शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ग्रामीण व शहरी वर्गवारी करून प्राधिकरणाची सरसकट वसुली बंद करा

By admin | Updated: May 3, 2015 01:47 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे ग्राहकांची ग्रामीण, शहरी अशी वर्गवारी न करता सरसकट देयक आकारले जात आहे़ यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ ...

वर्धा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे ग्राहकांची ग्रामीण, शहरी अशी वर्गवारी न करता सरसकट देयक आकारले जात आहे़ यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ ही दरवाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले़ पिपरी मेघे येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत अकरा गावांना पाणी पुरवठा केला जातो़ यात ग्रामीण भागाचे दर प्रती युनीट ६.६० रुपये नुसार किमान दर प्रतिमाह ७० रुपये लागू करणे गरजेचे होते; पण प्राधिकरणने ग्राहकांची वर्गवारी न करता सर्वांची वर्गवारी शहरी भागात करून शहरी भागाचे प्रती युनिट १४.० रुपये व किमान वापराचे दर प्रतिमाह १४० रुपये लागू करून वसुली केली़ पिपरी मेघे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या प्रारंभापासूनच प्राधिकरण अकरा गावांतील जनतेची लूट करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे़ चार वर्षांपूर्वी जिल्हा ग्राहक मंचाने सकारात्मक निर्णय दिला आहे; पण प्राधिकरणने राज्य ग्राहक आयोगाकडून या निर्णयावर स्थगिती मिळविली़ चार वर्षानंतर राज्य ग्राहक आयोगाच्या अध्यक्षांनी निकाल देणे आमच्या अधिकार कक्षेत बसत नसल्याचे जाहीर केले़ ही खेदाची व बाब आहे. वस्तुस्थिती व भोंगळ कार्यपद्धती लक्षात घेऊन जीवन प्राधिकरणला वेळोवेळी आदेशित केल्यानुसार ग्रामीण भागातील ग्राहकांना ग्रामीण दर लागू करून द्यावे, अधिकची केलेली वसुलीची रक्कम पुढील बिलाशी समायोजित करून द्यावी़ ग्रामीण जनतेची ही समस्या १५ दिवसांत सोडवून निकाली काढावी़ अन्यथा जनशक्ती संघटीत करून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आपच्या अंजली दमानीया, सामाजिक कार्यकर्त्या प्रतीभा शिंदे यांनी दिला आहे. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)