शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

बससाठी विद्यार्थ्यांची सायंकाळपर्यंत फरफट

By admin | Updated: September 29, 2014 23:10 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वेळापत्रक केवळ भिंतीची शोभा वाढविणारे ठरत असल्याच्या प्रत्यय येथील विद्यार्थ्यांना वारंवार येतो. मात्र संबंधित विभागाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही

आकोली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वेळापत्रक केवळ भिंतीची शोभा वाढविणारे ठरत असल्याच्या प्रत्यय येथील विद्यार्थ्यांना वारंवार येतो. मात्र संबंधित विभागाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही केली जात नाही. यामुळे या शाळकरी विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतरही सायंकाळपर्यंत नाहक प्रतीक्षा करावी लागते. विभागाकडून बसकरिता केलेले वेळापत्रकाचे पालन होत नाही. हे यावरुन दिसून येते. मात्र यात विद्यार्थ्यांची नाहक फरफट होत आहे. यामुळे विद्यार्थी व पालकवर्गात संताप व्यक्त होत आहे. परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाकरिता नियमित शहरात येतात. येथील ग्रामीण भागात सातवी पर्यंत शाळा असल्याने पुढील शिक्षणाकरिता शहर गाठावे लागते. हे विद्यार्थी अप-डाऊन करीत असल्याने त्यांना बसवर निर्भर असावे लागते. वर्धा शहरातील विविध महाविद्यालयात शिकणारी ही मुले कायम बसच्या प्रतीक्षेत असतात. श्रीकृष्ण हायस्कुल व दिनकर विद्यालय येथे शिकणारे विद्यार्थी यांना बसच्या अनियमततेचा फटका सहन करावा लागतो. नानाविध अडचणीतुन ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना शिकवितात. ही मुले सकाळी सात वाजता शाळेकरिता घरुन निघतात. सायंकाळपर्यंत उपाशीतापाशी कधी सुकळी फाट्यावर तर कधी वर्धा बसस्टँड, आर्वी नाका येथे बसची प्रतीक्षा करीत असतात. शाळेनजीकच्या विनंती थांब्यावर जांभया देत झाडाच्या आडोशाने ही मुले उभी दिसतात. सकाळी शाळा, कॉलेजला जातांनी वेळेवर बस येते. पण परतीच्या वेळी बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची ताटकळ होते. वेळापत्रकच पाळले जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे. सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेवर बस येणे अपेक्षीत असताना सुर्य मावळतीला गेला तरी बस येत नाही. यात सुधारणा करुन परतीच्या वेळेतील बस वेळेवर सोडण्याची मागणी आहे.(वार्ताहर)