शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

बससाठी विद्यार्थ्यांची सायंकाळपर्यंत फरफट

By admin | Updated: September 29, 2014 23:10 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वेळापत्रक केवळ भिंतीची शोभा वाढविणारे ठरत असल्याच्या प्रत्यय येथील विद्यार्थ्यांना वारंवार येतो. मात्र संबंधित विभागाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही

आकोली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वेळापत्रक केवळ भिंतीची शोभा वाढविणारे ठरत असल्याच्या प्रत्यय येथील विद्यार्थ्यांना वारंवार येतो. मात्र संबंधित विभागाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही केली जात नाही. यामुळे या शाळकरी विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतरही सायंकाळपर्यंत नाहक प्रतीक्षा करावी लागते. विभागाकडून बसकरिता केलेले वेळापत्रकाचे पालन होत नाही. हे यावरुन दिसून येते. मात्र यात विद्यार्थ्यांची नाहक फरफट होत आहे. यामुळे विद्यार्थी व पालकवर्गात संताप व्यक्त होत आहे. परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाकरिता नियमित शहरात येतात. येथील ग्रामीण भागात सातवी पर्यंत शाळा असल्याने पुढील शिक्षणाकरिता शहर गाठावे लागते. हे विद्यार्थी अप-डाऊन करीत असल्याने त्यांना बसवर निर्भर असावे लागते. वर्धा शहरातील विविध महाविद्यालयात शिकणारी ही मुले कायम बसच्या प्रतीक्षेत असतात. श्रीकृष्ण हायस्कुल व दिनकर विद्यालय येथे शिकणारे विद्यार्थी यांना बसच्या अनियमततेचा फटका सहन करावा लागतो. नानाविध अडचणीतुन ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना शिकवितात. ही मुले सकाळी सात वाजता शाळेकरिता घरुन निघतात. सायंकाळपर्यंत उपाशीतापाशी कधी सुकळी फाट्यावर तर कधी वर्धा बसस्टँड, आर्वी नाका येथे बसची प्रतीक्षा करीत असतात. शाळेनजीकच्या विनंती थांब्यावर जांभया देत झाडाच्या आडोशाने ही मुले उभी दिसतात. सकाळी शाळा, कॉलेजला जातांनी वेळेवर बस येते. पण परतीच्या वेळी बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची ताटकळ होते. वेळापत्रकच पाळले जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे. सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेवर बस येणे अपेक्षीत असताना सुर्य मावळतीला गेला तरी बस येत नाही. यात सुधारणा करुन परतीच्या वेळेतील बस वेळेवर सोडण्याची मागणी आहे.(वार्ताहर)