शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

टाकळीमार्गे कोळोणा-गौळ बसफेरी सुरू करा

By admin | Updated: July 11, 2015 02:43 IST

प्रत्येक गावाचा संपर्क शहराशी व्हावा, दळण-वळणाची साधणे वाढावी, यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते तयार करण्यात आले; ...

वर्धा : प्रत्येक गावाचा संपर्क शहराशी व्हावा, दळण-वळणाची साधणे वाढावी, यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते तयार करण्यात आले; परंतु, अनेक गावांत महामंडळाची बसच जात नाही. टाकळी (खोडे), गौळ, आंजी ही बसफेरी पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.पुलगाव आगाराने गौळ, अडेगाव मार्गावरील बसेस वाटखेडा चौरस्ता येथून न नेता, टाकळी (खोडे) मार्गे कोळोणा चौरस्ता, गौळ या मार्गाने वळवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.देवळी येथून ही बस सुटल्यानंतर वाटखेडा चौरस्त्यापर्यंत एकही गाव येत नाही. तर टाकळी वरून बस गेल्यास टाकळी येथील नागरिकांची गैरसोय दूर होऊन प्रवासीसुद्धा मिळू शकतात. या गावतील अनेक विद्यार्थी देवळी येथे शिक्षण घेण्याकरिता जातात. गावात बस जात नसल्यामुळे एकपाळा चौरस्त्यावर विद्यार्थी, महिला व प्रवाशांना ऊन्ह, पाऊस व थंडीच्या दिवसात बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. टाकळी येथून बसेस गेल्यास आंजी व गौळ परिसरातील नागरिकांना एकपाळा येथे जाणे सोयीचे होणार आहे. याच मार्गावर हनुमान मंदिर असून येथे भाविकांची गर्दी असते. त्यामुळे भाविकांसाठी सोयीचे होईल, असे गावकरी बोलत आहेत. एकमेकांशी गावे जोडून गावातील दळणवळणाला चालना मिळेल. सध्या स्थितीत हा रस्ता सुसज्ज असून डांबरीकरणसुद्धा करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावरून बसेस धावण्याकरिता महामंडळाकडून हालचाली करण्यात आल्या. तिकिटांचे टप्पेसुद्धा ठरण्यात आले. परंतु बसेस सुरू करण्याकरिता कुठली अडचण आली हे समजायला मार्ग नाही. याकडे पुलगाव आगारप्रमुख लक्ष देऊन या मार्गावरील बस सुरू करावी, अशी मागणी आहे.(प्रतिनिधी)