शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महावितरणकडून दंड स्वरूपात होणारी लूट थांबवा

By admin | Updated: June 29, 2016 02:11 IST

महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांना विलंबाने बिल देऊन ते मुदतीत अदा करण्याचा आग्रह केला जातो.

मनसेचा मुख्य अभियंत्याला घेराव : अन्यथा नागरिक वीज बिल भरण्यास नकार देणारहिंगणघाट : महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांना विलंबाने बिल देऊन ते मुदतीत अदा करण्याचा आग्रह केला जातो. यात ग्राहकांना मुदतीत बिल न भरता आल्यास सरासरी २० रुपये दंड आकारला जाते. ही जनतेची लूट असून दंड आकारणे बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली. यासाठी मुख्य अभियंत्यांना शुक्रवारी घेराव करून निवेदन देण्यात आले. घरगुती वीज ग्राहकांना विजेचे बिल दर महिन्याला मुदतीपर्यंत पोहोचविले जात नाही. बिल उशिरा मिळाल्याने मुदतीत देयकाचा भरणा करता येत नाही. यानंतर ग्राहकांवर सरासरी २० रुपये दंड आकारला जातो. यात ग्राहकांचा कसूर नसतो. वीज कंपनीच्या लेटलतिफ कारभारामुळे ग्राहकांकडून दर महिन्याला दंडाच्या स्वरूपात कोट्यवधीची रक्कम वसूल केली जाते. या मागे कंपनीचे षडयंत्र आहे. कंपनी ग्राहकांना वीज बिल उशिरा पोहोचविते. ही गरीब ग्राहकांची लूट आहे. ही लूट करण्यासाठीच वीज देयक उशिरा पोहोचविणे, मुदत कमी देणे, दंडाची रक्कम टक्केवारीने वाढविणे या बाबींची तरतूद कंपनीने केल्याचे दिसते. ही लूट थांबावी म्हणून ग्राहकांना त्यांचे वीज बिल किमान आठ दिवसांपूर्वी द्यावे, अन्यथा दंड आकारू नये. सदर बाबींची गंभीर दखल घेत कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून मनसेने केली. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, उपाध्यक्ष अमोल बोरकर, राहुल सोरटे, सचिव सुनील भुते, मनविसे शहराध्यक्ष राजू सिन्हा, डॉ. अशोक रेवतकर, लक्ष्मण सावरकर, गोमासे, ज्ञानेश्वर महाजन, नितीन भुते, देवेश कुबडे, जगदीश मुडे, नरेश चिरकुटे, गजानन कलोडे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)