शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

फवारणी करताय; जरा जपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 22:28 IST

पिकांवरील कीड घालविण्याकरिता शेतकºयांकडून विविध विषारी औषधांच्या फवारण्या केल्या जातात. हे औषध पिकांकरिता जरी तारक ठरत असले तरी शेतकºयांकरिता मारक ठरू लागले आहे.

ठळक मुद्देपिकांवर अळीचा प्रादुर्भाव : औषधी वापरताना शेतकºयांनी काळजी घेणे गरजेचे

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पिकांवरील कीड घालविण्याकरिता शेतकºयांकडून विविध विषारी औषधांच्या फवारण्या केल्या जातात. हे औषध पिकांकरिता जरी तारक ठरत असले तरी शेतकºयांकरिता मारक ठरू लागले आहे. फवारणीच्यावेळी आवश्यक काळजी घेतली नसल्याने जिल्ह्यात २० शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे हा धोका टाळण्याकरिता फवारणी करताय; जरा जपूनच, असा संदेश देण्याची गरज निर्माण झाली आहे.यंदा पाऊस कमी आल्याने सोयाबीन, कपाशी, तुरी या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशीवर पांढरी माशी, चिप्स, बोंडअळी, चुरडा यासह रोग दिसत आहे. या किडीवर उपाययोजना करण्याकरिता कृषी विभागाकडून अनेक औषधे सुचविल्या जातात. या औषधात विषारी तथा शरीरास हानीकारक घटक असतात. या घटकांचा फवारणी करणाºयाच्या शरीरावर विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.हा प्रकार केवळ निष्काळजीमुळे घडल्याने शेतकºयांनी फवारणी करताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे. फवारणी करताना शेतकºयांनी हातात ग्लोज, चेहºयाला मास्क बांधणे गरजेचे आहे. असे न केल्यास औषधी फवारताना ते हवेत उडून नाका, तोंडातून शरीरात जाते. यामुळे मळमळ, उलटी आदी लक्षणे दिसून येतात. यावर त्वरित औषधोपचार घेणेच इष्ट ठरते. अन्यथा जीवित हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विदर्भातील अन्य जिल्ह्यात मात्र उपचार घेणाºयांची संख्या मोठी असल्याचे दिसून आहे.औषधीच्या संपर्काने काय दिसतात लक्षणेफवारणी करण्यासाठी वापरण्यात येणाºया औषधींमध्ये विषारी घटकद्रव्य अधिक प्रमाणात असतात. यामुळे ते शरीरासाठी हानीकारक ठरू शकतात. काही औषधी अंगावर लागली तरी त्याचे परिणाम जाणवतात. हातावर लागल्यास अ‍ॅलर्जी असलेल्या व्यक्तीला अंगावर पुरळ येणे, फोड येणे आदी लक्षणे दिसून येतात. हवेत उडून नाका-तोंडातून हे औषध पोटात गेल्यास मळमळ होणे, हे लक्षण दिसते; पण फवारणी दरम्यान, तंबाखू, खर्रा आदी मादक पदार्थांचे सेवन केल्यास औषधी तोंडात जाते. यामुळे मळमळ होणे, उलटी येणे, चक्कर येणे, अंगाला खाज सुटणे आदी लक्षणे आढळून येतात. यावर त्वरित उपचार घेणेच गरजेचे ठरते.काय घेतली पाहिजे काळजीकपाशीवर वा अन्य कोणत्याही पिकांवर फवारणी करीत असताना झाड उंच असेल तर नाक-तोंड बांधले पाहिजे. हातात ग्लोव्हज घातले पाहिजेत. फवारणी सुरू असताना हात-पाय धुतल्याशिवाय कुठल्याही पदार्थाचे सेवन करू नये. कोणत्याही प्रकारे औषधी शरीराच्या आत जाऊ देऊ नये. फवारणी करताना फुल पॅन्ट आणि फुल शर्ट घातला पाहिजे. फवारणी लवकर व्हावी म्हणून पंपामध्ये अधिक पाणी भरले जाते; पण ते चुकीचे आहे. अधिक पाणी भरल्याने ते सांडून धोका होण्याची शक्यता असते. यासाठी पंपामध्ये पाणी कमी भरणे गरजेचे आहे. उन्ह अधिक असल्यास फवारणी करताना घाम येतो. यातूनही शरीरावर औषधींचा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.जैविक खते, औषधीच योग्यरासायनिक खते, औषधांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचा पोत घसरत आहेत. शिवाय विविध रासायनिक औषधींमुळे मानवी जीवनासही धोका निर्माण झालेला आहे. हा प्रकार टाळण्याकरिता शेतकºयांनी जैविक शेतीकडे वळणेच गरजेचे झाले आहे. गांडूळ खत, जैविक औषधी यांच्या वापरातूनही चांगले उत्पादन घेता येत असल्याचे शेतकºयांनीच सिद्ध केले आहे. यातील औषधांमुळे शेतकºयांना फारसा धोका नसतो. यामुळे शेतकºयांनी जैविक शेतीची कास धरणे गरजेचे झाले आहे.शेतकरी, शेतमजुरांनी फवारणी करताना संपूर्ण काळजी घेणेच गरजेचे असते. तोंडाला मास्क लावल्याशिवाय फवारणी करू नये. फवारणी करताना विषबाधा झालेल्या वर्षभरात दोन-तीन रुग्णांची नोंद आहे; पण त्यांच्यावर विष घालविण्याच्या औषधोपचाराची गरज पडली नाही.- डॉ. गोपाळ नारळवार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, पुलगाव.सध्याची औषधी फारशी विषारी नाहीत. असे असले तरी शेतकºयांनी काळजी घेणे गरजेचे असते. पीक उंच असल्यास नाक-तोंड बांधून तथा फुल पॅन्ट व शर्ट घालूनच फवारणी केली पाहिजे.- पांडुरंग बाभूळकर, व्यावसायिक, समुद्रपूर.