शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

शहरातील पुतळ्यांना अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयापुढील देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे. या पुतळ्याला दररोज मालवाहू वाहनांनी वेढा घातलेला असतो. याशिवाय पुतळ्यावर धुळीचा थर असून स्वच्छता केली जात नाही. केवळ जयंती आणि पुण्यतिथीलाच नगरपालिकेला स्वच्छतेचा पुळका येतो. इतरवेळी पुतळ्यांची देखभाल आणि सुरक्षा वाऱ्यावर असते.

ठळक मुद्देनगरपालिकेची डोळेझाक : देखभालही वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील इतिहासाची साक्ष देणाºया अनेक पुतळ्यांना अतिक्रमणाने सदैव विळखा घातलेला असतो. याशिवाय देखभालही वाऱ्यावर असून याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयापुढील देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे. या पुतळ्याला दररोज मालवाहू वाहनांनी वेढा घातलेला असतो. याशिवाय पुतळ्यावर धुळीचा थर असून स्वच्छता केली जात नाही. केवळ जयंती आणि पुण्यतिथीलाच नगरपालिकेला स्वच्छतेचा पुळका येतो. इतरवेळी पुतळ्यांची देखभाल आणि सुरक्षा वाऱ्यावर असते. वाहनांनी पुतळ्याला वेढा घातलेला राहत असताना याकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष आहे. सुभाषबाबूंच्या पुतळ्याची कित्येक वर्षांपासून रंगरंगोटीही करण्यात आलेली नाही. पुतळ्याच्या आत शोभिवंत आणि फुलझाडांचाही पत्ता नसून जंगली झुडपांचे पीक आले आहे. नागपूर मार्गालगत आरती चित्रपटगृह चौकात प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांचा पुतळा आहे. या पुतळ्यालाही वाहनांनी वेढा घातलेला असतो. पुतळ्याच्या समोर जड वाहने नेहमी मुक्कामी असतात. यामुळे अपघाताचाही धोका बळावला आहे. मात्र, वाहतूक पोलिसांवर ट्रकमालकांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे येथे नेमका पुतळा तरी कुणाचा, असा प्रश्न प्रवाशांना पडतो. पुतळा परिसराचे कित्येक वर्षांपूर्वी सौंदर्यीकरण करण्यात आले होते. वैविध्यपूर्ण दिवे लावण्यासोबतच कारंजे सुरू करण्यात आले होते. याशिवाय शोभेची झाडेही लावण्यात आली होती. मात्र, देखभालच केली जात नसल्याने अनेक झाडे जळाली असून सद्यस्थितीत कारंजेही बंद आहे. नियमित देखभालच केली जात नसल्याने पुतळ्यांना समस्यांनी ग्रासले आहे. शहरात विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. यामुळे अनेक पुतळे धुळीने माखले असताना पालिकेच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. पुतळ्यांच्या सौंदर्यीकरणासोबतच अतिक्रमणमुक्त करावे, पुतळ्यांची नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी