शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

अडीच एकरात एक पोतं सोयाबीन

By admin | Updated: November 27, 2014 23:39 IST

निसर्गाची अवकृपा झाली. पेरलेले शेतातच गेले. सोयाबीन सवंगण्याचीही गरज पडली नाही. पाण्याअभावी कपाशीवर लाल्याने आक्रमण केले़ तूर जंगली श्वापदांनी फस्त केली. हातात पैसा नाही,

नापिकीग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा : कपाशीवरही लाल्याचे आक्रमणविरूळ (आ़) : निसर्गाची अवकृपा झाली. पेरलेले शेतातच गेले. सोयाबीन सवंगण्याचीही गरज पडली नाही. पाण्याअभावी कपाशीवर लाल्याने आक्रमण केले़ तूर जंगली श्वापदांनी फस्त केली. हातात पैसा नाही, पोटात टाकण्याकरिता दाना नाही, हे वास्तव आहे, येथील डोंगराच्या कुशीत बसलेल्या गावांचे़ या गावांची व्यथा शासनदरबारी महिती असताना कुणीच या भागात फिरकत नाही. नापिकीने गावातील पूर्ण सुख हरविल्याचे भयानक वास्तव येथे पाहावयास मिळते.डोंगराच्या कुशीत वसलेल्या सालधरा, काकडधरा, बोरी-बारा, खैरी, चिकटी, पाचोड, कृष्णापूर, रामपूर या गावांतील काही शेतकऱ्यांजवळ दोन ते तीन एकर कोरडवाहू शेती आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले; पण निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन सवंगण्याची गरज भासली नाही. एका शेतकऱ्याला अडीच एकरात केवळ एकच पोतं सोयाबीन झाले. सर्वच शेतकऱ्यांची अशीच स्थिती आहे. कपाशी आहे; पण त्यावर लाल्याचे आक्रमण झाले. आदिवासी भाग असलेल्या या गावातील हे विदारक वास्तव आहे. या गावातील शेतकरी एकेका दाण्याकरिता महाग झाला आहे. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सोयाबीन सवंगायचे कामच पडले नाही़ घरात जेवढा कापूस होता, तो बेभाव विकला, अन् घरात खाण्याकरिता अन्नाचा दाणा आणला. हाताला काम नाही, गावात दुसरे उत्पन्नाचे साधन नाही, आम्ही जगावे कसे... अशी हृदय हेलवणारी वाक्ये येथील शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात़ सोयाबीन पीक झाले नाही. कपाशी पाण्याअभावी व लाल्याच्या आक्रमणामुळे वाळली. तुरीचे पीक जंगली श्वापदांनी फस्त केले. यामुळे नापिकीने शेतकरी पुरता गंजला आहे़ काहींच्या घरात तर अन्नाचा कणही नाही. धान्य आणण्यासाठी घरात असले नसले साहित्य विकून वा गहाण ठेवून आपली उपजीविका चालवावी लागत आहे. चिल्या-पिल्यांचे पोट भरण्यासाठी चाललेल्या या खटाटोपांतून ते या दुष्काळाचा सामना करीत आहेत. कधीकाळी हिरवागार राहणारा हा परिसर गत काही वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत आहे़ ही बाब शासन दरबारी माहिती असताना कुणी तिकडे ढुंकून पाहत नसल्याचे दिसते़ यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागावी, हाच खरा प्रश्न आहे़(वार्ताहर)