शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

विसर्जनातील जलस्त्रोतांचे प्रदूषण थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:33 IST

पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालय, शासन व पाणी प्रदूषण मंडळाने आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देमहाराष्टÑ अंनिसचे जिल्हाधिकाºयांना निवेदन : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार गरजेचा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालय, शासन व पाणी प्रदूषण मंडळाने आदेश दिले आहेत. याचा आधार घेत नदी, नाले, विहिरींतील विसर्जन रोखून जलस्त्रोत नष्ट होण्यापासून थांबवावे, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन देण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, महाराष्ट्र अंनिसच्या याचिकेवर औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेले आदेश, महाराष्ट्र शासनाने काढलेले आदेश, केंद्रीय व राज्य पाणी प्रदूषण मंडळ यांनी मूर्ती व निर्माल्यामुळे पिण्याचे व वापरात येणारे पाणी प्रदूषित होणार नाही, यासाठी काढलेल्या सर्व आदेशांच्या सत्यप्रती जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्या. जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेने कृत्रिम हौद उपलब्ध करून देण्याचे आदेश आहे; पण जिल्ह्यातील कोणत्याही नदी, नाला, ओढ्यावर वा इतर पर्यायी हौद निर्माण केले नाहीत. यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अवमानना होत आहे. ती होऊ नये म्हणून लोकांना पर्याय उपलब्ध करून द्यावा. हिंदु जनजागृतीसारख्या संघटना नदीतच मूर्तीचे विसर्जन करा, असे सांगतात. त्यांना समज देत प्रसंगी गुन्हे दाखल करावे, भाविकांचे प्रबोधन करावे, अशी मागणी निवेदनातून केली. यावेळी गजेंद्र सुरकार, प्रकाश कांबळे, सुधीर पांगुळ, अतुल शर्मा, ढाले, उटाणे आदी उपस्थित होते.लहान मूर्ती स्थापनेचा संकल्पनाचणगाव : दरवर्षी गणेशोत्सवात मोठ-मोठ्या आकर्षक अशा गणेशमूर्ती दिसतात व त्यांची स्थापना विविध मंडळांद्वारे करण्यात येते; पण यंदा पावसाने दडी मारल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले. परिणामी, नदी, नाल्यांना पाणी कमी आहे. यामुळे मिरा कॉलनी येथील गणेशोत्सव मंडळाने लहान मूर्ती स्थापन करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे.दरवर्षी शहर व परिसरातील गणेशमूर्तीचे विसर्जन वर्धा नदी पात्रात केले जाते. लहान-मोठे सर्वच मंडळ या पात्रात मूर्ती विसर्जित करतात. नदीचे पात्रही तुडुंब भरलेले असते; पण यंदा अत्यल्प पावसामुळे नदी पात्रातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे विसर्जनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मिरा कॉलनी येथील नागरिक दरवर्षी गणेशोतसव साजरा करतात. यात यंदा लहान मूर्ती बसविण्याचा संकल्प केला आहे. यामुळे कमी पाण्यात मूर्तीचे सहज विसर्जन होईल. मूर्ती मातीची असल्याने पाण्यात लवकर विसर्जित होईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचा मानस कॉलनीतील नागरिकांनी व्यक्त केला आहे. पावसाचे प्रमाण दिवसेंदिंवस कमी होत असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात पेयजल संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमी पाण्यात मोठ्या मूर्तीचे विसर्जन करणे शक्य नाही. शिवाय प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमुळे नैसर्गिक जलस्त्रोत बुजतात. हा प्रकार टाळण्यासाठी केवळ मातीच्याच मूर्ती स्थापन करणे गरजेचे झाले आहे. मिरा कॉलनीमध्ये लहान मूर्तीचा संकल्प केला असून नागरिकांनीही या उपक्रमाचे अनुकरण करणे पर्यावरणाच्या दृष्टीने गरजेचे झाले आहे.उत्सव काळात पर्यावरणपूरक वस्तू वापरावर्धा शहरात धार्मिक मंडळांतर्फे मोठ्या प्रमाणात लंगरचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यात प्लास्टिक प्लेटस् व वाट्यांचा उपयोग केला जातो. यामुळे शहरात प्रदूषण होत असून प्लास्टिक मातीत नष्ट होत नाही. यामुळे लंगरमध्ये प्लास्टिक प्लेटा व वाट्यांचा उपयोग न करता पळसाच्या पानाच्या पत्रावळी, द्रोणचा वापर करून शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन नगर पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.