शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कर्मचाऱ्यांनी केला आवाज बुलंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:31 IST

राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी त्रि-दिवसीय संप पुकारला आहे. सदर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत स्थानिक ठाकरे मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.

ठळक मुद्देतीन दिवसीय संप : मुख्य मार्गाने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी त्रि-दिवसीय संप पुकारला आहे. सदर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत स्थानिक ठाकरे मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून सदर आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्या तात्काळ निकाली काढा अन्यथा बेमुदत संप असा इशाराच सरकारला देत आपला आवाज बुलंद केला.राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या पूर्णत्त्वास जाव्या यासाठी यापूर्वी संबंधितांना निवेदने देत अनेक आंदोलन करण्यात आली. परंतु, मागण्यांवर विचार न झाल्याने ७,८ व ९ आॅगस्ट या कालावधीत संप पुकारण्यात आला आहे. मंगळवारी आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढून जिल्हाकचेरीवर धडक देत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. सातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिलेल्या आश्वासनानुसार करण्यात यावी. जानेवारी २०१७ पासून महागाई भत्त्याची १४ महिन्याची थकबाकी आणि जानेवारी २०१८ पासून वाढीव महागाई भत्ता फरकाच्या रक्कमेसह मंजूर करावा. अशंदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२ ची परिभाषिक पेन्शन योजना सर्वांना लागू करावी. सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावे. सर्व नोंदणीपटावर असलेल्या अर्जधारकांना एकवेळची बाब म्हणून अनुकंप तत्त्वावर नियुक्त्या देण्यात याव्या. प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला परिचरांना किमान वेतन देण्यात यावे. शिक्षण क्षेत्रातील विना अनुदान धोरण रद्द करण्यात यावे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे १०० टक्के समायोजन करावे. निवृत्तीचे वय ६० वर्षे व ५ दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आंदोलनाचे नेतृत्त्व हरिषचंद्र लोखंडे, नितीन तराळे, बी.व्ही. भोयर, विनोद भालतडक यांनी केले. आंदोलनात जयप्रकाश थोटे, पांडुरंग भालशंकर, राजू चंदनखेडे, महेंद्र सालंकार, धर्मपाल मानकर, संजय पाटील, मंदा चौधरी, प्रविण देशमुख, शशांक हुलके, प्रमोद खोडे, प्रविण भोयर, अजय वानखेडे यांच्यासह सुमारे २० विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहून नोंदविला निषेधया संपात आरोग्य कर्मचारीही सहभागी झाले आहे. परंतु, नागरिकांना आरोग्य सेवा घेताना कुठलाही त्रास होऊ नये या हेतूने जिल्ह्यातील २७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहून काळ्या फिती लावून सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध केला. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा हा उद्देशच यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा देताना आज जोपासला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप