शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

बोर व्याघ्र परिसरातून पट्टेदार वाघांची पळवापळवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 14:18 IST

देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी ओळख असलेल्या बोर व्याघ्र परिसरातून सध्या वाघाची पळवापळवी होत असल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीतून उजेडात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहेश सायखेडेवर्धा: देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी ओळख असलेल्या बोर व्याघ्र परिसरातून सध्या वाघाची पळवापळवी होत असल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीतून उजेडात आला आहे. २०१८-१९ या वर्षात बोर व्याघ्र प्रकल्पात चार वाघिणी, एक वाघ असे एकूण पाच मोठे तर ३ छोट्या वाघांचे वास्तव्य असल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील पाच वर्षांमधील नोंद घेतलेल्या वाघांच्या संख्येच्या आकडेवारीवर लक्ष टाकले असता वाघांच्या संख्येत कमालीची तफावत येत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पातून पट्टेदार वाघांची पळवापळवी तर होत नाही ना, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.बोर अभयारण्य परिसरात मोठ्या संख्येने वाघांचे वास्तव्य असल्याने आणि तेथील वातावरण वाघांसाठी पोषक असल्याने त्या भागाला २०१४ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. अत्याधुनिक यंत्राचा वापर करून झालेल्या व्याघ्र गणनेनुसार २०१४ मध्ये या परिसरात दोन वाघिणी तर दोन मोठे वाघ तसेच वाघांचे दोन बछड्यांचे वास्तव्य होते. त्यावेळी मोठ्या वाघांना बीटीआर-१, बीटीआर-२, बीटीआर-३ व बीटीआर-४ अशी नावे देण्यात आली होती. परंतु, मागील काही वर्षांपासून बीटीआर-४ शिवाजी नामक वाघ बेपत्ता असून त्याचा शोध घेण्याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. तर बीटीआर-२ बाजीराव नामक वाघाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. २०१४-१५ मध्ये दोन वाघिण तर एक वाघ आणि वाघाचे सात बछडे, २०१५-१६ मध्ये दोन वाघिण एक वाघ आणि वाघाचे चार बछडे, २०१७-१८ मध्ये तीन वाघिण तीन वाघ तर वाघाचे सहा बछडे, शिवाय २०१८-१९ मध्ये चार वाघिण तर एक वाघ आणि वाघाच्या तीन बछड्यांचे वास्तव्य बोर व्याघ्र प्रकल्पात असल्याची नोंद अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेदरम्यान घेण्यात आली आहे. असे असले तरी बोर व्याघ्र प्रकल्पातून प्रत्येक वर्षी वाघांची संख्या घटत असल्याचे सदर शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे येथील पट्टेदार वाघ गेले कुठे तसेच त्यांची संगणमत करून शिकार तर केली गेली नाही ना याचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.शिवाजीची नियोजनबद्ध शिकार?२०१२ मध्ये गरमसुर परिसरात शिवाजी नामक वाघाचे दर्शन काहींना झाले होते. परंतु, त्यानंतर तो बोर व्याघ्र प्रकल्पातून बेपत्ता आहे. या वाघाची शिकार झाल्याची चर्चा सध्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये रंगत असल्याने सदर प्रकरणातील वास्तव समोर आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांनी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.खात्रीदायक माहितीवर गोपनीयतेचे पांघरूणमाहिती अधिकाराचा वापर करून बेपत्ता असलेल्या शिवाजी नामक वाघाची तसेच बोर व्याघ्र प्रकल्पात सध्यास्थितीत किती वाघांचे वास्तव्य आहे याची माहिती जाणून घेतली असता खात्रीदायक माहितीवर अधिकाºयांकडून गोपनीयतेचे पांघरूण टाकले जात आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून गोपनीयतेचे पांघरून टाकून माहितीच देण्यास टाळाटाळ केली जात आहे.माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मागितली असता अर्धवट माहिती देण्यात आली. इतकेच नव्हे तर खात्रीदायक माहिती गोपनीयतेचे कारण पुढे करून देण्याचे टाळण्यात आले. यासंदर्भात आपण वरिष्ठांकडे अपील दाखल करणार आहोत. वर्षनिहाय घेण्यात आलेल्या वाघांच्या नोंदीत कमालीची तफावत दिसते. त्यामुळे उच्चस्तरीय चौकशीची गरज आहे.- ताराचंद चौबे, जेष्ठ आरटीआय कार्यकर्ता, वर्धा.

टॅग्स :Tigerवाघ