शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शकुंतलेच्या कामास सुरुवात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:41 IST

येत्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आर्वी व पुलगाव, देवळी मतदारसंघ भाजपला जिंकायचे असेल तर पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामाचा प्रारंभ करावा, अशी मागणी शकुंतला मुक्ती व विकास कृती समितीचे सचिव बाबासाहेब गलाट यांनी केली आहे.

ठळक मुद्देविदर्भ शकुंतला मुक्ती व विकास कृती समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : येत्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आर्वी व पुलगाव, देवळी मतदारसंघ भाजपला जिंकायचे असेल तर पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामाचा प्रारंभ करावा, अशी मागणी शकुंतला मुक्ती व विकास कृती समितीचे सचिव बाबासाहेब गलाट यांनी केली आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत आर्वी व देवळी पुलगाव या दोन्ही मतदारसंघात भाजपला मताधिक्य होते; परंतु शकुंतला रेल्वेबाबत भाजपने केवळ आश्वासन दिले. आश्वासनाची पूर्ती न झाल्यानेच लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला आर्वी व देवळी-पुलगाव या दोन्ही मतदारसंघात विजय मिळू शकला नाही. परिणामी, दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला या दोन्ही मतदारसंघात मताधिक्य असले तरी ती निवडणूक राष्ट्रीय सुरक्षा या मुद्याला केंद्रस्थानी ठेवून मतदान झाल्याने भाजपवर परिणाम झाला नाही. तरी येणाºया विधानसभा निवडणुकीत मागील निकालाचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून हा मार्ग पुढे वरूडपर्यंत वाढविण्याचे आश्वासन देऊन मंजुरी मिळाल्याचे अनेकदा जाहीर सभांमधून भाजपच्या नेत्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनीही आर्वीच्या जाहीरसभेत याचा पुनरुच्चार केला. पण, लबाडाचे आमंत्रण..., या म्हणीप्रमाणे जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरूवात होत नाही, तोपर्यंत मतदारांचा विश्वास बसत नाही.पुलगावचे नागरिक तालुक्याच्या मागणीसाठी मंत्र्यांना निवेदने देतात; पण ज्या रेल्वे मार्गामुळे पुलगाव रेल्वेस्थानकाला जंक्शनचा दर्जा आहे, त्या मार्गाच्या कामाबाबत पुलगावकर मंडळी कधीच बोलत नसल्याची खंत कृती समिती सदस्य व्यक्त करतात. या रेल्वे लाईनवरील भंगार अवस्थेत पडलेल्या मालमत्तेची मोठ्याप्रमाणात चोरी होत आहे.त्यामुळे रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित होऊन त्याचे विस्तारीकरण होईल, याबाबत जनतेच्या मनात नाराजी व संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्याकरिता व आर्वी तथा देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघात आपले आमदार निवडून आणायचे असल्यास या रेल्वे प्रकल्पाच्या कामास सुरूवात होणे गरजेचे असल्याचे परखड मत कृती समितीचे सदस्य व्यक्त करीत असून तशी मागणी करीत आहेत. लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय प्रश्नांवर तर विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यांवर जिंकली जाते, याचे भान ठेवून १५ आॅगस्टपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी व त्यासाठी ५ जुलैला मांडल्या जाणाºया केंद्रीय अर्थसंकल्पात तशी भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी होत आहे.