शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शहरातील रस्ते निर्मनुष्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST

बसस्थानक म्हटले की शहरी आणि ग्रामीण प्रवाशांची तोबा गर्दी. सदैव दृष्टीस पडणारे हे चित्र. कोरोनामुळे जनता फर्क्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी एसटीच्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे वर्ध्यातील बसस्थानक असे ओस पडले होते.

ठळक मुद्देबच्चे कंपनी रंगली खेळात : मोठ्यांनी दूरचित्रवाणी संचाचा घेतला आधार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा एकजुटीने व एकदिलाने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला वर्धेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. सकाळपासूनच रस्त्यांवरील वर्दळ बंद असल्याने सर्वत्र स्मशानशांतता पसरलेली होती. रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. बच्चे कंपनीने दूर सारत बुद्बिबळ, सापसिडी, कॅरम खेळांत रंगले. मोठ्यांनी दूरचित्रवाणी, संगीत संचाद्वारे मनोरंजन केले तर चाकरमान्यांनी प्रलंबित कामे उरकण्यावर भर दिला.जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची होतेय आरोग्य तपासणीवर्धा : मध्यरात्रीपासून रेल्वे सेवा बंद करण्यात आली असली तरी त्यापूर्वी सोडण्यात आलेल्या रेल्वेगाड्या नियोजित ठिकाणी पोहोचत आहेत. रविवारी जनता कर्फ्यूदरम्यान रेल्वेचा प्रवास करून जिल्ह्याबाहेरून वर्ध्यात आलेल्या प्रवाशाची आरोग्य तपासणी आरोग्य विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.जिल्ह्याबाहेरून वर्धा जिल्ह्यात येणाºया प्रत्येक नागरिकावर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह पोलीस विभागातील अधिकाºयांसह कर्मचाºयांचे लक्ष आहे. गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाला अटकाव घालण्यासाठी यापूर्वीच वर्धा जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वर्धेकरांनी दिवसभर घरात राहून जनता कर्फ्यू पाळला. याच जनता कर्फ्यू दरम्यान रेल्वेचा प्रवास करून जिल्ह्याबाहेरून वर्ध्यात आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. यावेळी या प्रवाशांमध्ये कोरोनाची कुठली लक्षणे तर आढळत नाही ना याची खातरजमा वैद्यकीय अधिकाºयांनी केली. शिवाय त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शनात्मक सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.वर्धा बसस्थानक ओस...बसस्थानक म्हटले की शहरी आणि ग्रामीण प्रवाशांची तोबा गर्दी. सदैव दृष्टीस पडणारे हे चित्र. कोरोनामुळे जनता फर्क्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी एसटीच्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे वर्ध्यातील बसस्थानक असे ओस पडले होते.रेल्वेस्थानकावर शुकशुकाट...कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लांब पल्ल्यासह अनेक रेल्वेगाड्या तूर्तास रद्द करण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून गर्दी आणि प्रवास टाळण्याच्याही शासन-प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. यामुळे मुख्य रेल्वेस्थानकावर रविवारी असा शुकशुकाट होता.रेल्वेस्थानकाचे निर्जंतुकीकरणजनता कर्फ्यूच्या निमित्ताने रेल्वेसेवा बंद होती. याच दरम्यान वर्धा रेल्वे स्थानकाची स्वच्छता करून ते निर्जंतुक करण्यात आले. मध्यरात्रीपूर्वी सुटलेल्याच रेल्वेगाड्या वर्धा, सेवाग्राम, पुलगाव या रेल्वे स्थानकांवर आल्या. जिल्ह्याबाहेरून आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली.घंटागाड्यांनाही क्षणभर विश्रांती...शहरातील विविध वॉर्डातील ओला आणि सुका कचरा नगरपालिकेच्या याच घंडागाड्यांच्या माध्यमातून नित्यनेमाने दररोज संकलित केला जातो. जनता कर्फ्यूमुळे बंदच्या पार्श्वभूमीवर रविवारी या गाड्यांनाही क्षणभर का होईना अशी विश्रांती घेता आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या