शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

द्विधा मनस्थितीत बळीराजाचा पेरणीला प्रारंभ

By admin | Updated: June 19, 2017 01:16 IST

बळीराजाचे जीवन मागील काही वर्षापासून पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. वृक्ष कटाईमुळे निसर्गातील समतोल बिघडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : बळीराजाचे जीवन मागील काही वर्षापासून पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. वृक्ष कटाईमुळे निसर्गातील समतोल बिघडला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत असल्याने बळीराजाला कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. इतके असताना समाधानकारक पाऊस न येताच द्विधा मनस्थितीत असेल्या पुलगावसह परिसरातील बळीराजाने सध्या पेरणीच्या कामाला वेग दिल्याचे चित्र आहे.साधारणत: मृग नक्षत्रापूर्वी शेतकरी उन्हाळवाहीचे कामे पूर्ण करतात. त्यानंतर आकाशाकडे त्यांचे डोळे असते. परंतु या वर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी हताश आणि उदास झाला आहे. शेतीचा हंगाम सुरू होणार एवढ्यात कर्ज माफीसाठी दहा दिवस चाललेले शेतकरी आंदोलन शासनाने कर्जमाफी जाहीर करून मागे घेण्यास भाग पाडले. सध्या द्विधा मनस्थितीत असलेल्या बळीराजाने अखेर पेरणीला प्रारंभ केला आहे. जगाचा पोशिंदा समजल्या जाणारा बळीराजा मागील काही वर्षात विविध समस्याचा सामना करत आहे. तो सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गळयात फास अडकवू लागला आहे. शेतीची मशागत केल्यानंतर बी-बियाणे खतांची जुळवाजुळव केली तरच पेरणी. त्यातच निसर्गाने साथ दिली तर वेळोवेळी योग्य काळजी घेतले पीक बहरून झालेले उत्पन्न शेतकऱ्यांच्या घरी येते. सध्या शेतकरी चातकासारखा पावसाची वाट पहत आहे. कर्जमाफीची घोषणा झाली तरी नवीन कर्जासाठी बँकांत चकरा माराव्या लागत आहे. बळीराजाने जमेल तेथून पैशाची जुळवाजुळव करीत अखेर पेरणीच्या कामाला गती दिली आहे.पेरणीयोग्य पावसाने शेतकरी समाधानीसेलगाव (लवणे) : दुपारच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले. बघता-बघता कारंजा तालुक्यात सर्वदुर पेरणी योग्य पाऊस झाला. त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग दिल्या जात आहे. यदा या भागात वेळीच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. गेल्या आठवड्यात शासनाने दिलेली कर्जमाफी आणि वेळेवर आलेल्या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. परंतु, नवीन कर्ज मिळविणाऱ्यांना बँकांच्या चकरा माराव्या लागत आहे. अशीच साथ पुढेही निसर्गाने दिल्यास शेतकरी वर्गाला ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे आहेत. गत तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध कारणांने आर्थिक फटकाच सहन करावा लागला. यंदा समाधानकारक उत्पन्न होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.