी.भोयर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू डॉ.सिध्दार्थविनायक काणे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय एस.कानोडे, चर्चासत्राचे संयोजक डॉ.आशिष टिपले व प्रा.वैभव पिंपळे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.संजय एस कानोडे यांनी केले. चर्चासत्राची आवश्यकता विशद करतांनाच ग्रामीण भागातील महाविद्यालयांकरिता सदर चर्चासत्र उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तर उद्घाटनीय भाषणातून डॉ.सिध्दार्थविनायक काणे यांनी रा.तु.म.नागपूर विद्यापीठात विविध पदांंवर काम करतांनाचे अनुभव कथन करतांनाच नॅक मूल्यांकन प्रणाली व नॅक संस्थेवर प्रकाश टाकला. नॅक संस्थेव्दारे करण्यात येणारे मूल्यांकन विद्यापीठ व महाविद्यालयांसाठी अत्यंत महत्वपुर्ण प्रक्रिया आहे. त्यामुळे निश्चितच विद्यापीठांचा व महाविद्यालयांचा दर्जा सुधारणार आहे परंतु या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान काही महत्वाच्या गोष्टींचा विचार होणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण व शहरी भागातील महाविद्यालयांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मूल्यांकन होणे आवश्यक आहे असे मत डॉ.आर.जी.भोयर यांनी व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी पूणे विद्यापीठाचे डॉ. शिरीष चिंधाडे, डॉ. व्ही. आर. शिंगुस्कर पूणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.वसीम खान यांनी केले तर आभार डॉ.आशिष टिपले यांनी मानले. सदर चर्चासत्राकरिता विविध राज्यातून तसेच राज्यातील मुंबई, नागपूर, अमरावती, गोंडवाना, पुणे या सारख्या महत्वपुर्ण विद्यापीठासह इतरही विद्यापीठातील प्राचार्य, प्राध्यापक व आय.क्यू.ए.सी प्रमुखांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. यावेळी अनेक प्राध्यापकांनी आपले शोधनिवंध या चर्चासत्रात सादर केले. त्यावर मंथन करण्यात आले.