शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

वर्धा-कारंजा-काटोल बसफेरी सुरू करा

By admin | Updated: June 25, 2017 00:44 IST

वर्धा-कारंजा-काटोल ही बसफेरी मागील दीड महिन्यांपासून अचानक बंद करण्यात आली.

ग्रामस्थांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क कन्नमवारग्राम : वर्धा-कारंजा-काटोल ही बसफेरी मागील दीड महिन्यांपासून अचानक बंद करण्यात आली. लग्नसराईच्या दिवसांत वर्धा आगाराने ही फेरी का बंद केली, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. परिणामी, ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बसफेरी त्वरित सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. वर्धा येथून सकाळी ७.३० वाजता सुटणारी वर्धा-कारंजा-काटोल ही बस बरेच वर्षांपासून सुरू होती. ही बस एक ते दोन वर्षांपूर्वी वर्धा ते सावनेर, अशी सुरू होती. ती खरांगणा, बांगडापूर, कारंजा, धर्ती, मुर्ती मार्गे जात व येत होती; पण या एक-दोन वर्षांपासून ही बसफेरी बंद करून तीच बस वर्धा-कारंजा-काटोल व परत धर्ती, मुर्ती, कारंजा, बांगडापूर, खरांगणा मार्गे ये-जा करीत होती. या वेहेवर वर्धेला जाण्याकरिता कारंजा येथून दुसरी बस उपलब्ध नसल्याने या बसला बऱ्यापैकी प्रवासीही मिळत होते. परिसरातील शाळा, महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही सोय झाली होती; पण ही बस बंद झाल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रापमंच्या वर्धा विभागाने दखल घेत ही बसफेरी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.