शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

वीज पुरवठ्यासाठी ग्रामस्थांचा रस्तारोको

By admin | Updated: June 12, 2017 01:45 IST

तारासावंगा येथील वीज पुरवठा एक महिन्यापासून अनियमीत होता. महावितरणला वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात होते.

२३ जणांची अटक व सुटका : तारासावंगात एक महिन्यापासून ब्रेकडाऊनलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : तारासावंगा येथील वीज पुरवठा एक महिन्यापासून अनियमीत होता. महावितरणला वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात होते. परिणामी, संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी रात्री ९ वाजता साहुर कार्यालयावर धडक दिली. अभियंता व कर्मचारी नसल्याने थेट रस्तारोको आंदोलन सुरू केले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी आंदेलन स्थळ गाठत २३ जणांना अटक करीत सुटका केली. यामुळे तणाव निर्माण झाला होता.तारासावंगा हे तालुक्याचे शेवटचे गाव असून २८ किमी अंतरावर आहे. गावात कुठल्याच सुविधा नाही. वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार त्यात भर घालत आहे. विद्युत तारा तुटल्या, इन्सुलेटर फुटले असून दुरुस्ती केली जात नाही. याबाबत सरपंच रत्नपाल पाटील यांनी वारंवार कार्यकारी अभियंत्यांना निवेदने दिली; पण दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे ब्रेकडाऊन झाले होते. परिणामी, महावितरण लक्ष देत नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी सरपंच पाटील यांच्यासह साहुर येथील विद्युत कार्यालय गाठले. अभियंता हजर नसल्याने वरिष्ठांना माहिती देण्यात आली. वीज पुरवठा सुरू झाल्याशिवाय कार्यालयातून जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली; पण अभियंता आलेच नाही. अखेर ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको आंदोलन सुरू केले. एक तासातच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच पोलीस जमादार खांडरे, पिसे, बावणे, रघाटाटे आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी २३ आंदोलकांना कलम ६८ नुसार अटक करून काही वेळाने कलम ६९ नुसार सुटका करण्यात आली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. रस्तारोको आंदोलनात सरपंच रत्नपाल पाटील, योगेश तुमडाम, सतीश निपाणी, विनोद कावळे, विलास पाटणकर, संजय सुरजूसे, विक्की कावळे, चेतन इंगळे, किरण ठोंबरे, पंकज कावळे व ग्रामस्थ सहभागी होते.