शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सेलू तालुक्यात वाढणार सोयाबीनचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST

सेलू तालुक्यात ४८ हजार ९०५ हेक्टर असलेल्या लागवड क्षेत्रात मागील खरिप हंगामात १० हजार ५० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. परंतु, यावेळी हे क्षेत्र १३ हजार ५०० हेक्टर राहण्याचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला असून शेतकऱ्याचा सोयाबीन पेरणीकडे कल असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अंदाज : १३ हजार ५०० हेक्टरवर होणार लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : दुबार पीकक्षेत्र वाढविण्याचा शासनाचा भर असून कपाशीनंतर गहू पिकाची लागवड व्हावी, हा उद्देश असला तरी सेलू तालुक्यात यंदा सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.सेलू तालुक्यात ४८ हजार ९०५ हेक्टर असलेल्या लागवड क्षेत्रात मागील खरिप हंगामात १० हजार ५० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. परंतु, यावेळी हे क्षेत्र १३ हजार ५०० हेक्टर राहण्याचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला असून शेतकऱ्याचा सोयाबीन पेरणीकडे कल असल्याचे दिसून येत आहे. सेलू तालुक्यात बागायती शेती असल्याने या भागातील केळीच्या बागा घटल्याने बहुतांश शेतकरी लांब धाग्यांचा कापूस उत्पादन करण्यावर भर देतो. पण, यावर्षी सततची नपिकी व कपाशीला मिळणारा भाव हा परवडणारा नसल्याने मागील हंगामात ३० हजार ५१० हेक्टरमध्ये असणारा कापसाचा पेरा २९ हजार १९० हेक्टरमध्ये राहण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे.यावर्षी कृषी विभागाच्या नियोजनात कापसाचा पेरा घटणार असल्याचे दिसून येत आहे. मागील खरिप हंगामात संकरित ज्वारी २१ हेक्टर, कापूस ३०५१० हेक्टर, सोयाबीन १० हजार ५० हेक्टर, तूर ६६०० हेक्टर, मूग ३ हेक्टर, उडीद २ हेक्टर असा पेरा होता. यावर्षी कृषी विभागाच्या नियोजनात संकरित ज्वारी ५० हेक्टर, भुईमुंग २० हेक्टर, मूंग ४५, उडीद ५०, आणि मका ५० हेक्टरपर्यंत पेरा राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कपाशी हे नगदी पीक म्हणून ओळखल्या जात होते आता कपाशीकडे दरवर्षी शासन दुर्लक्ष करीत आहे. कापसाचा दर वाढेल ही आशा आता मावळली आहे. त्यामुळे बागायती तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेलू तालुक्यात यावेळी सोयाबीनच्या पेºयात मोठी वाढ होवून कपाशी क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे.तुरीचा पेरा वाढणार यावर्षी तुरीला मिळालेला भाव. आलेले उत्पादन काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा दायक होते. तूर हे आंतरपीक असल्याने शेतकºयांना परवडणारे आहे. कपाशीत आंतरपीक घेणारे शेतकरी यावर्षी सोयाबीनमध्ये तूर हे आंतर पीक घेणार असल्याचे दिसून येत आहे.८१९६ क्विंटल बियाण्यांची मागणीकृषी विभागाकडून येणाऱ्या खरिप हंगामात ८१९६ क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. यात ज्वार ४ क्विंटल, कपाशी ६९३ क्विंटल, सोयाबीन ७०८८ क्विंटल, भुईमुंग २० क्विंटल, तूर ३६० क्विंटल, मूंग ६ क्विंटल, उडीद ६ क्विंटल, मका १९ क्विंटल, अशी ८१९६ क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे.दुबार पिकाखालील क्षेत्र वाढविणे, शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी. घरचेच बियाणे वापरावे, पण त्याची उगवण क्षमता तपासून पाहवी, कडधान्य क्षेत्र वाढवावे, शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास त्यांनी संपर्क करावा.- एस. आर. मुरारकर, कृषी अधिकारी, पंचायत समिती, सेलू.

टॅग्स :agricultureशेती