शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बियाणे कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:19 IST

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यासह सर्वत्र कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. या भयावह स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बियाणे कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये शासकीय मदत द्यावी,....

ठळक मुद्देभाजपा किसान मोर्चाची मागणी : एकरी २५ हजारांची मदत गरजेची

वर्धा : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यासह सर्वत्र कपाशी उत्पादक शेतकºयांची चिंता वाढली आहे. यंदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. या भयावह स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बियाणे कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये शासकीय मदत द्यावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाने केली.जिल्ह्यात मागील वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत कापसाची ९ लाख ५६ हजार क्विंटल इतकी आवक झाली होती. यंदा ही आवक ३ लाख ४७ हजार इतकीच झाली आहे. एका अमेरिकन कंपनीने बीटी कपाशीचा बीजी ११ हे वाण प्रसारित केली. अनेक वर्षांपासून याची रॉयल्टी सदर कंपनी घेत आहे. रॉयल्टीच्या नावावर कंपनीने अब्जो रुपये घेतले आहे. यामुळे बोंडअळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीद्वारे भरपाई मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे वा शासनाने एकरी २५ हजार रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी केली. याबाबत बुधवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली. यावेळी प्रशांत इंगळे तिगांवकर, जयंत येरावार, माजी जि.प. सभापती मिलिंद भेंडे, जयंत कावळे, नंदू झोटींग, महेश आगे, दिनकर उमक, गंगाधर डाखोळे, कवडू महल्ले, नामदेव पाटील, आदी उपस्थित होते.फेर पैसेवारीचे आदेश द्याजिल्हा प्रशासनाने पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक काढली. अंतिम पैसेवारीमध्ये बोंडअळीग्रस्त कपाशी, सोयाबीनची नापिकी याचा विचार करता पैसेवारी ३० टक्के पेक्षाही कमी येते. यामुळे फेर आकारणीकरिता योग्य आदेश द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.जिल्हाधिकाºयांना दिले कपाशीचे बोंडबोंडअळीच्या वास्तवाबाबत जिल्हा प्रशासनाला अवगत करण्यासाठी कपाशी उत्पादक शेतकºयांनी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शाह यांना कपाशीचे बोंड भेट दिले. यावेळी त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना केली.