शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांना मिळतोय प्रहारचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:41 IST

गरजू रुग्णांना वेळीच मदत मिळवून देण्यासाठी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नरत असतात. अनेक रुग्णांना वेळीच रक्त उपलब्ध करून देण्यासह त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून होत आहे.

ठळक मुद्देयवतमाळच्या रूग्णाला शासकीय योजनेचा मिळवून दिला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरजू रुग्णांना वेळीच मदत मिळवून देण्यासाठी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नरत असतात. अनेक रुग्णांना वेळीच रक्त उपलब्ध करून देण्यासह त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून होत आहे. त्यांचे हे कार्य गरजू रुग्णांना आधार देणारे ठरत आहे.वर्धा शहरात विदर्भातील दोन मोठे रुग्णालय असून येथे दररोज जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्याबाहेरील रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. सेवाग्राम व सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाºयामध्ये बहूतांश रुग्ण गरीब राहत असून त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते. शिवाय त्यांना आर्थिक दुर्बल घटकांसाठी असणाºया शासनाच्या विविध योजनांची माहितीही नसते. गरजू व गरीब रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळावी यासाठी ते सहाय्य करतात. अपघातात गंभीर जखमी झालेला यवतमाळ जिल्ह्यातील जमील खाँ पठान नामक तरूण सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल असून त्याला रक्ताची गरज असल्याची माहिती प्रहारच्या पदाधिकाºयांना मिळाली. त्यानंतर तात्काळ प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठून रुग्णासाठी रक्त उपलब्ध करून दिले. दीड महिन्यापासून भरती असलेल्या रुग्णाला सुट्टी दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या कुटूंबियांना ३८ हजारांचे देयक भरण्याचे सांगण्यात आले;पण आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने ही रक्कम कशी भरावी, असा प्रश्न रुग्णाच्या कुटूंबियांसमोर होता. याची माहिती मिळताच प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठून प्रशासकीय अधिकाºयांना विनंती करून रुग्णाचे सदर देयक माफ करून घेतले. शिवाय पूर्वी भरलेले १२ हजार रुपये रुग्णाच्या कुटूंबियांना परत मिळवून दिले. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हा उद्देश उराशी बाळगून आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे, राजेश सावरकर, आदित्य कोकडवार, प्रशील धांदे, विजय सुरकार, नितेश चतुरकर, पवन दंदे, भूषण येलेकर, शुभम भोयर, श्याम शेलार प्रत्येक रुग्णाला योग्य आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.गरजूला उपलब्ध करून दिले जातेय रक्तअपघातात जखमी झालेल्यांसह विविध शस्त्रक्रियेच्या वेळी रक्ताची गरज असते. बहूदा रुग्णालयातूनही रक्त उपलब्ध राहत नाही. अशा वेळी माहिती मिळताच प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेळीच रुग्णालय गाठून रक्तदान करून रुग्णांना रक्त उपलब्ध करून देतात.