शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

अपंग हेमंतची जगण्यासाठी धडपड

By admin | Updated: May 5, 2017 01:55 IST

वृद्ध आई, आजारी पत्नी आणि दोन चिमुकली मुलं. यात अंगी आलेले अपंगत्त्व. पण जगण्याचा बाणा कायम.

तीन चाकीवर थाटले दुकान : पोटाची खळगी भरण्यासाठी शिवतो चपला जोडे सचिन देवतळे   विरूळ (आकाजी) वृद्ध आई, आजारी पत्नी आणि दोन चिमुकली मुलं. यात अंगी आलेले अपंगत्त्व. पण जगण्याचा बाणा कायम. कुणासमोर हात पसरवायचे नाही, भिक मागायची नाही, असे म्हणत रसुलाबाद येथील हेमंत शेगोकार याने थेट तीन चाकीवर जोडे चप्पल शिवण्याचा व्यवसाय थाटून कोणत्याही परिस्थितीत स्वाभीमानाने जगणे शक्य असल्याचे सर्वांना दाखिवले आहे. आर्थिक परिस्थितीने व्यक्ती गरीब किंवा श्रीमंत ठरतो. यातही हे अपंगत्व गरीब घरातील व्यक्तीला आले तर त्याच्यावर उपचार करणेही कठीण जाते. तुमची परिस्थिती हलाखीची असली आणि त्यातही शरीर अधू असले तर जगताना कोणी आधार देईलच असे नाही. यात अनेक अडचणींवर मात करीत जीवन जागावे लागते. अशीच काहीशी स्थितीत नजीकच्या रसुलाबाद येथील हेमंत शेगोकार या युवकाची झाली. मात्र त्याने हिम्मत न सोडता अपंगत्वाचे ओझे घेवून स्वाभीमानाने आपला संसार थाटला. संसाराचा गाडा हाकण्याकरिता त्याने तीन चाकी सायकलवरुन लोकांची फाटकी पादत्राने शिवून आपल्या व पत्नी दोन लहान मुले व वृद्ध आईचा उदरनिर्वाह करीत आहे अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या हेमंतची कहानी तशी विदारकच. जन्मापासुन दोन्ही पायांनी अपंग असलेल्या हेमंतला चालताच येत नाही. इतरांच्या मदतीने दिवसभराच्या क्रिया पार पाडाव्या लागतात. कोणाची मदत भेटली तर ठीक नाही तर त्याच जागेवर पडुन राहावे लागते. पत्नीच्या मजुरीवर संसार चालायचा. अशातच पत्नी आजारी पडल्याने दोन लहान मुले आणि आईच्या भरणपोषणाचा प्रश्न निर्माण झाला. यात कुणाची मदत घ्याची नाही, असे म्हणत त्याने तीनचाकी सायकलीचा आधार घेत त्या सायकलवर चपला जोडे शिवण्याचे दुकान थाटले. एखाद्या परक्या व्यक्तीला तो सायकलवर बसुन मागतो व गावोगावी फीरुन चपला जोडे शिवून परत घरी येतो. यातुन आपल्या संसाराचा गाडा चालवितो. त्याला राहायला पडके घर आहे, तेही जीर्ण झाले आहे. घराकरिता शासन दरबारी अनेक चकरा मारल्या; परंतु अद्यापही घरकुलचा लाभ भेटला नाही. साधे राशन कार्डही त्याच्या नावाने बणले नाही. हा व्यवसाय करतांना त्याला कमालीच्या वेदना सहन कराव्या लागतात; परंतु ईलाज नाही, एक दिवस जर काम बंद असले तर ऊपवास पडतो. ऐखादे कर्ज काढून घरबसल्या दुकान टाकावे अशी त्याची ईच्छा आहे; परंतु त्याला साधे कर्जही भेटले नाही. असा एकच हेमंत नसून अनेक आहेत. त्यांच्या पुनर्वसनाकरिता शासनाकडून काही ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे. गाडीवर बसताना लागतो कुणाचातरी आधार हेमंतला त्याच्या तीनचाकीवर बसण्याकरिता कुणाचातरी आधार घ्यावा लागतो. कुठे अडचण आल्यास कुणालातरी शोधावे लागते. अपंगांकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपयांच्या योजना आखण्यात येतात. त्यातील एखाद्या योजनेचा लाभ हेमंतला देत त्याला सोईचे होईल, असे एखादे दुकान देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.