शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

एसटीचे निवारे भग्नावस्थेत

By admin | Updated: June 3, 2016 02:11 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद घेतलेली एसटी गावागावांत आज धावत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांसाठी वाहतुुकीचा पर्याय सोपा झाला आहे.

प्रवाशांचे होतात हाल : अनेक प्रवासी निवारे अतिक्रमणातवर्धा : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद घेतलेली एसटी गावागावांत आज धावत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांसाठी वाहतुुकीचा पर्याय सोपा झाला आहे. पण बस थांबण्यासाठी नबविण्यात आलेले गावागावातील निवारे जीर्णावस्थेत दिसून येतात. अनेक ठिकाणी तर ते मोडकळीस येऊन धोक्याचे ठरत आहे. परिणामी हे भग्नावस्थेतील निवारे पाडून नव्याने बांधण्यात यावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. गाव तेथे एसटी ही योजना शासनाद्वारे राबविण्यात आली. यांतर्गत गावागावात बस पोहोचण्याची सोय करण्यात आली. तसेच गावातील नागरिकांना बसची वाट पाहण्यासाठी गावागावांमध्ये रस्त्याच्या कडेला प्रवासी निवारे तयार करण्यात आले. नागरिकांना बसची वाट पाहताना अडचण येऊ नये, पाऊस व उन्हापासून त्यांचे रक्षण व्हावे या उदात्त हेतू त्यात होता. तसेच एस टी चालकालाही कुठे थांबायचे आहे हे लक्षात येण्यासाठीही निवारे उपयोगी पडतात. पण अनेक वर्षांत दुर्लक्ष झाल्याने प्रवासी निवाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. निकृष्ठ बांधकामामुळे अनेक निवाऱ्यांना भेगा गेल्या. बसण्याची बाके निकामी झाली. परिणामी अनेक गावांतील प्रवासी निवारे धोक्याचे ठरत आहे. प्राण्यांनी त्यांना आपले आश्रयस्थान बनविले आहे. काही ठिकाणी त्यावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास येत आहे. मुलभूत सुविधांचीही वाणवा आहे. चित्रविचित्र जाहिरातींनीही विद्रूपिकरण झाले आहे.(शहर प्रतिनिधी)