शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

रुग्णांना मिळतोय प्रहारचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:41 IST

गरजू रुग्णांना वेळीच मदत मिळवून देण्यासाठी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नरत असतात. अनेक रुग्णांना वेळीच रक्त उपलब्ध करून देण्यासह त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून होत आहे.

ठळक मुद्देयवतमाळच्या रूग्णाला शासकीय योजनेचा मिळवून दिला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरजू रुग्णांना वेळीच मदत मिळवून देण्यासाठी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नरत असतात. अनेक रुग्णांना वेळीच रक्त उपलब्ध करून देण्यासह त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून होत आहे. त्यांचे हे कार्य गरजू रुग्णांना आधार देणारे ठरत आहे.वर्धा शहरात विदर्भातील दोन मोठे रुग्णालय असून येथे दररोज जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्याबाहेरील रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. सेवाग्राम व सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाºयामध्ये बहूतांश रुग्ण गरीब राहत असून त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते. शिवाय त्यांना आर्थिक दुर्बल घटकांसाठी असणाºया शासनाच्या विविध योजनांची माहितीही नसते. गरजू व गरीब रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळावी यासाठी ते सहाय्य करतात. अपघातात गंभीर जखमी झालेला यवतमाळ जिल्ह्यातील जमील खाँ पठान नामक तरूण सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल असून त्याला रक्ताची गरज असल्याची माहिती प्रहारच्या पदाधिकाºयांना मिळाली. त्यानंतर तात्काळ प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठून रुग्णासाठी रक्त उपलब्ध करून दिले. दीड महिन्यापासून भरती असलेल्या रुग्णाला सुट्टी दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या कुटूंबियांना ३८ हजारांचे देयक भरण्याचे सांगण्यात आले;पण आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने ही रक्कम कशी भरावी, असा प्रश्न रुग्णाच्या कुटूंबियांसमोर होता. याची माहिती मिळताच प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठून प्रशासकीय अधिकाºयांना विनंती करून रुग्णाचे सदर देयक माफ करून घेतले. शिवाय पूर्वी भरलेले १२ हजार रुपये रुग्णाच्या कुटूंबियांना परत मिळवून दिले. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हा उद्देश उराशी बाळगून आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे, राजेश सावरकर, आदित्य कोकडवार, प्रशील धांदे, विजय सुरकार, नितेश चतुरकर, पवन दंदे, भूषण येलेकर, शुभम भोयर, श्याम शेलार प्रत्येक रुग्णाला योग्य आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.गरजूला उपलब्ध करून दिले जातेय रक्तअपघातात जखमी झालेल्यांसह विविध शस्त्रक्रियेच्या वेळी रक्ताची गरज असते. बहूदा रुग्णालयातूनही रक्त उपलब्ध राहत नाही. अशा वेळी माहिती मिळताच प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेळीच रुग्णालय गाठून रक्तदान करून रुग्णांना रक्त उपलब्ध करून देतात.