शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

एसटीचे चालक समृद्धी महामार्गाच्या कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 21:43 IST

त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. तोटा भरून काढण्यासाठी एसटीने मालवाहतूकही सुरू केली. जून महिन्यापासून एसटीच्या काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून नाही वेतन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एसटीतील कामगार आणि कर्मचाऱ्यांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून थकले आहे. यामुळे प्रचंड आर्थिक चणचण भासत असल्याने अनेक कामगार, कर्मचाऱ्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामावर जाण्यास सुरुवात केली आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या देशभरासह संपूर्ण राज्यात मार्च महिन्यापासून पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी, तब्बल सहा महिने एसटीची चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. तोटा भरून काढण्यासाठी एसटीने मालवाहतूकही सुरू केली. जून महिन्यापासून एसटीच्या काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतरच्या काळात जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यात आली. मालवाहतुकीकडून एसटीला बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले. मात्र, कोरोनामुळे एसटीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. यामुळे महामंडळाचा आर्थिक गाडा पूर्वपदावर आला नाही. यामुळे संपूर्ण राज्यात कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम झाला आहे. तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. यामुळे कर्मचारी, कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने एसटीचे चालक, कामगार यांनी चरितार्थ चालविण्यासाठी विविध लघु व्यवसाय स्वीकारले आहेत. तर काही चालकांनी समृद्धी महामार्गाच्या कामावर जाणे सुरू केले आहे. तर बस दुरुस्ती व इतर काम करणार्या कामगारांनीही खासगी वाहन दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला आहे. महामंडळाने वेतन तातडीने देण्याची गरज आहे.फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्सही नाहीदिवाळी सण अवघ्या पाच दिवसांवर असताना महामंडळाकडून वेतनाचा प्रश्न निकाली काढला जात नसून फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्सही देण्यात आलेला नाही. यामुळे एसटीच्या कामगार कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय तणावात आहेत. दिवाळी सण साजरा कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला असून आर्थिक अडचणींचे संकट घोंगावत आहे.अनेकांनी थाटला लघुव्यवसायराज्य परिवहन महामंडळात कार्यरत कर्मचारी, कामगारांना अतिशय तुटपुंजे वेतन मिळते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये वाहतूक उत्पन्न बंद झाल्याने कर्मचारी, कामगारांच्या वेतनावरही गंडांतर आले. बरेच महिने कर्मचाऱ्यांना निम्मेच वेतन देण्यात आले. तर ऑगस्टपासून वेतनच देण्यात आले नाही. त्यामुळे अनेकांनी लघुव्यवसाय थाटून उदरनिर्वाहाची व्यवस्था केली आहे. मात्र, यातही त्यांची आर्थिक ओढाताण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.