शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पुतळ्यांना अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयापुढील देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे. या पुतळ्याला दररोज मालवाहू वाहनांनी वेढा घातलेला असतो. याशिवाय पुतळ्यावर धुळीचा थर असून स्वच्छता केली जात नाही. केवळ जयंती आणि पुण्यतिथीलाच नगरपालिकेला स्वच्छतेचा पुळका येतो. इतरवेळी पुतळ्यांची देखभाल आणि सुरक्षा वाऱ्यावर असते.

ठळक मुद्देनगरपालिकेची डोळेझाक : देखभालही वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील इतिहासाची साक्ष देणाºया अनेक पुतळ्यांना अतिक्रमणाने सदैव विळखा घातलेला असतो. याशिवाय देखभालही वाऱ्यावर असून याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयापुढील देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे. या पुतळ्याला दररोज मालवाहू वाहनांनी वेढा घातलेला असतो. याशिवाय पुतळ्यावर धुळीचा थर असून स्वच्छता केली जात नाही. केवळ जयंती आणि पुण्यतिथीलाच नगरपालिकेला स्वच्छतेचा पुळका येतो. इतरवेळी पुतळ्यांची देखभाल आणि सुरक्षा वाऱ्यावर असते. वाहनांनी पुतळ्याला वेढा घातलेला राहत असताना याकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष आहे. सुभाषबाबूंच्या पुतळ्याची कित्येक वर्षांपासून रंगरंगोटीही करण्यात आलेली नाही. पुतळ्याच्या आत शोभिवंत आणि फुलझाडांचाही पत्ता नसून जंगली झुडपांचे पीक आले आहे. नागपूर मार्गालगत आरती चित्रपटगृह चौकात प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांचा पुतळा आहे. या पुतळ्यालाही वाहनांनी वेढा घातलेला असतो. पुतळ्याच्या समोर जड वाहने नेहमी मुक्कामी असतात. यामुळे अपघाताचाही धोका बळावला आहे. मात्र, वाहतूक पोलिसांवर ट्रकमालकांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे येथे नेमका पुतळा तरी कुणाचा, असा प्रश्न प्रवाशांना पडतो. पुतळा परिसराचे कित्येक वर्षांपूर्वी सौंदर्यीकरण करण्यात आले होते. वैविध्यपूर्ण दिवे लावण्यासोबतच कारंजे सुरू करण्यात आले होते. याशिवाय शोभेची झाडेही लावण्यात आली होती. मात्र, देखभालच केली जात नसल्याने अनेक झाडे जळाली असून सद्यस्थितीत कारंजेही बंद आहे. नियमित देखभालच केली जात नसल्याने पुतळ्यांना समस्यांनी ग्रासले आहे. शहरात विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. यामुळे अनेक पुतळे धुळीने माखले असताना पालिकेच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. पुतळ्यांच्या सौंदर्यीकरणासोबतच अतिक्रमणमुक्त करावे, पुतळ्यांची नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी