शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

द्विधा मनस्थितीत बळीराजाचा पेरणीला प्रारंभ

By admin | Updated: June 19, 2017 01:16 IST

बळीराजाचे जीवन मागील काही वर्षापासून पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. वृक्ष कटाईमुळे निसर्गातील समतोल बिघडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : बळीराजाचे जीवन मागील काही वर्षापासून पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. वृक्ष कटाईमुळे निसर्गातील समतोल बिघडला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत असल्याने बळीराजाला कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. इतके असताना समाधानकारक पाऊस न येताच द्विधा मनस्थितीत असेल्या पुलगावसह परिसरातील बळीराजाने सध्या पेरणीच्या कामाला वेग दिल्याचे चित्र आहे.साधारणत: मृग नक्षत्रापूर्वी शेतकरी उन्हाळवाहीचे कामे पूर्ण करतात. त्यानंतर आकाशाकडे त्यांचे डोळे असते. परंतु या वर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी हताश आणि उदास झाला आहे. शेतीचा हंगाम सुरू होणार एवढ्यात कर्ज माफीसाठी दहा दिवस चाललेले शेतकरी आंदोलन शासनाने कर्जमाफी जाहीर करून मागे घेण्यास भाग पाडले. सध्या द्विधा मनस्थितीत असलेल्या बळीराजाने अखेर पेरणीला प्रारंभ केला आहे. जगाचा पोशिंदा समजल्या जाणारा बळीराजा मागील काही वर्षात विविध समस्याचा सामना करत आहे. तो सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गळयात फास अडकवू लागला आहे. शेतीची मशागत केल्यानंतर बी-बियाणे खतांची जुळवाजुळव केली तरच पेरणी. त्यातच निसर्गाने साथ दिली तर वेळोवेळी योग्य काळजी घेतले पीक बहरून झालेले उत्पन्न शेतकऱ्यांच्या घरी येते. सध्या शेतकरी चातकासारखा पावसाची वाट पहत आहे. कर्जमाफीची घोषणा झाली तरी नवीन कर्जासाठी बँकांत चकरा माराव्या लागत आहे. बळीराजाने जमेल तेथून पैशाची जुळवाजुळव करीत अखेर पेरणीच्या कामाला गती दिली आहे.पेरणीयोग्य पावसाने शेतकरी समाधानीसेलगाव (लवणे) : दुपारच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले. बघता-बघता कारंजा तालुक्यात सर्वदुर पेरणी योग्य पाऊस झाला. त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग दिल्या जात आहे. यदा या भागात वेळीच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. गेल्या आठवड्यात शासनाने दिलेली कर्जमाफी आणि वेळेवर आलेल्या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. परंतु, नवीन कर्ज मिळविणाऱ्यांना बँकांच्या चकरा माराव्या लागत आहे. अशीच साथ पुढेही निसर्गाने दिल्यास शेतकरी वर्गाला ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे आहेत. गत तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध कारणांने आर्थिक फटकाच सहन करावा लागला. यंदा समाधानकारक उत्पन्न होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.