शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेला थाटात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:49 IST

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जा.ब. विज्ञान महा.च्या प्रागंणावर राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धा आयोजित आहे.

ठळक मुद्देआठही विभागातील संघ सहभागी : वर्धेतील खेळाडूंची चमकदार कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जा.ब. विज्ञान महा.च्या प्रागंणावर राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धा आयोजित आहे. या स्पर्धेत राज्यातील ८ विभागांतून १४, १७ व १९ वर्षे वयोगटातून मुला-मुलींचे संघ सहभागी झालेत. स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, प्राचार्य ओम महोदय उपस्थित होते.स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात मुलींच्या विभागात कोल्हापूर संघाने लातूरचा पराभव केला तर नागपूर विभागाने मुंबई विभागावर ३५-३३, २७-३५ व ३५-२६ असा विजय मिळविला. औरंगाबाद विरूद्ध अमरावती सामन्यात ३५-१५, ३५-१८ अशा गुण फरकाने औरंगाबाद विजयी झाला. याच गटात मुलांच्या विभागात कोल्हापूर विरूद्ध लातूरमधील सामन्यात लातूर विजयी तर नाशिक विरूद्ध नागपूर विभागाच्या सामन्यात नागपूर विजयी ठरला. १७ वर्षे वयोगटात मुलींच्या विभागात लातूर संघाने कोल्हापूरवर मात केली. मुंबईविरूद्ध नागपूर सामन्यात नागपूरने विजय मिळविला. मुलांच्या विभागात मुंबई-नागपूर सामन्यात ३५-२९, ३५-२९ अशा गुणफरकाने नागपूर संघ विजयी झाला. औरंगाबाद विभागाने लातूर विभाग संघावर मात केली. अमरावती संघाने कोल्हापूर संघाचा तर पुणे संघाने नाशिकचा पराभव केला. १४ वर्षे वयोगटात मुलींच्या नागपूर विरूद्ध नाशिक सामन्यात नागपूर संघाने बाजी मारली. लातूर संघाने अमरावतीचा पराभव केला. याच वयोगटात मुलांच्या नागपूर संघाने औरंगाबादचा पराभव केला. पुणे संघाने नाशिकवर, कोल्हापुरने मुंबईवर व अमरावतीने लातुरवर मात केली. पंच म्हणून सौगत दत्ता, रूपेश भोसले, भूषण राजशिखरे, लक्ष्मी घले, विनोद गराड, नेहा बलविर, मनोज वंजारी, विक्रम झाडे, सागर भुरे आदींनी काम पाहिले. स्पर्धेचे संयोजन डॉ. सुरेश व डॉ. नंदीनी बोंगाडे करीत आहे.स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील संघांनी राखला वरचष्मास्पर्धेत सकाळच्या सत्रातील सामन्यांपैकी नागपूर विभागाचे चार संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. यात वर्धा जिल्ह्यातील संघाने वरचष्मा राखला. जे.बी. सायन्स कॉलेज वर्धा, मधुबन कॉन्व्हेंट वर्धा आणि सुशिल हिम्मतसिंगका वर्धा या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करून आघाडी मिळविली. यातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचीही राष्ट्रीय स्तराकरिता निवड होणार आहे.