शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे उड्डाण पुलाकरिता रास्ता रोको

By admin | Updated: May 14, 2016 01:58 IST

येथील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट नं. १४ वरील उड्डाण पुलाचे प्रलंबित बांधकाम तातडीने पूर्ण करण्यासाठी आम आदमी पार्टी व नगर विकास सुधार समिती,

३० जण स्थानबद्ध व सुटका : आश्वासनावर आंदोलकांची माघारहिंगणघाट : येथील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट नं. १४ वरील उड्डाण पुलाचे प्रलंबित बांधकाम तातडीने पूर्ण करण्यासाठी आम आदमी पार्टी व नगर विकास सुधार समिती, हिंगणघाटच्यावतीने शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास निदर्शने करीत अर्धा तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे दुतर्फा वाहनाच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी पोहोचून डिसेंबरपर्यंत पुलाचे काम पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी ३० जणांना स्थानबद्ध केले व नंतर त्यांची सुटका करण्यात आली. नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे ३० कोटी १० लाख रुपयांच्या बांधकामाचे कंत्राट विजयवाडा येथील के.व्ही.आर. इंजि. कंपनीला २०१० रोजी देण्यात आले. या कंत्राटनुसार दोन वर्षात पुलाचे बांधकाम करणे बंधनकारक असताना काम पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु २०१६ मध्येही पुलाचे काम जैसे थे स्थितीत आहे.दिल्ली ते चेन्नई या वर्दळीच्या रेल्वे मार्गावरील हिंगणघाट रेल्वे स्टेशन लगतच्या गेट नं. १४ वरून रेल्वे प्रवासी व मालगाड्याचे आवागमन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे रेल्वे फाटक बंद झाल्यावर चार पाच गाड्याचे आवागमन झाल्यानंतर गेट उघडे होत असल्याने किंवा गेट बंद होण्याचे भीतीने वाहनांच्या धावपळीतून होणाऱ्या अपघाताची संख्या वाढीवर आहे. तसेच अरूंद रस्त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दिवसातून अनेकदा प्रभावित होते. या पुलाचे बांधकाम पूर्णत्वास न्यावे म्हणून अनेक विनंती अर्ज करण्यात आले. परंतु काम मात्र पूर्णत्वास आले नाही. काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याचे आश्वासनहिंगणघाट : शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रा. दिवाकर गमे व मनोज रूपारेल यांच्यासह शेकडो युवकांनी निदर्शने करून काही वेळ महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. राष्ट्रीय महामार्गाचे टेक्नीकल मॅनेजर आशुतोष पिंपळे, के.एन.जे. प्रोजेक्टचे ब्रिज इंजिनिअर विजय बोधनकर यांनी आंदोलनस्थळी पोहोचून उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्ते मनोज रूपारेल व प्रा. गमे यांच्याशी चर्चा करून डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होण्याचे आश्वासन दिले. मुदतीत काम पूर्ण न झाल्यास महामार्ग प्राधिकरणच्या नागपूर कार्यालयात धरणे आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. आंदोलनात प्रमोद जुमडे, प्रफुल्ल क्षीरसागर, राजू अर्गुले, दिनेश रूपारेल, कमलाकर बोकडे, भाऊराव काटकर, अशोक जुनानी, आशिष शर्मा, अक्षय मुपीडवार, शेखर जामुनकर, अनिल खैरे, संदेश थुल, शशीकांत गिरी, ताराचंद भोयर, बल्लू गुप्ता, जगदीश शुक्ला, कवडू साळवे, विनोद कुंभारे, राकेश नगरवार, अखिल धाबर्डे, संजय बावणे, जितेंद्र रूपारेल, भारत ठाकूर, राजू जोशी, कहीमभाई, राजेंद्र पचोरी, ग्वाल आचार्य यांना पोलिसांनी स्थानबद्ध करून सोडले.(तालुका प्रतिनिधी)