शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतामानात केळी पीक जगविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:14 IST

जिल्हा तसा केळीचा कॅलीफोर्निया म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जायची; पण अनेक अडचणीमुळे केळी उत्पादनात आता घट आली आहे. असे असतानाही काही शेतकरी केळी उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे.

ठळक मुद्देपारा ४४ अंशांवर : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा तसा केळीचा कॅलीफोर्निया म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जायची; पण अनेक अडचणीमुळे केळी उत्पादनात आता घट आली आहे. असे असतानाही काही शेतकरी केळी उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे. मात्र, सध्या वर्धा जिल्ह्याचा पारा ४४ अंशाच्यावर पोहोचल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली असून केळी पीक जगविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे.पवनार येथील प्रगतशील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी यावर्षी २० फेब्रुवारीला केळी पिकाची पाच एकरामध्ये लागवड केली. ७ हजार ५०० रोप त्यांनी लावली आहेत. सध्या वाढत्या उष्णतामानात केळी पीक जगविण्याचे मोठे आव्हान केळी उत्पादक शेतकºयांसमोर आहे. वाघमारे यांच्या शिवाय पवनार, सुरगाव या भागातही अनेक शेतकरी केळीचे उत्पादन घेतात. सेलू तालुक्यात अनेक गावात केळीचे उत्पादन घेतले जाते. उकाड्यापासून केळीचा बचाव करण्यासाठी बोरूची लागवड केळीच्यामध्ये किंवा बाजूला केली जाते. अनेक शेतकरी केळी पिकाच्या रोपाजवळ पाणी व ओल टिकून राहावे म्हणून ठिबंक सिंचन यंत्रणेचा अवलंब करतात. तर काही शेतकऱ्यांनी दुपारच्या वेळी केळीच्या बगीचाचे वातावरण टिकून राहावे म्हणून प्रिक्लंरचाही वापर सुरु केला आहे, अशी माहिती कुंदन वाघमारे यांनी लोकमतशी बोलताना दिली. वाढत्या उन्हामुळे केळी उत्पादक शेतकºयांच्या अडचणीत भर पडली असून कृषी विभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरजखानदेशात मोठ्या प्रमाणावर तपत्या उन्हामुळे केळी पीक करपले असताना वर्धा जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी केलेल्या नियोजनामुळे उन्हाळ्यातही केळी पीक काही प्रमाणात बऱ्यापैकी स्थितीत आहे. परंतु, सध्या पारा झपाट्याने वर चढत असल्याने शेतकºयांच्या अडचीत भर पडली आहे. त्यामुळे त्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.ग्रामीण भागात शेतीच्या फिडरवर आठ तासाचे भारनियमन दिले जात आहे. त्यामुळे केळी पिकाच्या ओलीतासाठी उर्वरित विद्युत असलेल्या काळातच पाण्याचे नियोजन करावे लागते. त्यामुळे मोठी कसरत होत आहे. अशा परिस्थितीत केळी पीक जगविणे उत्पादकांना उष्णतामानात कठीण जात आहे.- कुंदन वाघमारे, केळी उत्पादक शेतकरी, पवनार.