शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

पुतळ्यांचेही पालटले दिवस

By admin | Updated: October 8, 2014 23:31 IST

कोणत्याही निवडणुका म्हटल्या की राजकारणी डोकी चालू लागतात़ त्यातही राज्यासाठी महत्त्वाची निवडणूक यंदा होऊ घातली आहे़ निवडून येण्याकरिता वाट्टेल ते केले जाते़ याची प्रचिती सध्या पावलागणिक येताना दिसते़

विधानसभा निवडणूक : वर्षभर होते महात्म्यांकडे दुर्लक्षप्रशांत हेलोंडे - वर्धाकोणत्याही निवडणुका म्हटल्या की राजकारणी डोकी चालू लागतात़ त्यातही राज्यासाठी महत्त्वाची निवडणूक यंदा होऊ घातली आहे़ निवडून येण्याकरिता वाट्टेल ते केले जाते़ याची प्रचिती सध्या पावलागणिक येताना दिसते़ प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून शेवटचे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत़ या पाच दिवसांत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची लगीनघाई उमेदवारांना करावी लागणार आहे़ यासाठीच जीवाचा आटापिटा केला जात असल्याचे दिसते़ प्रचाराच्या याच रणधुमाळीत विधानसभा मतदार संघांतील पुतळ्यांचेही दिवस पालटत असल्याचे दिसून येत आहे़ विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा मोठ्या प्रमाणात गरजू लागल्या आहेत़ १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून उमेदवारांना १३ आॅक्टोबरपर्यंतच प्रचार करता येणार आहे़ यामुळे पाच दिवसांतच सर्व उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्याची शिकस्त करावी लागणार आहे़ यामुळे उमेदवारांनी जमेल तेवढे कार्यकर्ते हाताशी धरून पायदळ वाऱ्या, रॅली, मोटर सायकल रॅली आदींद्वारे प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न करीत आहे़ यासाठी विविध ‘फंडे’ अवलंबिले जात आहेत़ कुणी शहरातील प्रत्येक गल्ली-बोळात फिरून मतदारांना आवाहन करीत आहेत तर कुणी व्यापाऱ्यांची साथ मिळते काय, हे तपासताना दिसत आहे़ याच काळात राजकीय पक्षांसह सर्वच उमेदवारांना शहरातील महात्म्यांच्या पुतळ्यांची आठवण होत असल्याचे दिसून येते़ थोर पुरूषांच्या आठवणी चिरकाल स्मरणात राहाव्या म्हणून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पुतळे बसविण्यात आले आहेत़ यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, झांशीची राणी यासह अन्य महात्म्यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे़ वर्षभर या पुतळ्यांकडे कुणी ढुंकून पाहत नाही़ संबंधित महात्म्याच्या जयंती, पुण्यतिथी दिनीच त्यांची स्वच्छता करून हार घातले जातात़ यानंतर मात्र सर्वच पुतळ्यांकडे दुर्लक्ष केले जाते़ विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महात्म्यांची प्रत्येकच उमेदवाराला आठवण होऊ लागल्याचे दिसते़ प्रचाराचे नारळ फोडताना एखाद्या महान पुरूषाच्या पुतळ्याला हारार्पण करीत अभिवादन केले जाते़ काही उमेदवार प्रचार रॅली काढताना पुतळ्यांना हारार्पण करतात़ प्रत्येकच निवडणुकीत हा प्रकार दिसतो़ यंदाही तो प्रकर्षाने समोर येत आहे़ शहरात विविध पुतळ्यांना उमेदवार हारार्पण करून हात जोडताना दिसतात़ यानंतर मात्र त्या पुतळ्यांकडे त्यांचेही दुर्लक्षच होते़