शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

रुग्णांना मिळतोय प्रहारचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:41 IST

गरजू रुग्णांना वेळीच मदत मिळवून देण्यासाठी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नरत असतात. अनेक रुग्णांना वेळीच रक्त उपलब्ध करून देण्यासह त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून होत आहे.

ठळक मुद्देयवतमाळच्या रूग्णाला शासकीय योजनेचा मिळवून दिला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरजू रुग्णांना वेळीच मदत मिळवून देण्यासाठी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नरत असतात. अनेक रुग्णांना वेळीच रक्त उपलब्ध करून देण्यासह त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून होत आहे. त्यांचे हे कार्य गरजू रुग्णांना आधार देणारे ठरत आहे.वर्धा शहरात विदर्भातील दोन मोठे रुग्णालय असून येथे दररोज जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्याबाहेरील रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. सेवाग्राम व सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाºयामध्ये बहूतांश रुग्ण गरीब राहत असून त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते. शिवाय त्यांना आर्थिक दुर्बल घटकांसाठी असणाºया शासनाच्या विविध योजनांची माहितीही नसते. गरजू व गरीब रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळावी यासाठी ते सहाय्य करतात. अपघातात गंभीर जखमी झालेला यवतमाळ जिल्ह्यातील जमील खाँ पठान नामक तरूण सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल असून त्याला रक्ताची गरज असल्याची माहिती प्रहारच्या पदाधिकाºयांना मिळाली. त्यानंतर तात्काळ प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठून रुग्णासाठी रक्त उपलब्ध करून दिले. दीड महिन्यापासून भरती असलेल्या रुग्णाला सुट्टी दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या कुटूंबियांना ३८ हजारांचे देयक भरण्याचे सांगण्यात आले;पण आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने ही रक्कम कशी भरावी, असा प्रश्न रुग्णाच्या कुटूंबियांसमोर होता. याची माहिती मिळताच प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठून प्रशासकीय अधिकाºयांना विनंती करून रुग्णाचे सदर देयक माफ करून घेतले. शिवाय पूर्वी भरलेले १२ हजार रुपये रुग्णाच्या कुटूंबियांना परत मिळवून दिले. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हा उद्देश उराशी बाळगून आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे, राजेश सावरकर, आदित्य कोकडवार, प्रशील धांदे, विजय सुरकार, नितेश चतुरकर, पवन दंदे, भूषण येलेकर, शुभम भोयर, श्याम शेलार प्रत्येक रुग्णाला योग्य आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.गरजूला उपलब्ध करून दिले जातेय रक्तअपघातात जखमी झालेल्यांसह विविध शस्त्रक्रियेच्या वेळी रक्ताची गरज असते. बहूदा रुग्णालयातूनही रक्त उपलब्ध राहत नाही. अशा वेळी माहिती मिळताच प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेळीच रुग्णालय गाठून रक्तदान करून रुग्णांना रक्त उपलब्ध करून देतात.