शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

बोर प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 23:26 IST

सेलू तालुक्यातील बोरधरण हे १९५८ ते ६५ या कालावधीत निर्माण करण्यात आले. यामध्ये १० ते १२ गावांची जमीन संपादित करण्यात आली. उर्वरित जमिनीवर वनविभागाने ताबा केल्याचे दिसून आले. या गावातील लोकांना कमी प्रमाणात मोबदला देण्यात आला.

ठळक मुद्देन्यायालयात लढाई सुरू : पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू तालुक्यातील बोरधरण हे १९५८ ते ६५ या कालावधीत निर्माण करण्यात आले. यामध्ये १० ते १२ गावांची जमीन संपादित करण्यात आली. उर्वरित जमिनीवर वनविभागाने ताबा केल्याचे दिसून आले. या गावातील लोकांना कमी प्रमाणात मोबदला देण्यात आला. अशी तक्रार ७ आॅगस्ट २०१७ ला देण्यात आली होती. यामध्ये धरणग्रस्तांना शासनाने कमी लाभ दिला असे नमूद करण्यात आले होते. या तक्रारीवर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता पंतप्रधान, मुख्यमंत्री व न्यायालय स्तरावर लढाई सुरू करण्यात आली असल्याचे ज्ञानेश्वर मेश्राम सांगितले.सदर धरणाच्या कामासाठी मनोली, सुकळी (घोडेघाट), पारडी, केरगोंदी, जोगा, खापरी, मल्लपूर, भोसा, तामसवाडा, जयपूर, नंदपूर, वायगाव या गावाची जमीन संपादीत केली होती. या पूर्वी या गावातील लोकांनी वाढीव रक्कम मिळण्याबाबत शासनाकडे मागणी केली होती. परंतु, त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. या संदर्भात तक्रारकर्त्यांनी वर्धा येथील भूसंपादन उपजिल्हाधिकारी (लघुसिंचन कामे) यांच्याकडे विचारणा केली. बोरधरणाचे तेव्हा त्यांना या प्रकरणाचे दस्ताऐवज सादर करण्यास सुचविण्यात आले. याबाबतचा नोटीस १६ सप्टेंबर २०१७ ला तक्रारकर्ते ज्ञानेश्वर मेश्राम यांना देण्यात आला. त्यानंतर दस्ताऐवज व जुने कागदपत्र भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले. त्यांनी शासनाची कोणत्याही प्रकारची वाढीव रक्कम व इतर लाभ देता येणार नाही. असा अभिप्राय दिला. त्यानंतर बोरधरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादीत केल्या आहे. त्या संबंधीत भूधारकास जमिनी भाडे अदा करण्याबाबत पुन्हा अर्ज करण्यात आला. त्यावरही कोणतेही उत्तर शासनाने दिलेले नाही. सहा आठवड्याच्या आत न्याय निवाडा करावा लागतो असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या प्रकरणात न्याय निवाडा झाला नाही, अशी माहिती मेश्राम यांनी लोकमतला दिली आहे. यासंदर्भात पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली. शिवाय पुन्हा बोरधरणातील जमिनी गेलेल्यांना वाढीव रक्कम व इतर लाभ मिळावे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तसेच सर्वोच्च न्यायालयातही निवेदन देण्यात आले. यावर अजून निर्णय प्रलंबित आहे. बोरधरण प्रकल्प वर्धा व नागपूर जिल्ह्यामधून गेला आहे. त्यामुळे येथील मोबदल्यासाठी शेतकºयांची सध्या लढाई सुरू आहे.असा मिळाला होता त्यावेळी मोबदलाबोरधरण हे वर्धा व नागपूर जिल्ह्यामधून गेलेले आहे. जमिनीचा मोबदला प्रती एकर १ हजार रुपये एकूण रक्कम २७० व १ हजार ४८० अशी ठरविण्यात आली होती. मौजा भोसा व गोहदाखुर्द या गावांना मोबदला देण्यात आला. २५० ते ४२५ रुपये प्रती एकर २५५ ते १ हजार ४०३ रुपये एकूण रक्कम १९६४ ला देण्यात आली. खापरी या गावाचा जमिनीचा मोबदला १९६५-६६ मध्ये देण्यात आला होता. तो ५०० ते ७०० रुपये होता. प्रत्येक एकरमागे त्यांनी केलेल्या दाव्याच्यानुसार देण्यात आली. येथील दाजी आणेजी नागमोते, टिकाराम नारायण नागमोते, भोसा यांनी अवार्ड १९६५-६३ व कागदपत्र दिली. महादेव नागो सुटे यांनी अवार्ड १९६५-६३ मध्ये कागदपत्र दिली. त्यानंतर शंकर झिंगरू पारणे, जयवंती बोंदरे यांनी ही कागदपत्र दिली. याप्रकरणात न्यायालयातही प्रकरण गेले. बोरधरणाविषयी वाढीव रक्कम मिळण्यासाठी धरणग्रस्त यांनी वेळावेळी पाठपुरावा केला. सदर कागदपत्र खोटे असल्याचा दावाही करण्यात आला होता, अशी माहिती ज्ञानेश्वर तुकाराम मेश्राम यांनी लोकमतला लेखी स्वरूपात दिली आहे.