शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

देशाची एकता व अखंडता अधिक बळकट करा

By admin | Updated: July 1, 2016 02:13 IST

आजपर्यंत आपल्या देशात घडून आलेल्या सामाजिक व धार्मिक समस्यांचे पडसाद शहराच्या राजकीय व सामाजिक जीवनावर तितकेसे उमटत नाही.

अंकित गोयल : पोलीस विभागातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजनवर्धा : आजपर्यंत आपल्या देशात घडून आलेल्या सामाजिक व धार्मिक समस्यांचे पडसाद शहराच्या राजकीय व सामाजिक जीवनावर तितकेसे उमटत नाही. येथे नेहमी सलोख्याचे वातावरण पाहायला मिळते. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अहिंसा विचाराचा प्रभाव सर्वसामान्यांवर आहे. सर्वधर्म समभाव लोकांच्या मानसिकतेतून दिसून येते. आज देशाची एकता व अखंडता अधिक बळकट करण्याची गरज आहे, असे मत पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी व्यक्त केले. माहेश्वरी भवन येथे शहर पोलीस विभागाकडून आयोजित इफ्तार पार्टी कार्यक्रमात ते बोलत होते.सर्व धर्माच्या उत्सवांना एकजुटीने साजरे केल्यास बंधुभाव वाढून स्नेह व एकतेचा प्रसार होईल. आज समाजात विघातक प्रवृत्ती वाढत आहे. स्रेह, प्रेम, शांती, बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता धार्मिक उत्सवातुनच निर्माण होत असते, असे अंकीत गोयल पुढे म्हणाले. शहर पोलीस विभागातर्फे आयोजित इफ्तार पार्टीत कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, मौलाना हसीबूर रहेमान, वरिष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल, विदर्भ मुस्लीम वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष रहेमातुल्ला खान, अभ्युदय मेघे, वर्धा शहरचे ठाणेदार राजेंद्र शिरतोडे, जफर अली, ठाणेदार विजय मगर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर ठाणेदार शिरतोडे यांनी केले. संचालन सेक्युलर फ्रंटचे संस्थापक सदस्य इमरान राही यांनी तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला बाळा इंगोले, लॉयन्स क्लबचे संचालक अनिल नरेडी, रमेश केला, अविनाश सातव, अ‍ॅड. शाहीद अली, अ‍ॅड. असद खान पटेल, शेख सलील, गुड्डू पठाण, देवा निखाडे, रमेश कच्छवा, गुड्डू अली, परवेज खान, हबीब खान, शेख गफ्फार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके, युनुस खान पोलीस उपनिरीक्षक, जामा मस्जिद कमेटीचे सदस्य अताउल्लाह पठाण, प्रा. राजू गोरडे, गिरीश जोशी यासह मान्यवर उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)