शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसचा थांबा द्या

By admin | Updated: April 20, 2015 01:48 IST

परिसरातील प्रवाश्यांना अत्यंत सोयीची ठरणारी तसेच रेल्वे विभागाला भरपूर महसूल देऊ शकणारी अमरावती-जबलपूर ही एक्स्प्रेस येथील रेल्वेस्थानकावर थांबत नाही.

सिंदी (रेल्वे) : परिसरातील प्रवाश्यांना अत्यंत सोयीची ठरणारी तसेच रेल्वे विभागाला भरपूर महसूल देऊ शकणारी अमरावती-जबलपूर ही एक्स्प्रेस येथील रेल्वेस्थानकावर थांबत नाही. यामुळे प्रवाश्यांनाही त्रास होतो. या रेल्वेगाडीला सिंदी रेल्वे येथे थांबा द्यावा, अशी मागणी प्रवाश्यांतून होत आहे. याबाबत विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळाचे सदस्य व भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. मुख्यमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांच्या या मागणीची त्वरित दखल घेत निवेदनाची प्रत रेल्वे व्यवस्थापक ओ.पी. सिंह यांच्या स्वाधीन केली. येथील सुमारे ६५० विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच सामान्य नागरिक दररोज वर्धा शहरात ये-जा करतात. सायंकाळी वर्धा येथून परत येण्याकरिता अमरावती-नागपूर पॅसेंजर ही एकमेव गाडी आहे. ही गाडी चुकल्यास वा शासकीय कार्यालय, न्यायालयातील कामे सहानंतरच पूर्ण होत असल्याने ही गाडी नागरिकांना पकडता येत नाही. यामुळे अमरावती-जबलपूर एक्सप्रेसचा थांबा सिंदी येथे द्यावा, अशी मागणी होत आहे. यासाठी गत दोन वर्षांपासून प्रयत्न होत आहेत. या प्रकरणी आता थेट मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालावे, अशी भूमिका आ. कुणावार यांनी घेतली. जाम येथील कार्यक्रमातही विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळाच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस आदींची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते. यानंतर सादर केलेल्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. निवेदन सादर करताना प्रविण सिर्सीकर, ओमप्रकाश राठी, सुधाकर खेडकर, नीरज दुबे, गुल्लू भंसाली यांच्यासह भाजप व विद्यार्थी प्रवासी मित्रमंडळाचे पदाधिकारी हजर होते.(प्रतिनिधी)