शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
3
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
4
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
5
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
6
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
7
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
8
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
9
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
10
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
11
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
12
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
13
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
14
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
15
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
16
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
17
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
18
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:44 IST

मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाबाबद हवामान खाते सातत्याने खोटी माहिती देत आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. हवामान खात्याच्या तुगलकी कारभारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची भीती असल्याने हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रहारची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाबाबद हवामान खाते सातत्याने खोटी माहिती देत आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. हवामान खात्याच्या तुगलकी कारभारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची भीती असल्याने हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.मागील काही दिवसांपासून हवामान खाते रोज काहीतरी खोटनाट बोलून शेतकरी व जनतेची बोळवण करीत आहे. मागील एक महिन्यांपासून आज किंवा उद्या पाऊस येईल, सहा दिवसांनी मान्सूनचे आगमन होईल, असे सांगत आहे. तर कधी १५ जुलै नंतर पावसाची शक्यता याच हवामान खात्याने वर्तविली होती. हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीमुळे काही शेतकऱ्यांनी कपाशीची लावण केली आहे. परंतु, अद्यापही जोरदार पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. हवामान खाते उलटसुटल माहिती देऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकत असल्याने यावर्षीही शेतकऱ्यांना नापिकी तसेच दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे खोटे बोलणाऱ्या हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे, भुषण येलेकार, वैभव शेंडे, रोशन दाभाडे, दादा बोरकर, प्रशिल धांदे, शुभम भोयर, प्रितम कातकीडे, नितीन काटकर, सचिन कोळसे, विवेक ठाकरे, बीपीन मोघे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी