शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

‘शेतकरी आरक्षण’ अभियानाला प्रारंभ

By admin | Updated: April 26, 2017 00:28 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल माफी द्यावी, वर्षभर रास्त हमीभाव द्यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी

शैलेश अग्रवाल : कर्ज-वीज बिल माफी, रास्त हमीभावाची मागणी वर्धा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल माफी द्यावी, वर्षभर रास्त हमीभाव द्यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून मागास जाती-जमातींना जसे आरक्षण लागू केले, तसे शेतकरी कुटुंबाना शैक्षणिक, नोकरी व पदोन्नतीत आरक्षण लागू करावे या मागण्यांकरिता सेवाग्राम आश्रमातून ‘एकच मिशन, शेतकरी आरक्षण’ अभियान सुरू केल्याची माहिती गोतीर्थ प्रकल्पाचे संचालक व प्रगतशील शेतकरी शैलेश अग्रवाल यांनी दिली. विश्रामगृहात सोमवारी झालेल्या पत्रपरिषदेला माजी पं.स. उपसभापती संदेश किटे, म्हसाळाचे सरपंच संदीप पाटील, उपसरपंच अनिल उमाटे, दीवाकर श्रावणकर आदी उपस्थित होते. अग्रवाल पूढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आरक्षणासारखा उपाय राज्यघटनेंतर्गत लागू केल्याने सामाजिक विषमता बव्हंशी कमी झाली आहे. याच न्यायाने शेतकऱ्यांना आरक्षण लागू झाल्यास शिक्षण, नोकरी व पदोन्नतीत संधी मिळेल. महागडे उच्चशिक्षण पैशाअभावी घेऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांची मुले, भावंडे मागे राहतात. शेतमालाचे हमीभाव ठरविण्याची पद्धत चुकीची आहे. यामुळे आर्थिक विवंचनेच्या गर्तेत सापडून शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांची गुणवंत मुले पैशाअभावी अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर उच्चशिक्षण घेऊ शकत नाही. आरक्षण मिळाल्यास शिकता येईल, नोकरी व पदोन्नतीद्वारे शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार होईल, असेही अग्रवाल यांनी सांगितले. एकदा सर्व शेतकऱ्यांना बँका, खासगी सावकार आणि वीज बिलापासून मुक्त करावे. नव्याने जीवन जगण्याची संधी द्यावी, अशी मागणी अग्रवाल यांनी केली. शेतकऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहील. मार्ग निश्चित नसून राज्यात जिथे शेतकरी बोलवतील, तिथे आपण जाऊ, असेही त्यांनी नमूद केले.(कार्यालय प्रतिनिधी)