शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प मोबदला देत प्रकल्पग्रस्तांची बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:51 IST

आपल्या परिसराचा विकास होणार. सिंचनाची सोय आणि जमिनीचा योग्य मोबदला मिळेल. कुटुंबातील एखाद्याला सरकारी नोकरी मिळणार या मृगजळी आशेने, ......

ठळक मुद्दे१६,६०० व्यक्ती प्रभावित : मरणाची शासन वाट बघणार काय?

ऑनलाईन लोकमतकारंजा (घा.) : आपल्या परिसराचा विकास होणार. सिंचनाची सोय आणि जमिनीचा योग्य मोबदला मिळेल. कुटुंबातील एखाद्याला सरकारी नोकरी मिळणार या मृगजळी आशेने, १५ वर्षापूर्वी आर्वी तालुक्यातील ३४ गावातील १६ हजार ६०० व्यक्तींनी ६० ते ६५ हजार हेक्टर जमीन लोअर वर्धा धरणासाठी दिली. जमीन सुपीक असल्यामुळे त्यावेळेला किमान १ लाख रुपये एकर मोबदला मिळायला पाहिजे होता; पण शासनाने १५ ते २० हजार रुपये प्रति एकर भाव देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली.धरणाची निर्मिती किंवा एमआयडीसी सारख्या अनेक शासकीय प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी शासन शेतकºयांची पिढीजात जमीन अधीग्रहीत करते. योग्य भाव देवू म्हणून आश्वासित करते; पण संबंधित शेतकऱ्यांना कधीच जमिनीचा योग्य मोबदला दिल्या जात नाही. त्यांना नागवल्या जाते असेच प्रकार अनेकदा घडले. वाजवी भाव मिळावा म्हणून काही शेतकरी सरकार विरोधात कोर्टात जातात. वर्र्षानुवर्षे प्रकरणे कोर्टात चालतात, कधी तरी निकाल लागतो. थोडा वाढीव दर कोर्टात जाहीर झाला की, तो शेतकºयांना मिळू नये म्हणून शासन पुन्हा उच्च न्यायालयात अपील करते. यात चिंताग्रस्त होवून शेतकरी संघर्षाला तोंड देता-देता थकतो. नेमकी अशीच दुदैवी घटना आर्वी तालुक्यातील बोरगाव(हातला) येथील विश्वास शिरपुरकर यांच्या बाबत घडली. लोअर वर्धा धरणात त्यांची २२ एकर शेती गेली. शासनाने २० हजार रुपये एकराप्रमाणे मोबदला दिला. वाढीव मोबदला मिळावा म्हणून १५ वर्षापूर्वी वर्धा न्यायालयात प्रकरण दाखल केले. निकाल लागला पण शासन हायकोर्टात गेले. नियमानुसार काही रक्कम कोर्टातून मिळते ती घेण्यासाठी आणि पत्नीच्या जमीनीची केसचे कागदपत्र देण्यासाठी, वर्धा न्यायालयात १६ जानेवारी २०१८ ला ते आले असता अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना दवाखान्यात नेले. वाटेतच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. असे शेतकरी शासनासोबत लढा देताना मृत्यू पावले आहे. आणखी किती बळी घेतल्यावर शासन धरणग्रस्तांना जमिनीचा योग्य मोबदला देणार, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकरी हिताचे धोरण राबविण्याच्या थापा मारणाºया सरकारचा धरणग्रस्त शेतकरी जाहीर निषेध करतात. या दुटप्पी धोरणाचा सरकारला फटका बसणार हे निश्चित. एकीकडे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करतात. मात्र देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे औदार्य शासन दाखवत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. लोअर वर्धा प्रकल्पग्रस्तांना शासनाने वाढीव रक्कम तर दिलीच नाही; पण कोर्टाने जादा भाव घोषित केल्यानंतर शेतकऱ्यांच्या विरोधात हायकोर्टात अपील केली. नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे हवालदिल झालेला शेतकरी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे सुन्न झाला आहे. हायकोर्टात केस दाखल झाल्यावर वकीलाचा व अन्य खर्च न झेपावणारा आहे. आतापर्यंत सरकार अपीलमध्ये हायकोर्टात जिंकले नाही. असे असताना शासनाने शेतकºयांच्या विरोधात हायकोर्टात जाण्याचा निर्णय हे न उलगडणारे कोडे आहे.लोअर वर्धा धरणासाठी ६५ हजार हेक्टर जमीनलोअर वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या जवळपास ५०० हून अधिक केसेस हायकोर्टात पेंडींग आहेत. विशेष असे की, आर्वी दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी, आम्ही शेतकºयांविरोधात हायकोर्टात जाणार नसल्याची जाहीर कबुली दिली होती. मात्र या निमित्याने शासनाचे दुट्टपी उघड झाले आहे. यात शेतकरी मात्र नाहक भरडला जात आहे.