शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण व शहरी वर्गवारी करून प्राधिकरणाची सरसकट वसुली बंद करा

By admin | Updated: May 3, 2015 01:47 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे ग्राहकांची ग्रामीण, शहरी अशी वर्गवारी न करता सरसकट देयक आकारले जात आहे़ यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ ...

वर्धा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे ग्राहकांची ग्रामीण, शहरी अशी वर्गवारी न करता सरसकट देयक आकारले जात आहे़ यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ ही दरवाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले़ पिपरी मेघे येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत अकरा गावांना पाणी पुरवठा केला जातो़ यात ग्रामीण भागाचे दर प्रती युनीट ६.६० रुपये नुसार किमान दर प्रतिमाह ७० रुपये लागू करणे गरजेचे होते; पण प्राधिकरणने ग्राहकांची वर्गवारी न करता सर्वांची वर्गवारी शहरी भागात करून शहरी भागाचे प्रती युनिट १४.० रुपये व किमान वापराचे दर प्रतिमाह १४० रुपये लागू करून वसुली केली़ पिपरी मेघे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या प्रारंभापासूनच प्राधिकरण अकरा गावांतील जनतेची लूट करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे़ चार वर्षांपूर्वी जिल्हा ग्राहक मंचाने सकारात्मक निर्णय दिला आहे; पण प्राधिकरणने राज्य ग्राहक आयोगाकडून या निर्णयावर स्थगिती मिळविली़ चार वर्षानंतर राज्य ग्राहक आयोगाच्या अध्यक्षांनी निकाल देणे आमच्या अधिकार कक्षेत बसत नसल्याचे जाहीर केले़ ही खेदाची व बाब आहे. वस्तुस्थिती व भोंगळ कार्यपद्धती लक्षात घेऊन जीवन प्राधिकरणला वेळोवेळी आदेशित केल्यानुसार ग्रामीण भागातील ग्राहकांना ग्रामीण दर लागू करून द्यावे, अधिकची केलेली वसुलीची रक्कम पुढील बिलाशी समायोजित करून द्यावी़ ग्रामीण जनतेची ही समस्या १५ दिवसांत सोडवून निकाली काढावी़ अन्यथा जनशक्ती संघटीत करून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आपच्या अंजली दमानीया, सामाजिक कार्यकर्त्या प्रतीभा शिंदे यांनी दिला आहे. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)