शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

प्लास्टिक निर्मूलनासाठी विद्यार्थीही सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:18 IST

स्थानिक गो.से.वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे प्लास्टिक निर्मूलन जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला.

ठळक मुद्देजनजागृती अभियान : शहरातील बाजारपेठेसह विविध भागात जाऊन नागरिकांशी सांधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक गो.से.वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे प्लास्टिक निर्मूलन जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला.प्लास्टिक वापराचे दुषपरिणाम, त्याचा पर्यावरण तसेच मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम, याबाबत लोकांमध्ये जागृती घडवून आणावी. जिल्ह्यातून प्लास्टिकचा वापर शक्य तेवढा कमी करुन पर्यावरणस्रेही वातावरण निर्मितीबाबत लोकांचा कल वाढावा, या उद्देशाने जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अब्दुल बारी यांच्या मार्गदर्शनात आयोजित या जागृती अभियानात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून वर्धा शहराच्या विविध भागात जावून जागृतीचा प्रयत्न केला. प्लास्टिक समूळ निर्मूलन अशक्य आहे. अन्नपदार्थ तसेच इतर साहित्यासाठी आपण प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत असतो. मात्र ते नष्ट करता येत नसल्याने पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होतो.तसेच जाळण्याचा प्रयत्न केल्यास प्रदुषण वाढते. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकच्या जागी कागदी अथवा कापडाच्या पिशव्यांचा वापर केल्यास पर्यावरण सुरक्षित राहील तसेच प्रदुषणास देखील आळा बसेल. याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती दिली. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या कागदी लिफाफे, पॉकेटस वर्धेतील शासकीय तसेच गैरशासकीय औषध वितरण केंद्रांत व अन्य दुकानदारांना वितरीत करुन त्यांना प्लास्टिक पिशव्यामध्ये वस्तू न देता कागदी पिशव्यांचाच वापर करावा, असा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांच्या या उपक्रमात दुकानदारांनी सहभागी होऊन त्यांना प्रतिसाद देत सहकार्यही केले.विद्यार्थ्यांनी हाच संदेश नागरिकांनाही दिल्याने नागरिकांनीही त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. वर्धेतील दुकानदारांसह सर्वसामान्य लोकांनी सुद्धा पर्यावरणपूरक कागदी अथवा कापडाच्या पिशव्या वापरण्याबाबत विश्वास व्यक्त केला. या जनजागृती अभियानाच्या आयोजनाकरिता रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. मिलींद शेंडे, प्रा. अल्पना वनमाली, डॉ. एस.आर. जूनघरे, डॉ. मंगला तोमर, प्रा. मधुरिमा नायडू, प्रा. शैलेश जनबंधु यांच्यासह रजत शेंडे, प्रमोद पाटील, मानसी यादव, राधा यादव, अनिकेत क्षिरसागर, प्रवीण देबे, सुबोध वाघ आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी