शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांची फरफट थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप बहुतांश शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. तसेच कर्जमाफी योजनेतील अडचणीही कायम आहेत. अशा अवस्थेत बँक व्यवस्थापकांकडून शेतकºयांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन पीक कर्जाकरिता होणारी फरफट थांबवावी, अशा सूचना वर्धेचे आ.डॉ. पंकज भोयर यांनी प्रशासनाला ...

ठळक मुद्देआमदारांनी दिल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप बहुतांश शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. तसेच कर्जमाफी योजनेतील अडचणीही कायम आहेत. अशा अवस्थेत बँक व्यवस्थापकांकडून शेतकºयांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन पीक कर्जाकरिता होणारी फरफट थांबवावी, अशा सूचना वर्धेचे आ.डॉ. पंकज भोयर यांनी प्रशासनाला सोमवारी दिल्या.जिल्हाकचेरीत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत आ.डॉ. भोयर यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, नगर रचनाकार सुनील देशमुख, अग्रणी बँक व्यवस्थापक वामन कोहाड, सहायक उपनिबंधक जयंत तलमले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी व उपअभियंता मंत्री यांची उपस्थिती होती.यावेळी शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर, जयंत कावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद भेंडे, अशोक कलोडे, नगर पालिका बांधकाम सभापती नौशाद शेख, माजी बांधकाम सभापती निलेश किटे यांनी विविध समस्या मांडल्या.सेलू तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे शेतकरी संतप्त झाला असल्याने अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. तेव्हाच जिल्हाधिकारी नवाल यांनी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक कोहाड यांना कारवाईच्या सूचना केल्या. तसेच सहकार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाºयांवप्रमाणे नियमात राहून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्याचेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. या बैठकीला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही समस्यांचा पाढा वाचला.कंत्राटदाराला दिला तीन दिवसांचा अतिरिक्त वेळशहरातील दादाजी धुनिवाले चौक ते धंतोली चौकापर्यंतच्या सिमेंटीकरण व रूंदीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्याचा विचार करता ३० मे पर्यंत रस्त्याचे व नालीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना आमदारांनी बांधकाम विभागाला दिल्या होत्या. या वेळात काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदारावर रोजचा एक लाखांचा दंड ठोठावा, असेही सांगितले होते. कालावधी निघून गेला; पण काम पूर्णत्वास गेले नसल्याने दंड आकारण्याच्या सूचना या बैठकीत केल्या असता बांधकाम विभागाकडून तीन दिवसांचा अतिरिक्त कालावधी मागण्यात आला, त्यामुळे जिल्हाधिकारी नवाल यांनीच तीन दिवसात काम पूर्ण करा अन्यथा कंत्राटदारावर दंड आकार अशा सूचना केल्या.पांदण रस्त्याकरिता शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसादशेतकऱ्यांच्यापांदण रस्त्याची मोठी अडचण होत असल्याने अतिक्रमण मुक्त पांदण रस्ते ही योजना आपल्या जिल्ह्यात राबविण्यात आली आहे. याकरिता शेतकऱ्यांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत २०० किलो मीटर पर्यंतचे पांदण रस्ते मोकळे करण्यात आले आहे. मागणीनुसार मशीन कमी पडत असल्याने अजूनही १२० अर्ज प्रलंबित असल्याचे यावेळी आमदारांना सांगण्यात आले आहे.