शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

शकुंतलेच्या कामास सुरुवात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:41 IST

येत्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आर्वी व पुलगाव, देवळी मतदारसंघ भाजपला जिंकायचे असेल तर पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामाचा प्रारंभ करावा, अशी मागणी शकुंतला मुक्ती व विकास कृती समितीचे सचिव बाबासाहेब गलाट यांनी केली आहे.

ठळक मुद्देविदर्भ शकुंतला मुक्ती व विकास कृती समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : येत्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आर्वी व पुलगाव, देवळी मतदारसंघ भाजपला जिंकायचे असेल तर पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामाचा प्रारंभ करावा, अशी मागणी शकुंतला मुक्ती व विकास कृती समितीचे सचिव बाबासाहेब गलाट यांनी केली आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत आर्वी व देवळी पुलगाव या दोन्ही मतदारसंघात भाजपला मताधिक्य होते; परंतु शकुंतला रेल्वेबाबत भाजपने केवळ आश्वासन दिले. आश्वासनाची पूर्ती न झाल्यानेच लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला आर्वी व देवळी-पुलगाव या दोन्ही मतदारसंघात विजय मिळू शकला नाही. परिणामी, दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला या दोन्ही मतदारसंघात मताधिक्य असले तरी ती निवडणूक राष्ट्रीय सुरक्षा या मुद्याला केंद्रस्थानी ठेवून मतदान झाल्याने भाजपवर परिणाम झाला नाही. तरी येणाºया विधानसभा निवडणुकीत मागील निकालाचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून हा मार्ग पुढे वरूडपर्यंत वाढविण्याचे आश्वासन देऊन मंजुरी मिळाल्याचे अनेकदा जाहीर सभांमधून भाजपच्या नेत्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनीही आर्वीच्या जाहीरसभेत याचा पुनरुच्चार केला. पण, लबाडाचे आमंत्रण..., या म्हणीप्रमाणे जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरूवात होत नाही, तोपर्यंत मतदारांचा विश्वास बसत नाही.पुलगावचे नागरिक तालुक्याच्या मागणीसाठी मंत्र्यांना निवेदने देतात; पण ज्या रेल्वे मार्गामुळे पुलगाव रेल्वेस्थानकाला जंक्शनचा दर्जा आहे, त्या मार्गाच्या कामाबाबत पुलगावकर मंडळी कधीच बोलत नसल्याची खंत कृती समिती सदस्य व्यक्त करतात. या रेल्वे लाईनवरील भंगार अवस्थेत पडलेल्या मालमत्तेची मोठ्याप्रमाणात चोरी होत आहे.त्यामुळे रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित होऊन त्याचे विस्तारीकरण होईल, याबाबत जनतेच्या मनात नाराजी व संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्याकरिता व आर्वी तथा देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघात आपले आमदार निवडून आणायचे असल्यास या रेल्वे प्रकल्पाच्या कामास सुरूवात होणे गरजेचे असल्याचे परखड मत कृती समितीचे सदस्य व्यक्त करीत असून तशी मागणी करीत आहेत. लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय प्रश्नांवर तर विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यांवर जिंकली जाते, याचे भान ठेवून १५ आॅगस्टपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी व त्यासाठी ५ जुलैला मांडल्या जाणाºया केंद्रीय अर्थसंकल्पात तशी भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी होत आहे.