शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखुमुक्त अभियानाला प्रारंभ

By admin | Updated: December 29, 2014 02:02 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग व नशाबंदी मंडळाच्यावतीने तंबाखुमुक्त शैक्षणिक संस्था अभियान राबविण्यात येत आहे.

वर्धा : महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग व नशाबंदी मंडळाच्यावतीने तंबाखुमुक्त शैक्षणिक संस्था अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून विद्यार्थी व युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधिनतेला प्रतिबंध घालण्यासाठी जागृती करण्यात येत आहे. नशाबंदी मंडळाच्या पथकाकडून प्रबोधनात्मक कार्यक्रम, पथनाट्य, संवाद कार्यक्रम या माध्यमातून जागृती केली जात आहे, अशी माहिती यावेळी झालेल्या सभेतून देण्यात आली. यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा संघटक प्रा. गणेश वनकर होते. आजचा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात व्यसनाकडे वळत आहे. ही बाब लक्षात घेऊन पथकाचे प्रमुख ज्ञानेश्वर येवतकर यांनी बेटर वर्धा’ अभियानातून ही मोहीम हाती घेतली आहे. यावेळी बालकांसोबत संवाद साधताना येवतकर यांनी भारतात दररोज अडीच हजार लोकांचा मृत्यू केवळ तंबाखू सेवनाने होतो. भारतात १० लाखाहून अधिक व्यसनामुळे दगावतात. तर दर ३ सेकंदाला भारतातील एक विद्यार्थी तंबाखुचे पहिल्यांदा सेवन करतो. याची गती पाहता प्रभावी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.जगात तंबाखुमुळे होणाऱ्या मुख कर्करोगाचे सर्वाधिक रूग्ण भारतात आहेत. यामुळे नशाबंदी मंडळाकडून तंबाखुमुक्त शैक्षणिक संस्था असे अभियान हाती घेतले आहे. युवकांपर्यंत माहिती प्रभावीपणे पोहचविण्याकरिता प्रदर्शन व प्रत्यक्ष संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले. शाळा व महाविद्यालयात तंबाखु सेवनाने होणारे रक्त वाहिन्यांचे विकार, हृदयरोग, स्ट्रोक म्हणजेच मेंदुचा विकार, परिधीय संवहनी रोग याची माहिती देण्यात येत आहे. वर्धा शहरातही विद्यार्थी तंबाखू, गुटखा, दारू इत्यादी प्रकारच्या व्यसनाचे अधिन झाले असल्याची बाब निदर्शनास येते. कार्यक्रमानिमित्त फिरताना शाळा, विद्यालय, महाविद्यालयात परिसरात पानटपऱ्या आढळून आल्या आहे. यावर निर्बंध घालणे गरजेचे झाले आहे. ही सगळी स्थिती लक्षात घेवून शाळा, महाविद्यालय तंबाखुमुक्त शैक्षणिक संस्था अभियान राबविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी केले.कार्यक्रमाला प्रकाश नगराळे गुजर, साने यासह विद्यार्थी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणावर झालेल्या कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा यावेळी संकल्प केला. (स्थानिक प्रतिनिधी)