शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

बियाणे कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:19 IST

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यासह सर्वत्र कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. या भयावह स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बियाणे कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये शासकीय मदत द्यावी,....

ठळक मुद्देभाजपा किसान मोर्चाची मागणी : एकरी २५ हजारांची मदत गरजेची

वर्धा : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यासह सर्वत्र कपाशी उत्पादक शेतकºयांची चिंता वाढली आहे. यंदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. या भयावह स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बियाणे कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये शासकीय मदत द्यावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाने केली.जिल्ह्यात मागील वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत कापसाची ९ लाख ५६ हजार क्विंटल इतकी आवक झाली होती. यंदा ही आवक ३ लाख ४७ हजार इतकीच झाली आहे. एका अमेरिकन कंपनीने बीटी कपाशीचा बीजी ११ हे वाण प्रसारित केली. अनेक वर्षांपासून याची रॉयल्टी सदर कंपनी घेत आहे. रॉयल्टीच्या नावावर कंपनीने अब्जो रुपये घेतले आहे. यामुळे बोंडअळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीद्वारे भरपाई मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे वा शासनाने एकरी २५ हजार रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी केली. याबाबत बुधवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली. यावेळी प्रशांत इंगळे तिगांवकर, जयंत येरावार, माजी जि.प. सभापती मिलिंद भेंडे, जयंत कावळे, नंदू झोटींग, महेश आगे, दिनकर उमक, गंगाधर डाखोळे, कवडू महल्ले, नामदेव पाटील, आदी उपस्थित होते.फेर पैसेवारीचे आदेश द्याजिल्हा प्रशासनाने पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक काढली. अंतिम पैसेवारीमध्ये बोंडअळीग्रस्त कपाशी, सोयाबीनची नापिकी याचा विचार करता पैसेवारी ३० टक्के पेक्षाही कमी येते. यामुळे फेर आकारणीकरिता योग्य आदेश द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.जिल्हाधिकाºयांना दिले कपाशीचे बोंडबोंडअळीच्या वास्तवाबाबत जिल्हा प्रशासनाला अवगत करण्यासाठी कपाशी उत्पादक शेतकºयांनी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शाह यांना कपाशीचे बोंड भेट दिले. यावेळी त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना केली.