शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

महिला बचत गट निर्मितीला प्रारंभ

By admin | Updated: June 10, 2017 01:28 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद) अंतर्गत जिल्ह्यातील सेलू, वर्धा, देवळी, समुद्रपूर येथे सभा घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद) अंतर्गत जिल्ह्यातील सेलू, वर्धा, देवळी, समुद्रपूर येथे सभा घेण्यात आली. यावेळी तालुकास्तरावर वर्धिनीचे २० पथक तयार करण्यात आले. या माध्यमातून गाव स्तरावर महिला बचत गट तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. सभेला बाह्य संसाधन व्यक्ती उपस्थित होत्या. प्रमुख मार्गदर्शक मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, प्रकल्प संचालक प्रमोद पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, जिल्हा व्यवस्थापक वर्धिनी कक्ष अमोलसिंग रोटोले, जिल्हा व्यवस्थापक सुकेशनी पाथार्डे, मनीष कावडे उपस्थित होते. उमेद अभियानाअंतर्गत जिल्ह्यात वर्धिनी कक्ष तयार करण्यात आला आहे. जिल्ह्याबाहेर व जिल्ह्यांतर्गत वर्धिनी राउंड नियमित स्तरावर पाठविण्यात येतात. जिल्ह्यांतर्गत ३० दिवसीय फेरी पूर्ण करुन एकूण २० पथक, १८० वर्धिनीद्वारे ४० गावामध्ये एकूण ३२९ स्वयंसहायता गटाची निर्मिती करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर ८० प्रेरिका, ३२९ बुककीपर निवडण्यात आले. उमेद अभियानाद्वारे गावस्तरावर स्वयंसहायता गटाची निर्मिती करुन त्यांना विविध प्रशिक्षण, बँक जोडणी, उपजीविकेच्या साधनाची उपलब्धता करुन सक्षम करणे, सुशिक्षित बेरोजगार मुलांकरिता दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत रोजगाराची संधी मिळवून देण्यात येणार आहे. वर्धिनी आढावा बैठकीकरिता जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षद्वारे सरिता इंगोले, शालिनी आदमने, युसुफ पठाण, हेमंत सूर्यवंशी आदींनी सहकार्य केले.