शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दगडफेकीने पिंजऱ्यातील अस्वल पसार

By admin | Updated: February 4, 2017 00:16 IST

तालुक्यात एका अस्वलाने पिलांसह चांगलाच धुडगुस घातला आहे.

सहा महिन्यांच्या परिश्रमावर पाणी : गावकऱ्यांकडून झाली पिंजऱ्यावर गोटमार आष्टी (शहीद) : तालुक्यात एका अस्वलाने पिलांसह चांगलाच धुडगुस घातला आहे. या अस्वलाच्या हल्ल्यात सहा महिन्यात आठ शेतकरी गंभीर जखमी झालेत. या अस्वलाला पकडण्यासाठी एसआरपीच्या २७ जवानांसह ४२ जणांची टीम जंगलात कोम्बींग आॅपरेशन राबवित होती. या आॅपरेशनला यश आल्याने दोन दिवसांपूर्वी बोरखेडीच्या जंगलात लावलेल्या पिंजऱ्यात अस्वल जेरबंद झाले; मात्र मोई व थार येथील गावकऱ्यांनी ऐनवेळी पिंजऱ्यावर जोरदार दगडफेक केली. यात पिंजऱ्याचे लोखंडी गज तुटल्याने अस्वल पळून गेले. हातची संधी हुकल्याने परत अस्वल कधी सापडेल, असा पेच वनविभागासमोर आहे. वनपरीक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी अस्वलाला शोधण्यासाठी गावकऱ्यांकडून उपाय सूचविण्याचे आवाहन केले होते. १० गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सदस्य यांची संयुक्त मिटींग घेतली होती. तेव्हापासून युद्धपातळीवर दिवसरात्र कोम्बींग आॅपरेशन सुरू केले होते. एसआरपीचे २७, वनरक्षक १५ असे एकूण ४२ कर्मचारी प्रत्येक भागात चोख बंदोबस्त लावून शोध घेत आहे. यासाठी गावकऱ्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला होता. वनविभागाला अस्वल जेरबंद करण्याचे मोठे आव्हान होते. ते पूर्ण करण्यात बाजी मारताच गावकऱ्यांनी घातलेला घोळ सर्वांवर पाणी फेरणारा ठरला. आता हे अस्वल पुन्हा केव्हा हाती येईल, याचा नेम नाही. हे अस्वल परिसरातील जंगलात पसार झाल्याने त्याच्याकडून आणखी शेतकऱ्यांवर हल्ला करण्याची भीती नागरिकांच्या मनात घर करून आहे. (तालुका प्रतिनिधी) गावकरी म्हणतात; पुन्हा परतण्याच्या भीतीने केला हल्ला अस्वलाच्या पिंजऱ्यावर गोटमार करण्यासंदर्भाम मोई व थार येथील गावकऱ्यांना विचारणा केल असता त्यांनी सदर अस्वल गावात पुन्हा परतले असते, यामुळे गोटमार केली असे सागितले. अस्वल पकडल्यानंतर त्याला मारण्याची परवानगी वनाधिकाऱ्यांना मागितली असल्याचेही गावकरी म्हणाले. त्यांनी मनाई केल्याने राग अनावर झाला आणि आम्ही गोटमार केली. यात पिंजरा तुटला. या पिंजऱ्यातून अस्वल पळून जाईल याचा अंदाज नव्हता, असे गावकरी म्हणाले.