शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:44 IST

मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाबाबद हवामान खाते सातत्याने खोटी माहिती देत आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. हवामान खात्याच्या तुगलकी कारभारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची भीती असल्याने हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रहारची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाबाबद हवामान खाते सातत्याने खोटी माहिती देत आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. हवामान खात्याच्या तुगलकी कारभारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची भीती असल्याने हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.मागील काही दिवसांपासून हवामान खाते रोज काहीतरी खोटनाट बोलून शेतकरी व जनतेची बोळवण करीत आहे. मागील एक महिन्यांपासून आज किंवा उद्या पाऊस येईल, सहा दिवसांनी मान्सूनचे आगमन होईल, असे सांगत आहे. तर कधी १५ जुलै नंतर पावसाची शक्यता याच हवामान खात्याने वर्तविली होती. हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीमुळे काही शेतकऱ्यांनी कपाशीची लावण केली आहे. परंतु, अद्यापही जोरदार पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. हवामान खाते उलटसुटल माहिती देऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकत असल्याने यावर्षीही शेतकऱ्यांना नापिकी तसेच दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे खोटे बोलणाऱ्या हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे, भुषण येलेकार, वैभव शेंडे, रोशन दाभाडे, दादा बोरकर, प्रशिल धांदे, शुभम भोयर, प्रितम कातकीडे, नितीन काटकर, सचिन कोळसे, विवेक ठाकरे, बीपीन मोघे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी