शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्ते निर्मनुष्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST

बसस्थानक म्हटले की शहरी आणि ग्रामीण प्रवाशांची तोबा गर्दी. सदैव दृष्टीस पडणारे हे चित्र. कोरोनामुळे जनता फर्क्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी एसटीच्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे वर्ध्यातील बसस्थानक असे ओस पडले होते.

ठळक मुद्देबच्चे कंपनी रंगली खेळात : मोठ्यांनी दूरचित्रवाणी संचाचा घेतला आधार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा एकजुटीने व एकदिलाने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला वर्धेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. सकाळपासूनच रस्त्यांवरील वर्दळ बंद असल्याने सर्वत्र स्मशानशांतता पसरलेली होती. रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. बच्चे कंपनीने दूर सारत बुद्बिबळ, सापसिडी, कॅरम खेळांत रंगले. मोठ्यांनी दूरचित्रवाणी, संगीत संचाद्वारे मनोरंजन केले तर चाकरमान्यांनी प्रलंबित कामे उरकण्यावर भर दिला.जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची होतेय आरोग्य तपासणीवर्धा : मध्यरात्रीपासून रेल्वे सेवा बंद करण्यात आली असली तरी त्यापूर्वी सोडण्यात आलेल्या रेल्वेगाड्या नियोजित ठिकाणी पोहोचत आहेत. रविवारी जनता कर्फ्यूदरम्यान रेल्वेचा प्रवास करून जिल्ह्याबाहेरून वर्ध्यात आलेल्या प्रवाशाची आरोग्य तपासणी आरोग्य विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.जिल्ह्याबाहेरून वर्धा जिल्ह्यात येणाºया प्रत्येक नागरिकावर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह पोलीस विभागातील अधिकाºयांसह कर्मचाºयांचे लक्ष आहे. गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाला अटकाव घालण्यासाठी यापूर्वीच वर्धा जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वर्धेकरांनी दिवसभर घरात राहून जनता कर्फ्यू पाळला. याच जनता कर्फ्यू दरम्यान रेल्वेचा प्रवास करून जिल्ह्याबाहेरून वर्ध्यात आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. यावेळी या प्रवाशांमध्ये कोरोनाची कुठली लक्षणे तर आढळत नाही ना याची खातरजमा वैद्यकीय अधिकाºयांनी केली. शिवाय त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शनात्मक सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.वर्धा बसस्थानक ओस...बसस्थानक म्हटले की शहरी आणि ग्रामीण प्रवाशांची तोबा गर्दी. सदैव दृष्टीस पडणारे हे चित्र. कोरोनामुळे जनता फर्क्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी एसटीच्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे वर्ध्यातील बसस्थानक असे ओस पडले होते.रेल्वेस्थानकावर शुकशुकाट...कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लांब पल्ल्यासह अनेक रेल्वेगाड्या तूर्तास रद्द करण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून गर्दी आणि प्रवास टाळण्याच्याही शासन-प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. यामुळे मुख्य रेल्वेस्थानकावर रविवारी असा शुकशुकाट होता.रेल्वेस्थानकाचे निर्जंतुकीकरणजनता कर्फ्यूच्या निमित्ताने रेल्वेसेवा बंद होती. याच दरम्यान वर्धा रेल्वे स्थानकाची स्वच्छता करून ते निर्जंतुक करण्यात आले. मध्यरात्रीपूर्वी सुटलेल्याच रेल्वेगाड्या वर्धा, सेवाग्राम, पुलगाव या रेल्वे स्थानकांवर आल्या. जिल्ह्याबाहेरून आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली.घंटागाड्यांनाही क्षणभर विश्रांती...शहरातील विविध वॉर्डातील ओला आणि सुका कचरा नगरपालिकेच्या याच घंडागाड्यांच्या माध्यमातून नित्यनेमाने दररोज संकलित केला जातो. जनता कर्फ्यूमुळे बंदच्या पार्श्वभूमीवर रविवारी या गाड्यांनाही क्षणभर का होईना अशी विश्रांती घेता आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या