शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

उष्णतामानात केळी पीक जगविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:14 IST

जिल्हा तसा केळीचा कॅलीफोर्निया म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जायची; पण अनेक अडचणीमुळे केळी उत्पादनात आता घट आली आहे. असे असतानाही काही शेतकरी केळी उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे.

ठळक मुद्देपारा ४४ अंशांवर : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा तसा केळीचा कॅलीफोर्निया म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जायची; पण अनेक अडचणीमुळे केळी उत्पादनात आता घट आली आहे. असे असतानाही काही शेतकरी केळी उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे. मात्र, सध्या वर्धा जिल्ह्याचा पारा ४४ अंशाच्यावर पोहोचल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली असून केळी पीक जगविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे.पवनार येथील प्रगतशील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी यावर्षी २० फेब्रुवारीला केळी पिकाची पाच एकरामध्ये लागवड केली. ७ हजार ५०० रोप त्यांनी लावली आहेत. सध्या वाढत्या उष्णतामानात केळी पीक जगविण्याचे मोठे आव्हान केळी उत्पादक शेतकºयांसमोर आहे. वाघमारे यांच्या शिवाय पवनार, सुरगाव या भागातही अनेक शेतकरी केळीचे उत्पादन घेतात. सेलू तालुक्यात अनेक गावात केळीचे उत्पादन घेतले जाते. उकाड्यापासून केळीचा बचाव करण्यासाठी बोरूची लागवड केळीच्यामध्ये किंवा बाजूला केली जाते. अनेक शेतकरी केळी पिकाच्या रोपाजवळ पाणी व ओल टिकून राहावे म्हणून ठिबंक सिंचन यंत्रणेचा अवलंब करतात. तर काही शेतकऱ्यांनी दुपारच्या वेळी केळीच्या बगीचाचे वातावरण टिकून राहावे म्हणून प्रिक्लंरचाही वापर सुरु केला आहे, अशी माहिती कुंदन वाघमारे यांनी लोकमतशी बोलताना दिली. वाढत्या उन्हामुळे केळी उत्पादक शेतकºयांच्या अडचणीत भर पडली असून कृषी विभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरजखानदेशात मोठ्या प्रमाणावर तपत्या उन्हामुळे केळी पीक करपले असताना वर्धा जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी केलेल्या नियोजनामुळे उन्हाळ्यातही केळी पीक काही प्रमाणात बऱ्यापैकी स्थितीत आहे. परंतु, सध्या पारा झपाट्याने वर चढत असल्याने शेतकºयांच्या अडचीत भर पडली आहे. त्यामुळे त्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.ग्रामीण भागात शेतीच्या फिडरवर आठ तासाचे भारनियमन दिले जात आहे. त्यामुळे केळी पिकाच्या ओलीतासाठी उर्वरित विद्युत असलेल्या काळातच पाण्याचे नियोजन करावे लागते. त्यामुळे मोठी कसरत होत आहे. अशा परिस्थितीत केळी पीक जगविणे उत्पादकांना उष्णतामानात कठीण जात आहे.- कुंदन वाघमारे, केळी उत्पादक शेतकरी, पवनार.