शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कर्मचाऱ्यांनी केला आवाज बुलंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:31 IST

राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी त्रि-दिवसीय संप पुकारला आहे. सदर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत स्थानिक ठाकरे मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.

ठळक मुद्देतीन दिवसीय संप : मुख्य मार्गाने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी त्रि-दिवसीय संप पुकारला आहे. सदर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत स्थानिक ठाकरे मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून सदर आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्या तात्काळ निकाली काढा अन्यथा बेमुदत संप असा इशाराच सरकारला देत आपला आवाज बुलंद केला.राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या पूर्णत्त्वास जाव्या यासाठी यापूर्वी संबंधितांना निवेदने देत अनेक आंदोलन करण्यात आली. परंतु, मागण्यांवर विचार न झाल्याने ७,८ व ९ आॅगस्ट या कालावधीत संप पुकारण्यात आला आहे. मंगळवारी आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढून जिल्हाकचेरीवर धडक देत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. सातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिलेल्या आश्वासनानुसार करण्यात यावी. जानेवारी २०१७ पासून महागाई भत्त्याची १४ महिन्याची थकबाकी आणि जानेवारी २०१८ पासून वाढीव महागाई भत्ता फरकाच्या रक्कमेसह मंजूर करावा. अशंदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२ ची परिभाषिक पेन्शन योजना सर्वांना लागू करावी. सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावे. सर्व नोंदणीपटावर असलेल्या अर्जधारकांना एकवेळची बाब म्हणून अनुकंप तत्त्वावर नियुक्त्या देण्यात याव्या. प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला परिचरांना किमान वेतन देण्यात यावे. शिक्षण क्षेत्रातील विना अनुदान धोरण रद्द करण्यात यावे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे १०० टक्के समायोजन करावे. निवृत्तीचे वय ६० वर्षे व ५ दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आंदोलनाचे नेतृत्त्व हरिषचंद्र लोखंडे, नितीन तराळे, बी.व्ही. भोयर, विनोद भालतडक यांनी केले. आंदोलनात जयप्रकाश थोटे, पांडुरंग भालशंकर, राजू चंदनखेडे, महेंद्र सालंकार, धर्मपाल मानकर, संजय पाटील, मंदा चौधरी, प्रविण देशमुख, शशांक हुलके, प्रमोद खोडे, प्रविण भोयर, अजय वानखेडे यांच्यासह सुमारे २० विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहून नोंदविला निषेधया संपात आरोग्य कर्मचारीही सहभागी झाले आहे. परंतु, नागरिकांना आरोग्य सेवा घेताना कुठलाही त्रास होऊ नये या हेतूने जिल्ह्यातील २७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहून काळ्या फिती लावून सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध केला. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा हा उद्देशच यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा देताना आज जोपासला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप