शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दगडफेकीने पिंजऱ्यातील अस्वल पसार

By admin | Updated: February 4, 2017 00:16 IST

तालुक्यात एका अस्वलाने पिलांसह चांगलाच धुडगुस घातला आहे.

सहा महिन्यांच्या परिश्रमावर पाणी : गावकऱ्यांकडून झाली पिंजऱ्यावर गोटमार आष्टी (शहीद) : तालुक्यात एका अस्वलाने पिलांसह चांगलाच धुडगुस घातला आहे. या अस्वलाच्या हल्ल्यात सहा महिन्यात आठ शेतकरी गंभीर जखमी झालेत. या अस्वलाला पकडण्यासाठी एसआरपीच्या २७ जवानांसह ४२ जणांची टीम जंगलात कोम्बींग आॅपरेशन राबवित होती. या आॅपरेशनला यश आल्याने दोन दिवसांपूर्वी बोरखेडीच्या जंगलात लावलेल्या पिंजऱ्यात अस्वल जेरबंद झाले; मात्र मोई व थार येथील गावकऱ्यांनी ऐनवेळी पिंजऱ्यावर जोरदार दगडफेक केली. यात पिंजऱ्याचे लोखंडी गज तुटल्याने अस्वल पळून गेले. हातची संधी हुकल्याने परत अस्वल कधी सापडेल, असा पेच वनविभागासमोर आहे. वनपरीक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी अस्वलाला शोधण्यासाठी गावकऱ्यांकडून उपाय सूचविण्याचे आवाहन केले होते. १० गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सदस्य यांची संयुक्त मिटींग घेतली होती. तेव्हापासून युद्धपातळीवर दिवसरात्र कोम्बींग आॅपरेशन सुरू केले होते. एसआरपीचे २७, वनरक्षक १५ असे एकूण ४२ कर्मचारी प्रत्येक भागात चोख बंदोबस्त लावून शोध घेत आहे. यासाठी गावकऱ्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला होता. वनविभागाला अस्वल जेरबंद करण्याचे मोठे आव्हान होते. ते पूर्ण करण्यात बाजी मारताच गावकऱ्यांनी घातलेला घोळ सर्वांवर पाणी फेरणारा ठरला. आता हे अस्वल पुन्हा केव्हा हाती येईल, याचा नेम नाही. हे अस्वल परिसरातील जंगलात पसार झाल्याने त्याच्याकडून आणखी शेतकऱ्यांवर हल्ला करण्याची भीती नागरिकांच्या मनात घर करून आहे. (तालुका प्रतिनिधी) गावकरी म्हणतात; पुन्हा परतण्याच्या भीतीने केला हल्ला अस्वलाच्या पिंजऱ्यावर गोटमार करण्यासंदर्भाम मोई व थार येथील गावकऱ्यांना विचारणा केल असता त्यांनी सदर अस्वल गावात पुन्हा परतले असते, यामुळे गोटमार केली असे सागितले. अस्वल पकडल्यानंतर त्याला मारण्याची परवानगी वनाधिकाऱ्यांना मागितली असल्याचेही गावकरी म्हणाले. त्यांनी मनाई केल्याने राग अनावर झाला आणि आम्ही गोटमार केली. यात पिंजरा तुटला. या पिंजऱ्यातून अस्वल पळून जाईल याचा अंदाज नव्हता, असे गावकरी म्हणाले.