शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

राज्यात ग्राहक चळवळ मजबूत करणार

By admin | Updated: November 24, 2014 23:01 IST

राज्यात ग्राहक चळवळ मजबूत करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही ग्राहक संरक्षण परिषदांचेच गठण झाले नसल्याची खंत ग्राहक कल्याण सल्लागार

चंद्रकांत दळवी यांची माहिती : ग्राहक संरक्षण परिषदांच नाहीवर्धा : राज्यात ग्राहक चळवळ मजबूत करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही ग्राहक संरक्षण परिषदांचेच गठण झाले नसल्याची खंत ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत दळवी यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.दळवी महाराष्ट्राच्या ४८ दिवसांच्या दौऱ्यावर आहे. ते वर्धेत आले असता त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून ग्राहक संरक्षण परिषदांबाबतचा आढावा घेतला असता जिल्ह्यात ही समितीच गठित झाली नसल्याची बाब निदर्शनास आली. येत्या १५ दिवसांत समिती गठित करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ग्राहक चळवळ मजबूत करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बाबी करण्याची गरज आहे. या अनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहक संरक्षण विभाग स्वतंत्र असावा, ग्राहक संरक्षण परिषदेचे कार्य जिल्हा आणि तालुका पातळीवर असावे, या परिषदांच्या बैठका महिन्यात एकदा आणि वर्षभरात १२ वेळा व्हावी. २४ डिसेंबर हा भारतीय ग्राहक दिन आणि १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा. ग्राहकांचे हक्क व कर्तव्य तसेच १९८६ चा ग्राहक कायदा सर्वांना माहिती होण्यासाठी शाळा महाविद्यालयातून विविध स्पर्धांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचावा. केंद्राप्रमाणे राज्यात व्यक्ती व संस्थेसाठी यशवंत ग्राहक राज्य पुरस्काराचे आयोजन करावे, या अन्य बाबींचा प्रस्तावात समावेश असणार आहे, असेही दळवी म्हणाले. यावेळी स्मीता नॉरकर, गिरीष भोसले उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)