शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

चंद्रपूर-हिंगणघाटमार्गे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करा

By admin | Updated: November 7, 2016 00:49 IST

चंद्रपूर-हिंगणघाट-नागपूर या मार्गाने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजाराच्या घरात आहे.

मागणी : प्रवाशांच्या वेळेची होईल बचतहिंगणघाट : चंद्रपूर-हिंगणघाट-नागपूर या मार्गाने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजाराच्या घरात आहे. जलद गाड्यांना या मार्गावरील काही महत्त्वाच्या स्थानकावर थांबे देण्यात आले नाही. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. हिंगणघाट, वरोरा, भद्रावती येथील प्रवाशांना मोजक्याच गाड्या असल्याने त्यांची तारबंळ उडते. अनेक वर्षापासून इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बल्लारशाह, वर्धा, नागपूर या शहरा दरम्यान इंटरसिटी चेअर कार ट्रेन सुरू करावी अशीही मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली. या गाडीची सोय उपलब्ध झाल्यास पासधारक प्रवासी तसेच विद्यार्थी व व्यापारीवर्गाला मोठा दिलासा मिळेल. इंटरसिटी एक्सप्रेसमुळे नागपूर ते चंद्रपूर दरम्यान ये-जा करणाऱ्यांना सुविधा होणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. या मार्गावर गाड्यांच्या फेऱ्या अधिक असल्या तरी काही गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची ताटकळ होते. त्यामुळे अनेकजण बसगाडीने जाणे पसंत करतात. इंटरसिटी एक्सप्रेसमुळे हे प्रवासी रेल्वेकडे वळण्याची शक्यता आहे.बल्लारशाह, चंद्रपुर, वरोरा, हिंगणघाट, वर्धा येथून कार्यालयीन कामकाजाकरिता, शिक्षणाकरिता तसेच व्यावसायिक कारणानी दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. याशिवाय वर्धा किंवा नागपूर येथून पुढे रेल्वे प्रवास करण्याकरिता जाणारे प्रवासी असतात. त्यांना या रेल्वेगाडीमुळे आधार होईल. चंद्रपूर ते नागपूर सरम्यान इंटरसिटीसारख्या रेल्वेगाड्या सुरू केल्यास प्रवाशांना गंतव्य स्थळी वेळेवर पोहचण्यास मदत होईल. प्रवाशांच्या त्रास कमी होईल. शिवाय प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. कारण रेल्वेने प्रवास करणे कमी खर्चाचे असल्याने प्रवासी याचा लाभ घेण्याची शक्यता आहे.(शहर प्रतिनिधी)