शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

द्विधा मनस्थितीत बळीराजाचा पेरणीला प्रारंभ

By admin | Updated: June 19, 2017 01:16 IST

बळीराजाचे जीवन मागील काही वर्षापासून पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. वृक्ष कटाईमुळे निसर्गातील समतोल बिघडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : बळीराजाचे जीवन मागील काही वर्षापासून पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. वृक्ष कटाईमुळे निसर्गातील समतोल बिघडला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत असल्याने बळीराजाला कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. इतके असताना समाधानकारक पाऊस न येताच द्विधा मनस्थितीत असेल्या पुलगावसह परिसरातील बळीराजाने सध्या पेरणीच्या कामाला वेग दिल्याचे चित्र आहे.साधारणत: मृग नक्षत्रापूर्वी शेतकरी उन्हाळवाहीचे कामे पूर्ण करतात. त्यानंतर आकाशाकडे त्यांचे डोळे असते. परंतु या वर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी हताश आणि उदास झाला आहे. शेतीचा हंगाम सुरू होणार एवढ्यात कर्ज माफीसाठी दहा दिवस चाललेले शेतकरी आंदोलन शासनाने कर्जमाफी जाहीर करून मागे घेण्यास भाग पाडले. सध्या द्विधा मनस्थितीत असलेल्या बळीराजाने अखेर पेरणीला प्रारंभ केला आहे. जगाचा पोशिंदा समजल्या जाणारा बळीराजा मागील काही वर्षात विविध समस्याचा सामना करत आहे. तो सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गळयात फास अडकवू लागला आहे. शेतीची मशागत केल्यानंतर बी-बियाणे खतांची जुळवाजुळव केली तरच पेरणी. त्यातच निसर्गाने साथ दिली तर वेळोवेळी योग्य काळजी घेतले पीक बहरून झालेले उत्पन्न शेतकऱ्यांच्या घरी येते. सध्या शेतकरी चातकासारखा पावसाची वाट पहत आहे. कर्जमाफीची घोषणा झाली तरी नवीन कर्जासाठी बँकांत चकरा माराव्या लागत आहे. बळीराजाने जमेल तेथून पैशाची जुळवाजुळव करीत अखेर पेरणीच्या कामाला गती दिली आहे.पेरणीयोग्य पावसाने शेतकरी समाधानीसेलगाव (लवणे) : दुपारच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले. बघता-बघता कारंजा तालुक्यात सर्वदुर पेरणी योग्य पाऊस झाला. त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग दिल्या जात आहे. यदा या भागात वेळीच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. गेल्या आठवड्यात शासनाने दिलेली कर्जमाफी आणि वेळेवर आलेल्या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. परंतु, नवीन कर्ज मिळविणाऱ्यांना बँकांच्या चकरा माराव्या लागत आहे. अशीच साथ पुढेही निसर्गाने दिल्यास शेतकरी वर्गाला ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे आहेत. गत तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध कारणांने आर्थिक फटकाच सहन करावा लागला. यंदा समाधानकारक उत्पन्न होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.