ऐतिहासिक वारस्याचे जतन : नैसर्गिक संसाधनांच्या वापरातून देखभालसेवाग्राम : आश्रमातील स्मारके पारंपरिक पद्धतीची आहेत. राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय किर्तीप्राप्त स्मारकांचे जतन महत्त्वाचे आहे. या स्मारकांचे कीड आणि वाळवीपासून संरक्षण व्हावे म्हणून प्रतिष्ठानकडून बुधवारी कीडनाशक फवारणी करण्यात आली.आश्रमामाची स्थापना आणि निवास याबाबत बापूंनी काही सूचना केल्या होत्या. त्याच पद्धतीने माती, कुड, बास, बल्ली आदींचा वापर करून आदी निवास, बा आणि बापू कुटी तसेच बापू का दप्तर तयार करण्यात आले. परिसरातील बहुसंख्य घरे याच पद्धतीची आणि कवेलूची बनलेली आहेत. १९३६ ते १९४६ पर्यंत महात्मा गांधी आश्रमातच राहिले. यानंतर मात्र सत्याग्रह, स्वातंत्र्य चळवळ आणि देशात पेटलेले दंगे यामुळे ते सदैव अन्य प्रांतात राहिले. देश स्वातंत्र्य झाला आणि १९४८ मध्ये महात्मा गांधींची हत्या झाली.महात्मा गांधी यांचा येथील आश्रम राष्ट्रीय ऐतिहासिक स्मारक आहे. देश, विदेशातील पर्यटक आणि अभ्यासक सेवाग्रामला येतात. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा आश्रम हा इतिहास आहे. शिवाय शासनानेही सेवाग्राम आश्रमला पर्यटन स्थळ घोषित केल्याने स्मारकांची देखरेख व सुरक्षेची जबाबदारी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी बापू कुटीची दुरूस्ती करून छत नव्याने बसविण्यात आले आहे. यासाठी प्रक्रिया केलेल्या बल्ली आणि बांबूचा वापर करण्यात आला. स्मारकांची देखरेखही त्याच पद्धतीने केली जाते. यासाठी मोरचुद, कडूनिंबाचा पाला, गोमूत्र आदींच्या मिश्रणाचे द्रावण वापरण्यात येत असल्याचे आश्रमकडून सांगण्यात आले. आता आश्रमातील बापू व अन्य कुटींचे कीडीपासून संरक्षण व्हावे म्हणून फवारणीचे काम हाती घेण्यात आले. यासाठीही नैसर्गिक संसाधनेच वापरली जात आहेत.(वार्ताहर)पिंपळालाही लागली होती कीड१९३६ मध्ये बापूंनी पिंपळाचे झाड लावले होते. अजस्त्र अशा झाडालाही कीड लागली होती. मोरचुद, गोमूत्र व शेण याचे द्रावण कीड निर्मूलनासाठी वापरण्यात आले होते.
स्मारकावर कीड संरक्षणासाठी फवारणी
By admin | Updated: February 11, 2016 02:29 IST