शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:35 IST

अंबिकापूर पुनर्वसन ते भाईपूर पुनर्वसन पर्यंतच्या तीन किमीच्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता या मार्गाचे तात्काळ सिमेंटीकरण करण्यात यावे,.....

ठळक मुद्देतीन किमीचा मार्ग दुरूस्तीच्या प्रतीक्षेत : तत्काळ कार्यवाहीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : अंबिकापूर पुनर्वसन ते भाईपूर पुनर्वसन पर्यंतच्या तीन किमीच्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता या मार्गाचे तात्काळ सिमेंटीकरण करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.गत अनेक वर्षांपासून दुर्लक्षीत असलेला अंबिकापूर ते भाईपूर हा तीन कि.मी.चा रस्ता सरकारने गुळगुळीत करून दिल्यास आर्वी ही बाजारपेठ गाठण्यासाठी अंबिकापूर येथील शेतकºयांसह नागरिकांचा वेळ व फेरा वाचनार आहे. याच रस्त्यावर गावातील अनेक प्रकल्पग्रस्तांच्या शेजजमिनी असून त्यांनाही याचा फायदा होणार आहे. तेथील रहिवाशांना आर्वी ही बाजारपेठ गाठण्यासाठी सुमारे १३ किमीच्या फेºयाचा प्रवास सध्या करावा लागत आहे. या गावातील सुमारे ५० विद्यार्थी दररोज आर्वी शहरात शिक्षणाकरिता ये-जा करतात. त्यांनाही सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आर्वी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने प्रत्येक कामासाठी या गावातील नागरिकांना येथे यावे लागते. वि. पा. वि. मंडळाने कुठलाही विचार न करता व गावातील नागरिकांना विश्वासात न घेता १३ किमी अंतराचा रस्ता या गावातील लोकांच्या वहिवाटीसाठी तयार केला. परंतु, तो मार्ग सध्या अडचणी वाढविणाराच ठरत आहे, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. सदर प्रकरण ग्रामस्थांनी माजी आमदार दादाराव केचे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्याच्या नेतृत्त्वात ग्रामस्थांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर मागणीचे निवेदन सादर केले.यावेळी झालेल्या चर्चेअंती नागरिकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करून तेथील रहिवाशांना दिलासा देण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना माजी आमदार दादाराव केचे यांच्यासह राजु कदम, प्रमोद चौहान, रामदास कडु, रामेश्वर खोंडे, रितेश बोके, मारोतराव खोंडे, सुकेश खोंडे, विठ्ठल गवळीकर आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना माजी आमदार दादाराव केचे यांनी अंबिकापूर परिसरातील नागरिकांची समस्या प्रभाविपणे मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने तेथील रहिवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.