शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

अडीच एकरात एक पोतं सोयाबीन

By admin | Updated: November 27, 2014 23:39 IST

निसर्गाची अवकृपा झाली. पेरलेले शेतातच गेले. सोयाबीन सवंगण्याचीही गरज पडली नाही. पाण्याअभावी कपाशीवर लाल्याने आक्रमण केले़ तूर जंगली श्वापदांनी फस्त केली. हातात पैसा नाही,

नापिकीग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा : कपाशीवरही लाल्याचे आक्रमणविरूळ (आ़) : निसर्गाची अवकृपा झाली. पेरलेले शेतातच गेले. सोयाबीन सवंगण्याचीही गरज पडली नाही. पाण्याअभावी कपाशीवर लाल्याने आक्रमण केले़ तूर जंगली श्वापदांनी फस्त केली. हातात पैसा नाही, पोटात टाकण्याकरिता दाना नाही, हे वास्तव आहे, येथील डोंगराच्या कुशीत बसलेल्या गावांचे़ या गावांची व्यथा शासनदरबारी महिती असताना कुणीच या भागात फिरकत नाही. नापिकीने गावातील पूर्ण सुख हरविल्याचे भयानक वास्तव येथे पाहावयास मिळते.डोंगराच्या कुशीत वसलेल्या सालधरा, काकडधरा, बोरी-बारा, खैरी, चिकटी, पाचोड, कृष्णापूर, रामपूर या गावांतील काही शेतकऱ्यांजवळ दोन ते तीन एकर कोरडवाहू शेती आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले; पण निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन सवंगण्याची गरज भासली नाही. एका शेतकऱ्याला अडीच एकरात केवळ एकच पोतं सोयाबीन झाले. सर्वच शेतकऱ्यांची अशीच स्थिती आहे. कपाशी आहे; पण त्यावर लाल्याचे आक्रमण झाले. आदिवासी भाग असलेल्या या गावातील हे विदारक वास्तव आहे. या गावातील शेतकरी एकेका दाण्याकरिता महाग झाला आहे. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सोयाबीन सवंगायचे कामच पडले नाही़ घरात जेवढा कापूस होता, तो बेभाव विकला, अन् घरात खाण्याकरिता अन्नाचा दाणा आणला. हाताला काम नाही, गावात दुसरे उत्पन्नाचे साधन नाही, आम्ही जगावे कसे... अशी हृदय हेलवणारी वाक्ये येथील शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात़ सोयाबीन पीक झाले नाही. कपाशी पाण्याअभावी व लाल्याच्या आक्रमणामुळे वाळली. तुरीचे पीक जंगली श्वापदांनी फस्त केले. यामुळे नापिकीने शेतकरी पुरता गंजला आहे़ काहींच्या घरात तर अन्नाचा कणही नाही. धान्य आणण्यासाठी घरात असले नसले साहित्य विकून वा गहाण ठेवून आपली उपजीविका चालवावी लागत आहे. चिल्या-पिल्यांचे पोट भरण्यासाठी चाललेल्या या खटाटोपांतून ते या दुष्काळाचा सामना करीत आहेत. कधीकाळी हिरवागार राहणारा हा परिसर गत काही वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत आहे़ ही बाब शासन दरबारी माहिती असताना कुणी तिकडे ढुंकून पाहत नसल्याचे दिसते़ यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागावी, हाच खरा प्रश्न आहे़(वार्ताहर)