शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
4
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
5
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
6
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
7
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
8
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
9
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
10
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
11
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
12
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
13
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
14
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
16
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
17
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
18
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
19
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
20
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...

रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:35 IST

अंबिकापूर पुनर्वसन ते भाईपूर पुनर्वसन पर्यंतच्या तीन किमीच्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता या मार्गाचे तात्काळ सिमेंटीकरण करण्यात यावे,.....

ठळक मुद्देतीन किमीचा मार्ग दुरूस्तीच्या प्रतीक्षेत : तत्काळ कार्यवाहीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : अंबिकापूर पुनर्वसन ते भाईपूर पुनर्वसन पर्यंतच्या तीन किमीच्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता या मार्गाचे तात्काळ सिमेंटीकरण करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.गत अनेक वर्षांपासून दुर्लक्षीत असलेला अंबिकापूर ते भाईपूर हा तीन कि.मी.चा रस्ता सरकारने गुळगुळीत करून दिल्यास आर्वी ही बाजारपेठ गाठण्यासाठी अंबिकापूर येथील शेतकºयांसह नागरिकांचा वेळ व फेरा वाचनार आहे. याच रस्त्यावर गावातील अनेक प्रकल्पग्रस्तांच्या शेजजमिनी असून त्यांनाही याचा फायदा होणार आहे. तेथील रहिवाशांना आर्वी ही बाजारपेठ गाठण्यासाठी सुमारे १३ किमीच्या फेºयाचा प्रवास सध्या करावा लागत आहे. या गावातील सुमारे ५० विद्यार्थी दररोज आर्वी शहरात शिक्षणाकरिता ये-जा करतात. त्यांनाही सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आर्वी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने प्रत्येक कामासाठी या गावातील नागरिकांना येथे यावे लागते. वि. पा. वि. मंडळाने कुठलाही विचार न करता व गावातील नागरिकांना विश्वासात न घेता १३ किमी अंतराचा रस्ता या गावातील लोकांच्या वहिवाटीसाठी तयार केला. परंतु, तो मार्ग सध्या अडचणी वाढविणाराच ठरत आहे, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. सदर प्रकरण ग्रामस्थांनी माजी आमदार दादाराव केचे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्याच्या नेतृत्त्वात ग्रामस्थांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर मागणीचे निवेदन सादर केले.यावेळी झालेल्या चर्चेअंती नागरिकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करून तेथील रहिवाशांना दिलासा देण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना माजी आमदार दादाराव केचे यांच्यासह राजु कदम, प्रमोद चौहान, रामदास कडु, रामेश्वर खोंडे, रितेश बोके, मारोतराव खोंडे, सुकेश खोंडे, विठ्ठल गवळीकर आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना माजी आमदार दादाराव केचे यांनी अंबिकापूर परिसरातील नागरिकांची समस्या प्रभाविपणे मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने तेथील रहिवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.