शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

सेलू बसस्थानकावर जलद गाड्यांचा थांबा द्या

By admin | Updated: November 16, 2014 23:11 IST

येथील बसस्थानकावर एकही जलद बसगाडी येत नाही. सर्व बसेस नागपूर-वर्धा मार्गावर उडाणपुलाजवळ थांबा देतात. त्यामुळे केवळ गावखेड्यात जाणाऱ्या जनता बस करिताच हे स्थानक असल्याचे दिसते.

सेलू : येथील बसस्थानकावर एकही जलद बसगाडी येत नाही. सर्व बसेस नागपूर-वर्धा मार्गावर उडाणपुलाजवळ थांबा देतात. त्यामुळे केवळ गावखेड्यात जाणाऱ्या जनता बस करिताच हे स्थानक असल्याचे दिसते. त्यामुळे सर्व जलद गाडया या बसस्थानकावर याव्या अशी मागणी प्रवासी वर्गातून वारंवार केली जात आहे. काही वर्षापूर्वी सर्व सुपर बसगाड्यांसह जनता गाड्या या स्थानकावर थांबून पूढे जायच्या. परंतु तालुकास्तरावरील महत्त्वाचे बसस्थानक आज मात्र दुर्लक्षित झाले. रात्रीचा अंधार पडण्याआधीच येथे सर्व सामसूम झालेले असते. निर्मनुष्यतेचा फायदा घेत येथे अनुचित प्रकार वाढत असल्याची लोकांना भीती आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व बसगाड्या स्थानकात याव्या असे सर्वांना वाटते, मात्र बसस्थानकावर बसगाड्यांचे आवागमन करताना वाढते अतिक्रमण व रस्त्याच्या दुतर्फा दुकानाचा त्रास होतो. यामुळे बसचालक बसस्थानकावर बस पोहचवू शकत नाही. ग्रामपंचायत व बांधकाम विभाग यांनी समन्वय ठेवून रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण कमी केले तर बसस्थानकावर बस पोहचू शकते. ग्रामपंचायत प्रशासन या प्रयत्नात आहे. त्यांनी सिमेंट रस्त्याच्या दोनही बाजूला डांबरी रस्त्याचे जोड लावून रस्ता मोठा केला. रस्त्याच्या मधात येणारे हनुमानजींचे मंदिर दुसरीकडे स्थानांतरित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र काही मंडळी मंदिराला हटविण्याबाबत तसेच विशालकाय झाडाला कापण्याचाही विरोध आहे. सर्वांचा विश्वास संपादन करुन व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सांभाळून हे मंदिर हटविण्यात आले तर वळणावर रस्ता मोठा होवून वाहतुकीची कोंडी सुटू शकते. परंतु मंदिर हटविण्याची प्रक्रिया थोडी अडचणीची ठरत असल्याने कामास विलंब होत आहे.ग्रामपंचायत प्रशासन सर्व जलद बसगाड्या गावात येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितल्या जाते. बायपास थांब्यावर प्रसाधनग्रह उभारण्यास जागा नसल्याने प्रवाशांची व विशेषता: महिलांची कुचंबना होते. यामुळे गावातील बसस्थानकावर सर्व बसगाड्यांचा थांबा असल्यास सर्व प्रश्न मिटू शकतात. त्यामुळे बसगाड्या बसस्थानकावर याव्यात अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)