शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

टाकळीमार्गे कोळोणा-गौळ बसफेरी सुरू करा

By admin | Updated: July 11, 2015 02:43 IST

प्रत्येक गावाचा संपर्क शहराशी व्हावा, दळण-वळणाची साधणे वाढावी, यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते तयार करण्यात आले; ...

वर्धा : प्रत्येक गावाचा संपर्क शहराशी व्हावा, दळण-वळणाची साधणे वाढावी, यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते तयार करण्यात आले; परंतु, अनेक गावांत महामंडळाची बसच जात नाही. टाकळी (खोडे), गौळ, आंजी ही बसफेरी पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.पुलगाव आगाराने गौळ, अडेगाव मार्गावरील बसेस वाटखेडा चौरस्ता येथून न नेता, टाकळी (खोडे) मार्गे कोळोणा चौरस्ता, गौळ या मार्गाने वळवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.देवळी येथून ही बस सुटल्यानंतर वाटखेडा चौरस्त्यापर्यंत एकही गाव येत नाही. तर टाकळी वरून बस गेल्यास टाकळी येथील नागरिकांची गैरसोय दूर होऊन प्रवासीसुद्धा मिळू शकतात. या गावतील अनेक विद्यार्थी देवळी येथे शिक्षण घेण्याकरिता जातात. गावात बस जात नसल्यामुळे एकपाळा चौरस्त्यावर विद्यार्थी, महिला व प्रवाशांना ऊन्ह, पाऊस व थंडीच्या दिवसात बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. टाकळी येथून बसेस गेल्यास आंजी व गौळ परिसरातील नागरिकांना एकपाळा येथे जाणे सोयीचे होणार आहे. याच मार्गावर हनुमान मंदिर असून येथे भाविकांची गर्दी असते. त्यामुळे भाविकांसाठी सोयीचे होईल, असे गावकरी बोलत आहेत. एकमेकांशी गावे जोडून गावातील दळणवळणाला चालना मिळेल. सध्या स्थितीत हा रस्ता सुसज्ज असून डांबरीकरणसुद्धा करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावरून बसेस धावण्याकरिता महामंडळाकडून हालचाली करण्यात आल्या. तिकिटांचे टप्पेसुद्धा ठरण्यात आले. परंतु बसेस सुरू करण्याकरिता कुठली अडचण आली हे समजायला मार्ग नाही. याकडे पुलगाव आगारप्रमुख लक्ष देऊन या मार्गावरील बस सुरू करावी, अशी मागणी आहे.(प्रतिनिधी)