शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:35 IST

अंबिकापूर पुनर्वसन ते भाईपूर पुनर्वसन पर्यंतच्या तीन किमीच्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता या मार्गाचे तात्काळ सिमेंटीकरण करण्यात यावे,.....

ठळक मुद्देतीन किमीचा मार्ग दुरूस्तीच्या प्रतीक्षेत : तत्काळ कार्यवाहीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : अंबिकापूर पुनर्वसन ते भाईपूर पुनर्वसन पर्यंतच्या तीन किमीच्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता या मार्गाचे तात्काळ सिमेंटीकरण करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.गत अनेक वर्षांपासून दुर्लक्षीत असलेला अंबिकापूर ते भाईपूर हा तीन कि.मी.चा रस्ता सरकारने गुळगुळीत करून दिल्यास आर्वी ही बाजारपेठ गाठण्यासाठी अंबिकापूर येथील शेतकºयांसह नागरिकांचा वेळ व फेरा वाचनार आहे. याच रस्त्यावर गावातील अनेक प्रकल्पग्रस्तांच्या शेजजमिनी असून त्यांनाही याचा फायदा होणार आहे. तेथील रहिवाशांना आर्वी ही बाजारपेठ गाठण्यासाठी सुमारे १३ किमीच्या फेºयाचा प्रवास सध्या करावा लागत आहे. या गावातील सुमारे ५० विद्यार्थी दररोज आर्वी शहरात शिक्षणाकरिता ये-जा करतात. त्यांनाही सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आर्वी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने प्रत्येक कामासाठी या गावातील नागरिकांना येथे यावे लागते. वि. पा. वि. मंडळाने कुठलाही विचार न करता व गावातील नागरिकांना विश्वासात न घेता १३ किमी अंतराचा रस्ता या गावातील लोकांच्या वहिवाटीसाठी तयार केला. परंतु, तो मार्ग सध्या अडचणी वाढविणाराच ठरत आहे, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. सदर प्रकरण ग्रामस्थांनी माजी आमदार दादाराव केचे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्याच्या नेतृत्त्वात ग्रामस्थांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर मागणीचे निवेदन सादर केले.यावेळी झालेल्या चर्चेअंती नागरिकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करून तेथील रहिवाशांना दिलासा देण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना माजी आमदार दादाराव केचे यांच्यासह राजु कदम, प्रमोद चौहान, रामदास कडु, रामेश्वर खोंडे, रितेश बोके, मारोतराव खोंडे, सुकेश खोंडे, विठ्ठल गवळीकर आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना माजी आमदार दादाराव केचे यांनी अंबिकापूर परिसरातील नागरिकांची समस्या प्रभाविपणे मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने तेथील रहिवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.