शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पुतळ्यांचेही पालटले दिवस

By admin | Updated: October 8, 2014 23:31 IST

कोणत्याही निवडणुका म्हटल्या की राजकारणी डोकी चालू लागतात़ त्यातही राज्यासाठी महत्त्वाची निवडणूक यंदा होऊ घातली आहे़ निवडून येण्याकरिता वाट्टेल ते केले जाते़ याची प्रचिती सध्या पावलागणिक येताना दिसते़

विधानसभा निवडणूक : वर्षभर होते महात्म्यांकडे दुर्लक्षप्रशांत हेलोंडे - वर्धाकोणत्याही निवडणुका म्हटल्या की राजकारणी डोकी चालू लागतात़ त्यातही राज्यासाठी महत्त्वाची निवडणूक यंदा होऊ घातली आहे़ निवडून येण्याकरिता वाट्टेल ते केले जाते़ याची प्रचिती सध्या पावलागणिक येताना दिसते़ प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून शेवटचे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत़ या पाच दिवसांत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची लगीनघाई उमेदवारांना करावी लागणार आहे़ यासाठीच जीवाचा आटापिटा केला जात असल्याचे दिसते़ प्रचाराच्या याच रणधुमाळीत विधानसभा मतदार संघांतील पुतळ्यांचेही दिवस पालटत असल्याचे दिसून येत आहे़ विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा मोठ्या प्रमाणात गरजू लागल्या आहेत़ १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून उमेदवारांना १३ आॅक्टोबरपर्यंतच प्रचार करता येणार आहे़ यामुळे पाच दिवसांतच सर्व उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्याची शिकस्त करावी लागणार आहे़ यामुळे उमेदवारांनी जमेल तेवढे कार्यकर्ते हाताशी धरून पायदळ वाऱ्या, रॅली, मोटर सायकल रॅली आदींद्वारे प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न करीत आहे़ यासाठी विविध ‘फंडे’ अवलंबिले जात आहेत़ कुणी शहरातील प्रत्येक गल्ली-बोळात फिरून मतदारांना आवाहन करीत आहेत तर कुणी व्यापाऱ्यांची साथ मिळते काय, हे तपासताना दिसत आहे़ याच काळात राजकीय पक्षांसह सर्वच उमेदवारांना शहरातील महात्म्यांच्या पुतळ्यांची आठवण होत असल्याचे दिसून येते़ थोर पुरूषांच्या आठवणी चिरकाल स्मरणात राहाव्या म्हणून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पुतळे बसविण्यात आले आहेत़ यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, झांशीची राणी यासह अन्य महात्म्यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे़ वर्षभर या पुतळ्यांकडे कुणी ढुंकून पाहत नाही़ संबंधित महात्म्याच्या जयंती, पुण्यतिथी दिनीच त्यांची स्वच्छता करून हार घातले जातात़ यानंतर मात्र सर्वच पुतळ्यांकडे दुर्लक्ष केले जाते़ विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महात्म्यांची प्रत्येकच उमेदवाराला आठवण होऊ लागल्याचे दिसते़ प्रचाराचे नारळ फोडताना एखाद्या महान पुरूषाच्या पुतळ्याला हारार्पण करीत अभिवादन केले जाते़ काही उमेदवार प्रचार रॅली काढताना पुतळ्यांना हारार्पण करतात़ प्रत्येकच निवडणुकीत हा प्रकार दिसतो़ यंदाही तो प्रकर्षाने समोर येत आहे़ शहरात विविध पुतळ्यांना उमेदवार हारार्पण करून हात जोडताना दिसतात़ यानंतर मात्र त्या पुतळ्यांकडे त्यांचेही दुर्लक्षच होते़